शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

'पदाचं तारतम्यच राहिलं नाही,तेव्हा कुठे नादाला लागायचे';शरद पवारांची राज्यपालांवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 17:46 IST

मध्यंतरी काही जण पक्ष सोडून गेले. ठीक आहे, त्यांची चिंता नाही.

उस्मानाबाद : राज्यपालांनी काही भाषणे केली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काही विधाने केली. जेव्हा पद व अधिकार याचे तारतम्यच राहिले नाही तर कुठे नादाला लागायचे, आशा शब्दांत खा. शरद पवार ( Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhgatsingh Koshiyari) यांचा रविवारी पाडोळीत समाचार घेतला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील पाडोळी येथे विकास कामांच्या उदघाटनासाठी रविवारी ते येथे आले होते. मंचावर आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले, आपले राज्य हे हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवरायांनी अठरापगड जाती-धर्माची लोकं सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्यांनी कधी भोसलेशाही होऊ दिली नाही. नाहीतरी आपल्या देशात मुघल, आदिलशाही, कुतुबशाही अशा राजवटी होऊन गेल्या. हाच विचार घेऊन राज्याची वाटचाल सुरू आहे.

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. काही पदाधिकाऱ्यांनी हा विषय समोर आणल्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना फोन करून आढावा घेतला व हे विषय लवकर सोडविण्यासाठी आग्रह केला. यासाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू, असा शब्द पवार यांनी यावेळी दिला.

जे गेले ते गेले, चिंता नाही...पक्षाचे संस्थापक सदस्य राहिलेले डॉ. पद्मसिंह पाटील व आ. राणा जगजितसिंह पाटील यांचा नामोल्लेख न करता पवार म्हणाले, या जिल्ह्याने आम्हाला इतकी वर्षे भरभरून प्रेम दिले. मध्यंतरी काही जण पक्ष सोडून गेले. ठीक आहे, त्यांची चिंता नाही. तुम्ही सर्वजण सोबत असताना कशाला चिंता करायची, अशी साद त्यांनी उपस्थितांना घातली.

कोण म्हणतं मी म्हातारा...मघाशी काही जण बोलताना माझ्या वयाचा उल्लेख सातत्याने करत होते. मागेही मी म्हटले होते की तुम्हाला काय माहीत मी थकलोय म्हणून. जोपर्यंत या समाजाची साथ आहे, तोपर्यंत थकणार नाही आणि थांबणारही नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी