शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद जिल्ह्यात ‘जलयुक्त’ला निधी तुटवड्याचे ग्रहण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 20:32 IST

११८ कोटी ५१ लाख रूपये एवढ्या निधीची गरज असताना आजअखेर केवळ ३२ कोटी रूपये शासनाने उपलब्ध करून दिले

ठळक मुद्दे११८ कोटी रूपयांची गरज प्रत्यक्षात दोन वर्षात मिळाले अवघे ३२ कोटी

उस्मानाबाद : मोठा गाजावाजा करीत राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले. सुरूवातीचे काही वर्ष मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत होता. परंतु, मागील दोन वर्षांपासून या अभियानाला निधी तुटवड्याचे ग्रहण लागले आहे. २०१७-२०१९ या कालावधीत सुमारे ११८ कोटी ५१ लाख रूपये एवढ्या निधीची गरज असताना आजअखेर केवळ ३२ कोटी रूपये शासनाने उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ‘जलयुक्त’अंतर्गतच्या कामांचा वेग मंदावल्याचे चित्र पहावयास मिळते.

एक -दोन वर्षाआड उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन विद्यमान राज्यसरकारने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले. या अभियानाअंतर्गत सन २०१७-१८ कंपार्टमेंट बंडींग, खोल सलग समतल चर, शेततळे, तुषार सिंचन, रिर्जा शाफ्ट, वृक्ष लागवड, जलशोषक पाणी खंदक, पाझर तलाव दुरूस्ती, कोल्हापुरी बंधारे दुरूस्ती आदी ३८ प्रकारची सुमारे ५ हजार ५५३ कामांना मंजुरी देण्यात आली होती. प्रशासकीय मंजुरीनंतर उपरोक्त कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. शासनाने घालून दिलेल्या मुदतीमध्ये ५ हजार ५०३ कामे पूर्ण करण्यात आली. तर अठरा कामे प्रगतीपथावर असून ३२ कामे शिल्लक आहे.

कार्यारंभ आदेश दिलेल्या सर्व कामांसाठी मिळून तब्बल ९१ कोटी ६९ लाख रूपये एवढ्या निधीची आवश्यकता होती. परंतु, दोन वर्षांचा कालावधी सरत आला असतानाही मंजूर रक्कम उपलब्ध झाली नाही. शासनाने आजवर केवळ ३४ कोटी २४ लाख रूपयांवरच बोळवण केली आहे. आजही सुमारे ५७ कोटी ४७ लाख रूपये एवढा निधी शासनाकडून उपलब्ध होणे बाकी आहे.

दरम्यान, असे असतानाच चालू आर्थिक वर्षात म्हणजेच २०१८-१९ मध्ये १ हजार ९१९ कामांना मंजुरी देण्यात आली. या सर्वच कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर १ हजार १५८ कामांना सुरूवात करण्याचे आदेश देण्यात आले. ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे २६ कोटी ८२ लाख रूपयांची गरज आहे. परंतु, आर्थिक वर्ष सरण्यास केवळ अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी उरलेला असताना शासनस्तरावरून छदामही उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे कामांची गतीही मंदावली आहे. कार्यारंभ आदेश दिलेल्यांपैकी केवळ ७३२ कामांना सुरूवात करण्यात आली आहे.

आजघडीला यापैकी अवघी ४११ कामे पूर्ण झाली आहेत. तर ३२१ कामे प्रगतीपथावर आहेत. या सर्व कामांवर मिळून ८ कोटी ४० लाखांचा खर्च झाला आहे. हाही निधी अन्य ‘हेड’चा असल्याचे कृषी विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. म्हणजेच चालू आर्थिक वर्षात शासनाने जलयुक्तसाठी छदामही उपलब्ध करून दिलेला नाही. २०१७-१९ या दोन वर्षातील पूर्ण झालेली कामे आणि उपलब्ध निधीवर नजर टाकली असता, ११८ कोटी ५१ लाखापैकी केवळ ३२ कोटी रूपये एवढा अल्प निधी मिळाला आहे. निधी उपलब्धतेची गती अशीच राहिल्यास कामे पूर्ण होणार कधी? असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारOsmanabadउस्मानाबादfundsनिधी