शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

निधी वाटपावर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांकडूनही प्रश्नचिन्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 19:02 IST

आर्थिक वर्ष सरण्यास काही दिवसांचा कालावधी उरला असताना चार-पाच दिवसांपूर्वी समाजकल्याण समितीच्या झालेल्या बैठकीत निधी वाटप करण्यात आले. 

ठळक मुद्देमागासवर्गीय वस्ती विकास योजनेत उस्मानाबादसह कळंबला झुकते मापभाजपासह काँग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांनी केली तक्रार

उस्मानाबाद : आर्थिक वर्ष सरण्यास अवघे काही दिवस हाती उरले असताना, जिल्हा परिषद समाजकल्याण समितीने मागासवर्गीय वस्ती विकास योजनेअंतर्गत आलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता दिली. परंतु, हे निधी वाटप निकषानुसार झाले नसल्याचा आरोप विरोधक असलेल्या काँग्रेस, सेनेसह सत्ताधारी बाकावरील भाजपाच्या सदस्यांनीही केला आहे. सर्वाधिक निधीउस्मानाबादसह कळंब तालुक्यात देण्यात आला आहे. तर समाजकल्याण सभापतींच्या लोहारा तालुक्यास अवघे ५५ लाख रूपये देण्यात आले आहेत, हे विशेष.

जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजबांधवांच्या वस्त्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना रस्ते, नाल्या, विद्युतीकरण,  पाणीपुरवठा आदी मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रत्येक वर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात कोट्यवधी रूपये उपलब्ध करून दिले जातात. चालू आर्थिक वर्षातही सुमारे २० ते २२ कोटी रूपये उपलब्ध झाले आहेत. आर्थिक वर्ष सरण्यास काही दिवसांचा कालावधी उरला असताना चार-पाच दिवसांपूर्वी समाजकल्याण समितीच्या झालेल्या बैठकीत निधी वाटप करण्यात आले. 

दरम्यान, सदरील निधी वाटपावरून आता वादाला तोंड फुटले आहे.  लोकसंख्येच्या प्रमाणात निधी वाटप करण्यात आलेले नाही, असा आरोप करीत सत्ताधारी भाजपाचे बांधकाम सभापती अभय चालुक्य, काँग्रेसचे बाबूराव चव्हाण, सेनेचे कैलास पाटील, काँग्रेसचेच रफिक तांबोळी, धनराज हिरमुखे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. सदरील निधी वाटप रद्द करून निकषप्रमाणे सुधारित मंजुऱ्या द्याव्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे. काही सदस्यांनी हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी यांच्याकडेही मांडला आहे. त्यामुळे आता याबाबतीत काय निर्णय होतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

असे आहे निधी वाटप...समाजकल्याण समितीने प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी मान्यता आदेश काढले. त्यानुसार उस्मानाबाद तालुक्यातील बारा गटांसाठी ४ कोटी ९० लाख ५० हजार, उमरगा तालुक्यासाठी १ कोटी ८५ लाख २० हजार, तुळजापूर तालुक्यासाठी २ कोटी ७५ लाख ९० हजार, भूम तालुक्यासाठी १ कोटी ४४ लाख, कळंब तालुक्यासाठी ३ कोटी ४९ लाख, वाशी तालुक्यासाठी १ कोटी ४२ लाख तर सभापती नारायणकर यांचा तालुका असलेल्या लोहाऱ्यासाठी केवळ ५५ लाख रूपये देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, सास्तूर आणि माकणी या दोन गटातील एकाही गावासाठी निधी देण्यात आलेला नाही. उमरगा तालुक्यातील गुंजोटी गटासाठीही निधी देण्यात आलेला नाही.

प्रतिक्रिया :

निधी वाटप करताना संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्याला साधे विचारलेही नाही. माझ्या गटात ७० लाख देय असताना ११ लाखावर बोळवण केली. याबाबत सीईओंकडे तक्रार केली आहे. - अभय चालुक्य, सभापती, भाजप.

जिल्हा परिषद सदस्य म्हणून सत्ताधाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. गरज असणाऱ्या गावांना निधी देण्याबात आम्ही सूचना केली असता, दुसऱ्याच गावांना निधी दिला. -रफिक तांबोळी, सदस्य, काँग्रेस.

बहुतांश ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव आले आहेत. असे असतानाही सत्ताधाऱ्यांनी सास्तूर, माकणी, गुंजोटी या गटांना एक रूपयाही दिला नाही. जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. -कैैलास पाटील, सदस्य, शिवसेना.

निधी वाटप करताना सर्वच निकष धाब्यावर बसविले आहेत. गावांतील मागासवर्गीय बांधवांची संख्याही विचारात घेतलेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून सीईओंकडे तक्रार केली अहे. -बाबूराव चव्हाण, सदस्य, काँग्रेस.

साडेचार कोटी शिल्कल मागासवर्गीय वस्ती विकास योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीतील सुमारे साडेचार कोटी रूपये निधी शिल्लक आहे. त्यामुळे सदस्यांच्या म्हणणे विचारात घेऊन संबंधित गटांतील वस्त्यांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादfundsनिधीgovernment schemeसरकारी योजना