शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

आता सातच्या आत घरात, आठवड्यात वाढले ६७५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:31 IST

उस्मानाबाद : कोरोनापासून बचावासाठी अजूनही पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याने रुग्णांची संख्या मोठ्या वेगाने वाढू लागली आहे. गेल्या एका ...

उस्मानाबाद : कोरोनापासून बचावासाठी अजूनही पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याने रुग्णांची संख्या मोठ्या वेगाने वाढू लागली आहे. गेल्या एका आठवड्यात ६७५ रुग्ण आढळून आले आहेत. वाढीचा हा वेग फेब्रुवारीच्या तुलनेत सातपट अधिक आहे. यामुळे एकेक निर्बंध आता वाढीस लागले असून, संचारबंदीची वेळही रात्री ९ च्या ऐवजी सायंकाळी ७ पासूनच करण्यात आली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती वरचेवर विदारक होत चालली आहे. बाधित आढळून येण्याची संख्या लक्षात घेतल्यास पुढचे दिवस पुन्हा लॉकडाऊनच्या खाईत लोटणारे दिसून येत आहेत. मागील लॉकडाऊनने शेतकरी, व्यापारी, मजूर, व्यावसायिक तसेच सर्वसामान्यांचा आर्थिक कणा मोडला होता. आता पुन्हा लॉकडाऊन लादल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे निर्बंधांची पावले विचारपूर्वक उचलली जात असताना दुसरीकडे लोक खबरदारीकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी, रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. मार्च महिना हा अतिशय घातक ठरताना दिसतोय. आतापर्यंतच्या २० दिवसांत रुग्णसंख्येने हजारी ओलांडली आहे. त्यापेक्षाही गंभीर म्हणजे, मागील एका आठवड्यात तब्बल ६७५ रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वीच्या दोन महिन्यांतइकी रुग्णसंख्या १० दिवसांतच आढळून आली आहे. प्रशासनही आता एकेक पावले कठोर उचलत असून, परिस्थिती अशीच राहिल्यास उस्मानाबादकरांची वाटचालही लॉकडाऊनच्या दिशेने सुरू झाली आहे.

वाढीचा स्पीड झाला सातपट...

मागील एका आठवड्यात ६७५ कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून आले आहेत. तत्पूर्वी संपूर्ण जानेवारी महिन्यात ५५४ तर फेब्रुवारीत ३८३ रुग्ण सापडले होते. जानेवारीत दिवसाकाठी सरासरी १८ तर फेब्रुवारीत १४ रुग्ण आढळून आले. आता मार्चमधील मागील एक आठवड्यातील आकडेवारी पाहिली असता दररोज सरासरी ९७ रुग्ण आढळून आले आहेत. फेब्रुवारीच्या तुलनेत रुग्णवाढीचा हा स्पीड सातपट वाढला आहे.

सोमवारपासून कडक अंमलबजावणी...

रुग्ण वाढत असल्याने यापूर्वी प्रशासनाने रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. दुकाने उघडण्याची व बंद करण्याची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी होती. मात्र, आता सोमवारपासून संचारबंदीची वेळ सायंकाळी ७ वाजेपासून लागू होत आहे. त्यामुळे दुकानेही सायंकाळी ७ वाजताच बंद करावी लागणार आहे. यातून वैद्यकीय व प्रवासी वाहतूक वगळण्यात आली आहे. पालिका, नगरपंचायत हद्दीतील पेट्रोलपंपही याच वेळेत बंद होतील. यातून राष्ट्रीय महामार्गावरील व उस्मानाबादेतील पोलीस पंपास वगळण्यात आले आहे.