शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"पवारसाहेब, सुप्रिया सुळेंना हा नंगानाच चालणार नाही, हा माझा राष्ट्रवादीतला अनुभव"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 17:20 IST

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ हा वाद थांबता थांबेना झालाय. "मेरी DP इतनी ढासू, चित्रा मेरी सासू" असं उर्फीने पुन्हा ट्विट करुन म्हटलं आहे

उस्मानाबाद - अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) केवळ एकाच कारणाने चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तिच्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदला बेड्या घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर, हा वाद महिला आयोगापर्यंत पोहोचला आणि राष्ट्रवादी विरुद्ध भाजप समर्थकांमध्ये चढाओढ लागल्याचं दिसून आलं. यावरुन, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली, त्यावर आता चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या समर्थकांना सवाल केला. तसेच, स्वत:चा अनुभवही सांगितला.  

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ हा वाद थांबता थांबेना झालाय. "मेरी DP इतनी ढासू, चित्रा मेरी सासू" असं उर्फीने पुन्हा ट्विट करुन म्हटलं आहे. तर दुसरीकडे चित्रा वाघ यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी, वाघ यांनी पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला. तसेच, यांच्याकडे जे पद आहे, ते पद आम्ही यापूर्वीच भोगलं आहे, असे म्हणत चाकणकर यांच्यावर निशाणा साधला. तसेच, मी २० वर्षे राष्ट्रवादीत काम केलंय. मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगते की, पवारसाहेब किंवा सुप्रिया ताई यांनाही हा नंगानाच आवडणार नाही, असे चित्रा वाघ यांनी म्हटले. 

सध्या या प्रकरणावरुन जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेद, ते जर कुणाला थांबवायचे असतील तर अगोदर आपल्या ताईंना सांगा. याच ताईंच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण आमदार होत्या, तेव्हा त्यांनी रस्त्यावरील कापड दुकानातील स्टँच्यूंना अंडरगारमेंट घालण्यासंदर्भात आवाज उठवला होता. तीही गोष्ट चांगली होती, असे म्हणत विद्या चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेची चित्रा वाघ यांनी आठवण करुन दिली. तसेच, महाराष्ट्रात काहीही झालं तरी हा नंगानाच थांबायलाच हवा, यामुळे समाजात एक पिढी वाया जात असून तरुण मुलींवर याचा विपरीत परिणाम होतो, असेही वाघ यांनी म्हटले.  

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादChitra Waghचित्रा वाघ