शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

साडेअकराशे विद्यार्थ्यांसाठी अवघे २३ शिक्षक; आक्रमक पालकांनी झेडपी शाळेला ठोकले टाळे

By बाबुराव चव्हाण | Updated: August 7, 2024 15:33 IST

शिक्षकांसाठी पालक आक्रमक, शाळेला ठाेकले टाळे अन् गावबंदचाही निर्णय

- बाळासाहेब स्वामीईट (जि. धाराशिव) : एकीकडे जिल्हा परिषद शाळांचा पट घसरत असताना दुसरीकडे ईट सारख्या गावातील शाळेत सुमारे साडेअकराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. असे असतानाही पटसंख्येनुसार शाळेला शिक्षक नाहीत. ३६ शिक्षकांची गरज असताना आजघडीला अवघे २३ शिक्षक ज्ञानदान करताहेत. विद्यार्थ्यांचे हाेणारे नुकसान लक्षात घेऊन पालकांनी पाठपुरावा केला. मात्र, शिक्षण विभागाने ठाेस कार्यवाही केली नाही. शिक्षण विभागाच्या अशा धाेणामुळे संतप्त झालेल्या पालकांनी बुधवारी थेट शाळा गाठून कुलूप ठाेकले. यानंतर गाव बंद ठेवण्याचा निर्णयही घेतला.

भूम तालुक्यातील ईट येथे जिल्हा परिषदेची पीएम श्री प्रशाला आहे. या शाळेमध्ये पहिली ते दहावीपर्यंत सुमारे साडेअकराशे विद्यार्थी आहेत. एवढेच नाही तर नववी व दहावीसाठी सेमी इंग्रजीही सुरू आहे. सलग दहा वर्षांपासून सेमी इंग्रजीचा निकाल १०० टक्के आहे. एकूणच शाळेच्या गुणवत्तेमुळे प्रत्येक वर्षी पट वाढत चालला आहे. मात्र, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक दिले जात नाहीत. शाळा व्यवस्थापन समितीने वेळाेवेळी पाठपुरावा केला. आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या या धाेरणाविराेधात मागील तीन दिवसांपासून शाळा व्यवस्थापन समिती, स्वाभिमानी युवा ब्रिगेड यांच्या वतीने सयाजी हुंबे यांनी उपाेषण सुरू केले आहे. असे असतानाही शिक्षक मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ‘‘साहेब, आमच्या मुलांना शिकू द्या’’, असे म्हणत पालकांनी बुधवारी सकाळी दहा वाजता शाळा गाठली. शिक्षक नसतील तर मुलांना शाळेत पाठवून उपयाेग काय? असा प्रश्न करीत थेट शाळेला कुलूप ठाेकले. एवढेच नाही, गुरूवारी ईट गाव बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. जाेपर्यंत शिक्षक मिळत नाहीत, ताेवर माघार नाही असा ठाम निर्धार पालकांनी बाेलून दाखविला. याप्रसंगी संदिपान कोकाटे, विनोद वाडकर, ईश्वर देशमुख, मनोज वाघवकर, लक्ष्मण शिंदे, बाळासाहेब चव्हाण, राजाभाऊ हुंबे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमेश्वर स्वामी, उपाध्यक्ष शितल हुंबे व शेकडो पालक उपस्थित हाेते.

दाेन मुलांसाठी दाेन गुरूजी, मग आमच्यावर अन्याय का?जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा विद्यार्थ्यांअभावी अडचणीत आल्या आहेत. काही ठिकाणी तर दाेन विद्यार्थ्यांसाठी दाेन शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, आमच्याकडे साडेअकराशे विद्यार्थ्यांसाठी ३६ शिक्षक आवश्यक असताना आजघडीला २२ ते २३ कार्यरत आहेत. एवढे कमी शिक्षक असतील, तर गाेरगरीबांची मुले शिकतील कशी, असा सवाल यावेळी पालकांकडून उपस्थित करण्यात आला.

दाेन वर्षांपासून गुरूजी गैरहजरजिल्हा परिषद शाळेवरील एक शिक्षक मागील दाेन वर्षांपासून गैरहजर आहे. कागदाेपत्री हे पद भरलेले दिसते. मात्र, प्रत्यक्षात कार्यरत नसल्याने विद्यार्थ्यांचे अताेनात नुकसान हाेत आहे. त्यामुळे संबंधित गैहजर शिक्षकाची बदली करून पर्यायी शिक्षक द्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

महिला पालकांची लक्षणीय उपस्थितीसकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पालकांनी शाळा गाठली. यामध्ये पुरूष पालकांसाेबतच महिलांचीही माेठी संख्या हाेती. गाेरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान हाेणार असेल तर शाळेत मुलं पाठवायची कशासाठी, असा सवालही या पालकांतून करण्यात आला.

टॅग्स :Educationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळाOsmanabadउस्मानाबाद