शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

'पदाचं तारतम्यच राहिलं नाही,तेव्हा कुठे नादाला लागायचे';शरद पवारांची राज्यपालांवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 17:46 IST

मध्यंतरी काही जण पक्ष सोडून गेले. ठीक आहे, त्यांची चिंता नाही.

उस्मानाबाद : राज्यपालांनी काही भाषणे केली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काही विधाने केली. जेव्हा पद व अधिकार याचे तारतम्यच राहिले नाही तर कुठे नादाला लागायचे, आशा शब्दांत खा. शरद पवार ( Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhgatsingh Koshiyari) यांचा रविवारी पाडोळीत समाचार घेतला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील पाडोळी येथे विकास कामांच्या उदघाटनासाठी रविवारी ते येथे आले होते. मंचावर आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले, आपले राज्य हे हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवरायांनी अठरापगड जाती-धर्माची लोकं सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्यांनी कधी भोसलेशाही होऊ दिली नाही. नाहीतरी आपल्या देशात मुघल, आदिलशाही, कुतुबशाही अशा राजवटी होऊन गेल्या. हाच विचार घेऊन राज्याची वाटचाल सुरू आहे.

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. काही पदाधिकाऱ्यांनी हा विषय समोर आणल्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना फोन करून आढावा घेतला व हे विषय लवकर सोडविण्यासाठी आग्रह केला. यासाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू, असा शब्द पवार यांनी यावेळी दिला.

जे गेले ते गेले, चिंता नाही...पक्षाचे संस्थापक सदस्य राहिलेले डॉ. पद्मसिंह पाटील व आ. राणा जगजितसिंह पाटील यांचा नामोल्लेख न करता पवार म्हणाले, या जिल्ह्याने आम्हाला इतकी वर्षे भरभरून प्रेम दिले. मध्यंतरी काही जण पक्ष सोडून गेले. ठीक आहे, त्यांची चिंता नाही. तुम्ही सर्वजण सोबत असताना कशाला चिंता करायची, अशी साद त्यांनी उपस्थितांना घातली.

कोण म्हणतं मी म्हातारा...मघाशी काही जण बोलताना माझ्या वयाचा उल्लेख सातत्याने करत होते. मागेही मी म्हटले होते की तुम्हाला काय माहीत मी थकलोय म्हणून. जोपर्यंत या समाजाची साथ आहे, तोपर्यंत थकणार नाही आणि थांबणारही नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी