शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

शेतीचे गुणगान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; शेषराव मोहिते यांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 03:01 IST

कुंपणाबाहेर पडा : आता आसूड ओढणारी पोरं आपलीच

चेतन धनुरेउस्मानाबाद : सद्य:स्थितीत शेतकऱ्यांवर आसूड ओढणाºया यंत्रणेतील पोरंही शेतकºयाचीच आहेत़ साहित्यातही शेतीचे गोडवे गाण्याचे दिवस राहिले नाहीत़ उलट असे गुणगान करून आभासी चित्र निर्माण करणाºयांवर गुन्हे दाखल करावेत. शेतकºयांपुढे शेतीच्या कुंपणाबाहेर पडणे, हाच एक मार्ग उरल्याचे परखड मत डॉ़ शेषराव मोहिते यांनी येथे व्यक्त केले़

अ.भा. मराठी साहित्य संमेलनात रविवारी ‘शेतकºयाचा आसूड : आजच्या संदर्भात’ या विषयावर परिचर्चा झाली़ अध्यक्षस्थानी डॉ़ शेषराव मोहिते होते़ तर डॉ़ रविंद्र शोभणे, विजय चोरमारे, डॉ़ कैलास दौंड, गुरय्या स्वामी यांचा सहभाग होता़ अध्यक्षस्थानावरुन डॉ़मोहिते यांनी शेतकºयांना नागविणाºया राज्यकर्ते, प्रशासनावर शाब्दिक आसूड ओढले़ ते म्हणाले, शेतकरी पिढ्यान्पिढ्या कर्जबाजारी करण्याची व्यवस्था राज्यकर्त्यांनी निर्माण केली. निवडणुका आल्या की कर्जमाफीच्या लोकप्रिय घोषणा केल्या जातात. दुष्काळ पडल्यावर कधी आपण एखादा व्यापारी, नोकरदार खडी फोडायला गेलेला पाहिलाय का? केवळ शेतकºयालाच अशी झळ बसते़ त्यामुळे शेतकºयांना आता शेतीचे कुंपण तोडून बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे मतही डॉ़ मोहिते यांनी व्यक्त केले़क्रांतिकारी चळवळ व्हावी...विजय चोरमारे म्हणाले, महात्मा फुले यांनी शेतकºयांच्या आसूडमध्ये १३६ वर्षांपूर्वी वर्णिलेली परिस्थिती आजही तशीच आहे़ शेतकºयांच्या प्रश्नांना समजून घेण्यात समाज आणि राज्यकर्ते कमी पडले. शेतकºयांसाठी क्रांतिकारी चळवळ उभी व्हावी लागेल, असेही ते म्हणाले.शेतीचे शिक्षण बांधावर पोहोचले पाहिजेकैैलास दौंड मांडणी करताना म्हणाले, महात्मा फुले यांनी शेतकºयांच्या आसूडमध्ये शेती शिक्षणाचा विचार मांडला होता़ तो कृषी विद्यापीठे, महाविद्यालयांच्या माध्यमातून प्रत्यक्षात आला़ मात्र, यात शिक्षण घेणारी शेतकºयांची मुलं नोकºयांच्या मागे धावत आहेत़ त्यामुळे शेती शिक्षण हे बांधावर पोहोचलेच नाही़ त्यासाठी शेतकºयांच्या पोरांनी ‘आसूड’ वाचावा.कृषिमंत्री ‘शेतकºयांचा आसूड’ वाचलेला हवारवींद्र शोभणे म्हणाले, शेतकºयांच्या श्रमशक्तीचा मोबदला मिळत नाही़ याला निसर्गासोबतच राज्यकर्तेही जबाबदार आहेत़ त्यामुळे राज्यकर्त्यांनी ‘शेतकºयांचा आसूड’ वाचलेलाच व्यक्ती कृषिमंत्री निवडावा. शेतकºयांनीही देवभोळेपणा सोडून वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारावा, असेही ते म्हणाले.राज्यकर्त्यांनी ‘काम की बात’ करावीगुरय्या स्वामी म्हणाले, राज्यकर्त्यांनी ‘मन की बात’ करण्याऐवजी ‘काम की बात’ केली तर शेतकºयांच्या वेदनेवर मात्रा मिळेल़ शेतकºयास केवळ पीककर्ज न देता मशागतीसही अल्प व्याजदरात कर्ज द्यावे, जमीन अधिग्रहण कायदा रद्द करावा, असे मार्गही स्वामी यांनी सुचविले़

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती