शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शेतीचे गुणगान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; शेषराव मोहिते यांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 03:01 IST

कुंपणाबाहेर पडा : आता आसूड ओढणारी पोरं आपलीच

चेतन धनुरेउस्मानाबाद : सद्य:स्थितीत शेतकऱ्यांवर आसूड ओढणाºया यंत्रणेतील पोरंही शेतकºयाचीच आहेत़ साहित्यातही शेतीचे गोडवे गाण्याचे दिवस राहिले नाहीत़ उलट असे गुणगान करून आभासी चित्र निर्माण करणाºयांवर गुन्हे दाखल करावेत. शेतकºयांपुढे शेतीच्या कुंपणाबाहेर पडणे, हाच एक मार्ग उरल्याचे परखड मत डॉ़ शेषराव मोहिते यांनी येथे व्यक्त केले़

अ.भा. मराठी साहित्य संमेलनात रविवारी ‘शेतकºयाचा आसूड : आजच्या संदर्भात’ या विषयावर परिचर्चा झाली़ अध्यक्षस्थानी डॉ़ शेषराव मोहिते होते़ तर डॉ़ रविंद्र शोभणे, विजय चोरमारे, डॉ़ कैलास दौंड, गुरय्या स्वामी यांचा सहभाग होता़ अध्यक्षस्थानावरुन डॉ़मोहिते यांनी शेतकºयांना नागविणाºया राज्यकर्ते, प्रशासनावर शाब्दिक आसूड ओढले़ ते म्हणाले, शेतकरी पिढ्यान्पिढ्या कर्जबाजारी करण्याची व्यवस्था राज्यकर्त्यांनी निर्माण केली. निवडणुका आल्या की कर्जमाफीच्या लोकप्रिय घोषणा केल्या जातात. दुष्काळ पडल्यावर कधी आपण एखादा व्यापारी, नोकरदार खडी फोडायला गेलेला पाहिलाय का? केवळ शेतकºयालाच अशी झळ बसते़ त्यामुळे शेतकºयांना आता शेतीचे कुंपण तोडून बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे मतही डॉ़ मोहिते यांनी व्यक्त केले़क्रांतिकारी चळवळ व्हावी...विजय चोरमारे म्हणाले, महात्मा फुले यांनी शेतकºयांच्या आसूडमध्ये १३६ वर्षांपूर्वी वर्णिलेली परिस्थिती आजही तशीच आहे़ शेतकºयांच्या प्रश्नांना समजून घेण्यात समाज आणि राज्यकर्ते कमी पडले. शेतकºयांसाठी क्रांतिकारी चळवळ उभी व्हावी लागेल, असेही ते म्हणाले.शेतीचे शिक्षण बांधावर पोहोचले पाहिजेकैैलास दौंड मांडणी करताना म्हणाले, महात्मा फुले यांनी शेतकºयांच्या आसूडमध्ये शेती शिक्षणाचा विचार मांडला होता़ तो कृषी विद्यापीठे, महाविद्यालयांच्या माध्यमातून प्रत्यक्षात आला़ मात्र, यात शिक्षण घेणारी शेतकºयांची मुलं नोकºयांच्या मागे धावत आहेत़ त्यामुळे शेती शिक्षण हे बांधावर पोहोचलेच नाही़ त्यासाठी शेतकºयांच्या पोरांनी ‘आसूड’ वाचावा.कृषिमंत्री ‘शेतकºयांचा आसूड’ वाचलेला हवारवींद्र शोभणे म्हणाले, शेतकºयांच्या श्रमशक्तीचा मोबदला मिळत नाही़ याला निसर्गासोबतच राज्यकर्तेही जबाबदार आहेत़ त्यामुळे राज्यकर्त्यांनी ‘शेतकºयांचा आसूड’ वाचलेलाच व्यक्ती कृषिमंत्री निवडावा. शेतकºयांनीही देवभोळेपणा सोडून वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारावा, असेही ते म्हणाले.राज्यकर्त्यांनी ‘काम की बात’ करावीगुरय्या स्वामी म्हणाले, राज्यकर्त्यांनी ‘मन की बात’ करण्याऐवजी ‘काम की बात’ केली तर शेतकºयांच्या वेदनेवर मात्रा मिळेल़ शेतकºयास केवळ पीककर्ज न देता मशागतीसही अल्प व्याजदरात कर्ज द्यावे, जमीन अधिग्रहण कायदा रद्द करावा, असे मार्गही स्वामी यांनी सुचविले़

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती