शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पपईचे कोठार कोमेजले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:31 IST

सुशील शुक्ला परंडा : मागील काही वर्षांत पपई उत्पादनाचे आगर म्हणून ओळखल्या जाऊ लागलेल्या तालुक्यातील पाचपिंपळा परिसराला ...

सुशील शुक्ला

परंडा : मागील काही वर्षांत पपई उत्पादनाचे आगर म्हणून ओळखल्या जाऊ लागलेल्या तालुक्यातील पाचपिंपळा परिसराला गेल्या आठवड्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. यामुळे शेकडो एकरातील पपईची रोपे अति पावसाने पिवळी पडून जळाली असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पाचपिंपळा परिसरात काही शेतकऱ्यांनी वेगळी वाट म्हणून पपईची लागवड सुरू केली होती. पपईचे चांगले उत्पादन होऊन पैसाही चांगला मिळू लागला. उत्तर प्रदेश, बिहार येथील परप्रांतीय व्यावसायिक पाचपिंपळा येथील पपईची खरेदी करण्यास जागेवर येऊ लागले. त्यामुळे इतरही अनेकांनी पपई लागवड करण्यास सुरुवात केली. सध्या पाचपिंपळा येथील प्रत्येक शेतकऱ्याकडे दोन-चार एकरापर्यंत पपईच्या बागा आहेत. पपई खरेदीसाठी दिल्ली, मुंबई, हैद्राबाद येथील व्यापारी चार-सहा महिने परंड्यात राहून दररोज पपईची गाडी भरून पाठवतात. शिवाय, शेतकऱ्यांना जागेवरच वजन करून रोख रक्कम दिली जाते. त्यामुळे शेतकरी पपई उत्पादनाकडे वळले असून, पपई उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. विशेष म्हणजे, पाचपिंपळा गावातील शेतकरी पपईची रोपे स्वत: तयार करून विक्री करीत आहेत.

दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने पपईची रोपे जळून होत्याचे नव्हते झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे त्वरित पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यातून केली जात आहे.

चौकट ...

मी तीन एकर क्षेत्रावर पपईची लागवड केली होती. रोपेही जोमात आली होती. यासाठी आतापर्यंत एक लाख रुपये खर्च झाला आहे. मात्र, मागील आठ-दहा दिवसांत पडलेल्या अतिवृष्टी, संततधार पावसामुळे पपईची झाडे जागेवर पिवळी पडून वाळून गेली आहेत. या पपईचे सात लाखांचे उत्पन्न निघाले असते. शासनाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.

- समाधान खुळे, शेतकरी, पाचपिंपळा

मी चार एकरात पपईची चार हजार रोपे लावली होती. परंतु, जास्त पाऊस झाल्याने रोपे पिवळी पडून वाळून गेली आहेत. ही रोपे आता येणार नाहीत. त्यामुळे माझे आठ लाखांपर्यंत निघणाऱ्या उत्पन्नाबरोबरच आतापर्यंत पपईच्या बागा संभाळण्यासाठी केलेला लाख-दीड लाखाचा खर्चही वाया गेले आहे.

- रत्नाकर जाधव, शेतकरी, पाचपिपंळा