शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

शाळांची डाेळेझाक ठकेदाराच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 5:02 AM

कळंब : शालेय पोषण आहार योजनेचा धान्यपुरवठा करताना, वजनात अनियमितता येत असल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी समोर आला होता. ठेकेदाराने ...

कळंब : शालेय पोषण आहार योजनेचा धान्यपुरवठा करताना, वजनात अनियमितता येत असल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी समोर आला होता. ठेकेदाराने धान्यादी वस्तू माेजून दिल्या, तरी शाळेतील वजन काट्यावर माेजून घ्याव्यात आणि एखाद्या बॅगमध्ये धान्य कमी निघाले, तर तशी नाेंद ठेवण्याचे निर्देश आहेत. मात्र, काही शाळांत वजन काटे नाहीत आणि ज्या शाळांकडे आहेत, ते नादुरुस्त आहेत. त्यामुळे शाळांची ही डाेळेझाक धान्यपुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या पथ्यावर पडत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या, तरी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवठा केला गेला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना शिजवलेला आहार देण्याऐवजी धान्यादी वस्तूंचे वितरण केले जात आहे. तालुका स्तरावरील गटशिक्षण कार्यालयाने पटसंख्येनुसार केलेल्या मागणीनुसार, हा आहार एका एजन्सीमार्फत पुरवठा केला जात आहे.

यानुसार, तालुक्यातील २०३ शाळांतील पहिली ते पाचवीच्या गटातील १४ हजार ३३५ व सहावी ते आठवी या गटांतील ८ हजार ५७६ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचे धान्य वाटप करण्यात येत आहे. यानुसार, तालुक्यात एका एजन्सीमार्फत एक लाख ४३ हजार किलो तांदूळ, २५ हजार किलो मसूर दाळ तर ५२ हजार किलो हरभरा पुरविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे धान्य घेताना ठेकेदारांच्या वजन काट्यावर विश्वास न ठेवता मुख्याध्यापकांनी शाळेकडील वजन काट्यावर माेजून घ्यावे, असे निर्देश आहेत. मात्र, या प्रक्रियेसाठी काही शाळांकडे वजन काटे नाहीत, तर काही शाळांकडील वजन काटे नादुरुस्त आहेत. हा दुर्लक्षित कारभार ठेकेदाराच्या पथ्यावर पडत आहे. दरम्यान, या संदर्भात ‘लाेकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सीईओ डाॅ.विजयकुमार फड यांनी सक्त सूचना करीत, यापुढे धान्य माेजून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित करण्याचे फर्मान काढले आहे.

पदांसाठी अट्टाहास, कर्तव्याचा मात्र विसर...

शालेय पोषण आहार या महत्त्वाकांक्षी योजनेवर त्या-त्या शाळेतील शालेय व्यवस्थापन समित्यांचाही ‘वॉच’ असायला हवा. या पदासाठी मोठा अट्टाहास धरला जातो. प्रसंगी निवडणूक घ्यावी लागते. प्रत्यक्षात मात्र त्यांना कर्तव्याचा विसर पडतो. काही गावांतील ‘दक्ष’ व्यवस्थापन समित्यांचा अपवाद वगळता इतर गावात या समित्यांची निष्क्रियता दिसून येते.

या संदर्भात कळंब येथील प्रभारी गट शिक्षणाधिकारी परमेश्वर भारती यांच्याशी संपर्क साधला असता, शालेय पोषण आहार योजनेतील धान्यादी वस्तू पावतीप्रमाणे वजन करून घ्यावे, ते योग्य आहे का, याची खात्री करावी. आपल्या काट्यावर वजन करून घ्यावे, असे वारंवार सूचित केले आहे.