शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

आता सातच्या आत घरात, आठवड्यात वाढले ६७५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:31 IST

उस्मानाबाद : कोरोनापासून बचावासाठी अजूनही पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याने रुग्णांची संख्या मोठ्या वेगाने वाढू लागली आहे. गेल्या एका ...

उस्मानाबाद : कोरोनापासून बचावासाठी अजूनही पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याने रुग्णांची संख्या मोठ्या वेगाने वाढू लागली आहे. गेल्या एका आठवड्यात ६७५ रुग्ण आढळून आले आहेत. वाढीचा हा वेग फेब्रुवारीच्या तुलनेत सातपट अधिक आहे. यामुळे एकेक निर्बंध आता वाढीस लागले असून, संचारबंदीची वेळही रात्री ९ च्या ऐवजी सायंकाळी ७ पासूनच करण्यात आली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती वरचेवर विदारक होत चालली आहे. बाधित आढळून येण्याची संख्या लक्षात घेतल्यास पुढचे दिवस पुन्हा लॉकडाऊनच्या खाईत लोटणारे दिसून येत आहेत. मागील लॉकडाऊनने शेतकरी, व्यापारी, मजूर, व्यावसायिक तसेच सर्वसामान्यांचा आर्थिक कणा मोडला होता. आता पुन्हा लॉकडाऊन लादल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे निर्बंधांची पावले विचारपूर्वक उचलली जात असताना दुसरीकडे लोक खबरदारीकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी, रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. मार्च महिना हा अतिशय घातक ठरताना दिसतोय. आतापर्यंतच्या २० दिवसांत रुग्णसंख्येने हजारी ओलांडली आहे. त्यापेक्षाही गंभीर म्हणजे, मागील एका आठवड्यात तब्बल ६७५ रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वीच्या दोन महिन्यांतइकी रुग्णसंख्या १० दिवसांतच आढळून आली आहे. प्रशासनही आता एकेक पावले कठोर उचलत असून, परिस्थिती अशीच राहिल्यास उस्मानाबादकरांची वाटचालही लॉकडाऊनच्या दिशेने सुरू झाली आहे.

वाढीचा स्पीड झाला सातपट...

मागील एका आठवड्यात ६७५ कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून आले आहेत. तत्पूर्वी संपूर्ण जानेवारी महिन्यात ५५४ तर फेब्रुवारीत ३८३ रुग्ण सापडले होते. जानेवारीत दिवसाकाठी सरासरी १८ तर फेब्रुवारीत १४ रुग्ण आढळून आले. आता मार्चमधील मागील एक आठवड्यातील आकडेवारी पाहिली असता दररोज सरासरी ९७ रुग्ण आढळून आले आहेत. फेब्रुवारीच्या तुलनेत रुग्णवाढीचा हा स्पीड सातपट वाढला आहे.

सोमवारपासून कडक अंमलबजावणी...

रुग्ण वाढत असल्याने यापूर्वी प्रशासनाने रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. दुकाने उघडण्याची व बंद करण्याची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी होती. मात्र, आता सोमवारपासून संचारबंदीची वेळ सायंकाळी ७ वाजेपासून लागू होत आहे. त्यामुळे दुकानेही सायंकाळी ७ वाजताच बंद करावी लागणार आहे. यातून वैद्यकीय व प्रवासी वाहतूक वगळण्यात आली आहे. पालिका, नगरपंचायत हद्दीतील पेट्रोलपंपही याच वेळेत बंद होतील. यातून राष्ट्रीय महामार्गावरील व उस्मानाबादेतील पोलीस पंपास वगळण्यात आले आहे.