शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पपईचे कोठार कोमेजले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:31 IST

सुशील शुक्ला परंडा : मागील काही वर्षांत पपई उत्पादनाचे आगर म्हणून ओळखल्या जाऊ लागलेल्या तालुक्यातील पाचपिंपळा परिसराला ...

सुशील शुक्ला

परंडा : मागील काही वर्षांत पपई उत्पादनाचे आगर म्हणून ओळखल्या जाऊ लागलेल्या तालुक्यातील पाचपिंपळा परिसराला गेल्या आठवड्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. यामुळे शेकडो एकरातील पपईची रोपे अति पावसाने पिवळी पडून जळाली असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पाचपिंपळा परिसरात काही शेतकऱ्यांनी वेगळी वाट म्हणून पपईची लागवड सुरू केली होती. पपईचे चांगले उत्पादन होऊन पैसाही चांगला मिळू लागला. उत्तर प्रदेश, बिहार येथील परप्रांतीय व्यावसायिक पाचपिंपळा येथील पपईची खरेदी करण्यास जागेवर येऊ लागले. त्यामुळे इतरही अनेकांनी पपई लागवड करण्यास सुरुवात केली. सध्या पाचपिंपळा येथील प्रत्येक शेतकऱ्याकडे दोन-चार एकरापर्यंत पपईच्या बागा आहेत. पपई खरेदीसाठी दिल्ली, मुंबई, हैद्राबाद येथील व्यापारी चार-सहा महिने परंड्यात राहून दररोज पपईची गाडी भरून पाठवतात. शिवाय, शेतकऱ्यांना जागेवरच वजन करून रोख रक्कम दिली जाते. त्यामुळे शेतकरी पपई उत्पादनाकडे वळले असून, पपई उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. विशेष म्हणजे, पाचपिंपळा गावातील शेतकरी पपईची रोपे स्वत: तयार करून विक्री करीत आहेत.

दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने पपईची रोपे जळून होत्याचे नव्हते झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे त्वरित पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यातून केली जात आहे.

चौकट ...

मी तीन एकर क्षेत्रावर पपईची लागवड केली होती. रोपेही जोमात आली होती. यासाठी आतापर्यंत एक लाख रुपये खर्च झाला आहे. मात्र, मागील आठ-दहा दिवसांत पडलेल्या अतिवृष्टी, संततधार पावसामुळे पपईची झाडे जागेवर पिवळी पडून वाळून गेली आहेत. या पपईचे सात लाखांचे उत्पन्न निघाले असते. शासनाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.

- समाधान खुळे, शेतकरी, पाचपिंपळा

मी चार एकरात पपईची चार हजार रोपे लावली होती. परंतु, जास्त पाऊस झाल्याने रोपे पिवळी पडून वाळून गेली आहेत. ही रोपे आता येणार नाहीत. त्यामुळे माझे आठ लाखांपर्यंत निघणाऱ्या उत्पन्नाबरोबरच आतापर्यंत पपईच्या बागा संभाळण्यासाठी केलेला लाख-दीड लाखाचा खर्चही वाया गेले आहे.

- रत्नाकर जाधव, शेतकरी, पाचपिपंळा