शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

५३ गावांसाठी एकच गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:31 IST

भूम : तालुक्यात भूम शहरासह ५३ गावांत कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी विषेश खबरदारी म्हणून पोलीस ठाण्याच्या पुढाकारातून ...

भूम : तालुक्यात भूम शहरासह ५३ गावांत कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी विषेश खबरदारी म्हणून पोलीस ठाण्याच्या पुढाकारातून ५३ गावांसाठी येथील पोलीस ठाण्यात एकाच मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रात एक वेगळा पॅटर्न म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

तालुक्यात दरवर्षी परवानगी घेऊन ४४, तर लहान मंडळांकडून ७७ गणेशमूर्तींची सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठापना केली जाते. यासाठी पोलीस यंत्रणेकडून रीतसर ऑनलाइन परवाना दिला जातो. मात्र, कोरोनामुळे गतवर्षीपासून उत्सवावर मोठी बंधने आली आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी बहुतांश पोलीस ठाण्यांनी ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित केले आहे. येथील पोलीस ठाण्याने मात्र मागील वर्षीपासून ठाण्याअंतर्गत असलेल्या ५३ गावांसाठी एकच गणेशमूर्ती स्थापन करण्याचा आगळावेगळा पॅटर्न राबविला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या हस्ते भूम पोलीस ठाण्याच्या आवारात या सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश साळवे, हभप अरुण शाळू महाराज, पत्रकर, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या दहा दिवसांच्या काळात वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, भजन, हरिजागर, कीर्तन, प्रवचन, विद्यार्थी यांच्यासाठी स्पर्धा, आदी धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.

विषेश म्हणजे तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळास येथे आरतीसाठी मान दिला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना केल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी वाढली असती. यामुळे पोलीस ठाण्याने मागील वर्षीपासून ही संकल्पना अमलात आणली आहे. यंदाही ही संकल्पना राबवली आहे.

चौकट

यंत्रणेवरील ताण झाला कमी

कोरोनापूर्वी तालुक्यात ४४ सार्वजनिक ठिकाणी परवाना घेऊन गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होत होती. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर स्थापना झाल्यापासून विसर्जन सोहळ्यापर्यंत रात्री-अपरात्री जागरूक राहून सेवा करावी लागत होती. विशेषत: विसर्जन सोहळा यशस्वी करण्यासाठी डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावावे लागत होते. परंतु, मागील वर्षीपासून ५३ गावांसाठी एकच गणपती ही संकल्पना राबविल्याने पोलीस यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.

कोट....

५३ गावांसाठी एकच गणपती ही संकल्पना राबविण्याबाबत तालुक्यातील सार्वजनिक मंडळांचे चांगले सहकार्य लाभले. शिवाय, सर्व मंडळांनी सार्वजनिक ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना केली असती तर गर्दी वाढून कोरोना संसर्गाची भीती होती. त्यामुळेच यंदाही हा निर्णय घेण्यात आला.

- मंगेश साळवे, सपोनि, भूम