शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्णवेळ ‘सीओं’ची वानवा; पालिकांचा कारभार ढेपाळला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 20:29 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर पालिका प्रशासन अधिकारी या पदालाही मागील एक ते दीड वर्षांपासून कोणी वाली नाही.

ठळक मुद्देविकास कामांना फटका  पालिका प्रशासन अधिकारी पदही रिक्तच

उस्मानाबाद : जिल्ह्यात आजघडीला दोन नगर पंचायती आणि आठ पालिका अस्तित्वात आहेत. मागील काही महिन्यांपासून यापैकी जवळपास पन्नास टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांना मुख्याधिकाऱ्यांच्या रिक्त जागांचा प्रश्न भेडसावत आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे विकास कामांच्या गतीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. एवढेच नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर पालिका प्रशासन अधिकारी या पदालाही मागील एक ते दीड वर्षांपासून कोणी वाली नाही.

वाशी आणि लोहारा येथील ग्रामपंचायतीच्या जागी नगर पंचायती अस्तित्वात आल्या आहेत. त्यामुळे अशा शहरांच्या विकासासाठी शासनाने पूर्णवेळ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक होते. परंतु, तसे होताना दिसत नाही. याचा परिणाम विकास कामांच्या अंमलबजावणीवर होत आहे. वाशी नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर या ठिकाणी काही महिन्यांनी पल्लवी अंबुरे यांना पूर्णवेळ मुख्याधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांची बदली झाल्यापासून हे पद रिक्तच आहे. येथील पदभार भूमचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बोंदर यांच्याकडे दोन ठिकाणचा कार्यभार असल्याने त्यांनाही वाशी नगर पंचायतीसाठी पूर्णवेळ देता येत नाही, असे नागरिकांसह पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

असेच रडगाणे लोहारा नगर पंचायतीच्या बाबतीत आहे. सोनम देशमुख यांनी काही महिने पूर्णवेळ मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या बदलीनंतर लोहाऱ्यासाठी पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले नाहीत. त्यामुळे येथेही सध्या प्रभारीराज सुरू आहे. नळदुर्ग पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. अशीच अवस्थात मुरूम नगर परिषदेची झाली आहे. मागील सहा महिन्यापासून येथील पद रिक्त आहे. विना पवार यांची बदली झाल्यापासून पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले नाहीत.

उमरगा पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांच्याकडे काही महिने अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यांनी पदभार सोडल्यानंतर आता तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. अधिकाऱ्यांसोबतच उपरोक्त नगर पंचायती आणि पालिकांना कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांचा प्रश्नही भेडसावत आहे. ही बाब शासनाने गांभीर्याने घेण्याची गरज नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादUsmanabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबादTahasildarतहसीलदार