शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

रस्त्यावर भजे तळून राष्ट्रवादी काँग्रेसने केला शासनाच्या धोरणांचा निषेध

By सूरज पाचपिंडे  | Updated: September 15, 2022 16:50 IST

तरुणांना रोजगार नसल्याने बेरोजगारी वाढली आहे, यातच मोठे उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत

उस्मानाबाद : शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजे तळून आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

तरुणांना रोजगार नसल्याने बेरोजगारी वाढली आहे. असे असतानाच राज्यात येणारी वेदांता फॉसकॉन कंपनी राज्यशासनाच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला गेल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शासनाच्या धोरणाविरोधात गुरुवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी हातगाड्यावर भजे तळून व हाती गाजरं घेऊन शासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. रोजगार द्या गाजरं घ्या, पंन्नास खोके एकदम ओके, वेदांत फॉसकॉन कंपनी गुजरातला नेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी केली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्यातील व मंडळांना सरसकट ५० हजार रुपये अतिवृष्टी अनुदान देण्यात यावे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ चे निकृष्ट दर्जाचे काम व अर्धवट उड्डाणपुलाची चौकशी करुन त्वरीत काम पूर्ण करा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, संजय पाटील-दुधगावकर, डॉ. प्रतापसिंह पाटील, विशाल शिंगाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादagitationआंदोलन