शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

लाल पँथर संघटना रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:37 IST

कळंब : मराठवाड्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील गायरान जमिनी गायरानधारकांच्या नावे कराव्यात, जिल्ह्यातील निवासी अतिक्रमणे कायम करावीत, या मागणीसाठी लाल पँथर ...

कळंब : मराठवाड्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील गायरान जमिनी गायरानधारकांच्या नावे कराव्यात, जिल्ह्यातील निवासी अतिक्रमणे कायम करावीत, या मागणीसाठी लाल पँथर संघटनेच्या वतीने रविवारी कळंब उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भाई बजरंग ताटे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

शहरातील तहसील कार्यालय ते सावरकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आला. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करीत पुढे अण्णाभाऊ साठे चौक ते तहसील कार्यालयावर गेला. येथे मोर्चाचे रूपांतर आंदोलनात होऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय परिसरात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

मोर्चाला शिराढोण येथील ताजखाँ पठाण प्रतिष्ठान व महाराष्ट्र क्रांती सेना यांनी जाहीर पाठिंबा दिला. या वेळी बजरंग ताटे, जिल्हाध्यक्ष माया शिंदे, मानवहित पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटुळे, समाधान डोंगर, लहुजी सेनेचे बालाजी गायकवाड, पांडुरंग कदम, धनंजय ताटे, ज्येष्ठ नेते रामकृष्ण कांबळे यांची भाषणे झाली.

अशा आहेत मागण्या...

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व गायरान जमिनी गायरानधारकांच्या नावे कराव्यात, कडकनाथवाडी येथील स्मशानभूमीची वहिवाटीनुसार नोंद करावी, सर्व महामंडळे चालू करून ५ लाखांपर्यंत कर्ज द्यावे, कळंब येथील शासकीय विश्रामगृहात समोर असलेल्या शाॅपिंग सेंटरला अण्णा भाऊ साठे यांचे नाव द्यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

आमदार पाटील यांची भेट

या मोर्चाला आमदार कैलास पाटील यांनी भेट दिली असता बजरंग ताटे यांनी त्यांच्याकडे आपण विधानसभेत या गायरान जमिनीबाबत प्रश्न उपस्थित करावा, अशी मागणी केली. यावेळी आमदार पाटील यांनी शिराढोण व कळंब येथील मागण्यांसंदर्भात कळंबचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन सूचना देतो, अशी माहिती दिली. या मोर्चात कळंब तालुक्यातील सर्व गायरानधारक सहभागी झाले होते.