शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचे गुणगान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; शेषराव मोहिते यांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 03:01 IST

कुंपणाबाहेर पडा : आता आसूड ओढणारी पोरं आपलीच

चेतन धनुरेउस्मानाबाद : सद्य:स्थितीत शेतकऱ्यांवर आसूड ओढणाºया यंत्रणेतील पोरंही शेतकºयाचीच आहेत़ साहित्यातही शेतीचे गोडवे गाण्याचे दिवस राहिले नाहीत़ उलट असे गुणगान करून आभासी चित्र निर्माण करणाºयांवर गुन्हे दाखल करावेत. शेतकºयांपुढे शेतीच्या कुंपणाबाहेर पडणे, हाच एक मार्ग उरल्याचे परखड मत डॉ़ शेषराव मोहिते यांनी येथे व्यक्त केले़

अ.भा. मराठी साहित्य संमेलनात रविवारी ‘शेतकºयाचा आसूड : आजच्या संदर्भात’ या विषयावर परिचर्चा झाली़ अध्यक्षस्थानी डॉ़ शेषराव मोहिते होते़ तर डॉ़ रविंद्र शोभणे, विजय चोरमारे, डॉ़ कैलास दौंड, गुरय्या स्वामी यांचा सहभाग होता़ अध्यक्षस्थानावरुन डॉ़मोहिते यांनी शेतकºयांना नागविणाºया राज्यकर्ते, प्रशासनावर शाब्दिक आसूड ओढले़ ते म्हणाले, शेतकरी पिढ्यान्पिढ्या कर्जबाजारी करण्याची व्यवस्था राज्यकर्त्यांनी निर्माण केली. निवडणुका आल्या की कर्जमाफीच्या लोकप्रिय घोषणा केल्या जातात. दुष्काळ पडल्यावर कधी आपण एखादा व्यापारी, नोकरदार खडी फोडायला गेलेला पाहिलाय का? केवळ शेतकºयालाच अशी झळ बसते़ त्यामुळे शेतकºयांना आता शेतीचे कुंपण तोडून बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे मतही डॉ़ मोहिते यांनी व्यक्त केले़क्रांतिकारी चळवळ व्हावी...विजय चोरमारे म्हणाले, महात्मा फुले यांनी शेतकºयांच्या आसूडमध्ये १३६ वर्षांपूर्वी वर्णिलेली परिस्थिती आजही तशीच आहे़ शेतकºयांच्या प्रश्नांना समजून घेण्यात समाज आणि राज्यकर्ते कमी पडले. शेतकºयांसाठी क्रांतिकारी चळवळ उभी व्हावी लागेल, असेही ते म्हणाले.शेतीचे शिक्षण बांधावर पोहोचले पाहिजेकैैलास दौंड मांडणी करताना म्हणाले, महात्मा फुले यांनी शेतकºयांच्या आसूडमध्ये शेती शिक्षणाचा विचार मांडला होता़ तो कृषी विद्यापीठे, महाविद्यालयांच्या माध्यमातून प्रत्यक्षात आला़ मात्र, यात शिक्षण घेणारी शेतकºयांची मुलं नोकºयांच्या मागे धावत आहेत़ त्यामुळे शेती शिक्षण हे बांधावर पोहोचलेच नाही़ त्यासाठी शेतकºयांच्या पोरांनी ‘आसूड’ वाचावा.कृषिमंत्री ‘शेतकºयांचा आसूड’ वाचलेला हवारवींद्र शोभणे म्हणाले, शेतकºयांच्या श्रमशक्तीचा मोबदला मिळत नाही़ याला निसर्गासोबतच राज्यकर्तेही जबाबदार आहेत़ त्यामुळे राज्यकर्त्यांनी ‘शेतकºयांचा आसूड’ वाचलेलाच व्यक्ती कृषिमंत्री निवडावा. शेतकºयांनीही देवभोळेपणा सोडून वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारावा, असेही ते म्हणाले.राज्यकर्त्यांनी ‘काम की बात’ करावीगुरय्या स्वामी म्हणाले, राज्यकर्त्यांनी ‘मन की बात’ करण्याऐवजी ‘काम की बात’ केली तर शेतकºयांच्या वेदनेवर मात्रा मिळेल़ शेतकºयास केवळ पीककर्ज न देता मशागतीसही अल्प व्याजदरात कर्ज द्यावे, जमीन अधिग्रहण कायदा रद्द करावा, असे मार्गही स्वामी यांनी सुचविले़

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती