शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

‘महाआवास’मध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषद सर्वाेत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:34 IST

उस्मानाबाद - महाआवास अभियान (ग्रामीण) अंतर्गत दमदार कामगिरी केलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच ग्रामपंचायतींचे गुणांकन निश्चित करून प्रथम, ...

उस्मानाबाद - महाआवास अभियान (ग्रामीण) अंतर्गत दमदार कामगिरी केलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच ग्रामपंचायतींचे गुणांकन निश्चित करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक जाहीर केले आहेत. प्रधानमंत्री आवास याेजनेत उस्मानाबाद जिल्हा परिषदे द्वितीय क्रमांक पटकावून ‘सर्वाेत्कृष्ट’ ठरली आहे, तर राज्य पुरस्कृत आवास याेजनेत अव्वलस्थान पटकाविले आहे. सर्वाेत्कृष्ट पंचायत समितीत वाशी, लाेहारा, तर सर्वाेत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या रांगेत धानुरी व पारगाव ग्रामपंचायतींना स्थान मिळाले.

दगड-मातीच्या घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना हक्काचा पक्का निवारा मिळावा, यासाठी केंद्र, तसेच राज्य शासनाच्या वतीने विविध आवास याेजना राबविण्यात येतात. प्रधानमंत्री आवास याेजनेच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, ग्रामपंचायतींनी दमदार कामगिरी केली. शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट मुदतीत पूर्ण केले. याच कामगिरीची आता सरकारनेही दखल घेतली आहे. सर्वाेत्कृष्ट जिल्हा परिषदेच्या पंक्तीत उस्मानाबाद द्वितीय स्थानावर आहे. सर्वाेत्कृष्ट पंचायत समितीच्या यादीत वाशी पं.स.ने तृतीय स्थान मिळविले आहे. सर्वाेत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या यादीत वाशी तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला आहे.

दरम्यान, राज्य पुरस्कृत आवास याेजनेतही ठळक कामगिरी केलेल्या संस्थांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषदेने अव्वलस्थान मिळविले, तर पंचायत समित्यांच्या यादीत लाेहारा द्वितीय स्थानावर आहे. सर्वाेत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या यादीत लाेहारा तालुक्यातील धानुरी ग्रामपंचायत द्वितीय स्थानी आहे. या सर्व संस्थांचा ३ सप्टेंबर राेजी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मुख्य सभागृहात ‘महा आवास अभियान-ग्रामीण’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

काेट...

केंद्र, तसेच राज्य सरकारच्या याेजनेतून गाेरगरीब कुटुंबांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेकडून सातत्याने पाठपुरावा केला जाताे. याेजनेचा नियमित आढावा घेण्यात येताे. त्यामुळे काेणत्या याेजनेत आपण कुठे आहाेत, हे समाेर आले. त्यावर प्रशासनाकडून बारकाईने काम करून घेण्यात आले. पुरस्काराच्या रूपाने त्याचीच पाेचपावती मिळाली असे म्हणावे लागेल. दाेन्ही याेजनेत जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील दाेन पंचायत समित्या व दाेन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ही बाब आम्हा जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांस प्रशासनासाठी अभिमानास्पद आहे.

-अस्मिता कांबळे, अध्यक्षा, जिल्हा परिषद.

जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे प्रधानमंत्री आवास याेजना व राज्य पुरस्कृत याेजनेत उस्मानाबाद जिल्हा परिषदेने दमदार कामगिरी केली आहे. दाेन्ही घटकांत उस्मानाबादला सर्वाेत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून बहुमान मिळाला. साेबतच वाशी आणि लाेहारा या दाेन्ही पंचायत समित्यांनी क्रमांक पटकाविला. पारगा व धानुरी याही ग्रामपंचायती सर्वाेत्कृष्ट ठरल्या आहेत. ही बाब आम्हा सर्वांचा उत्साह वाढविणारी आहे. भविष्यातही याहीपेक्षा अधिक गतीने काम करण्याचा प्रयत्न राहील.

-राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.