शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
4
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
5
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
6
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
7
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
8
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
9
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
10
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
11
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
12
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
13
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
14
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
15
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
16
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
17
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
18
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
19
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
20
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोत ठेकेदार नको, शासकीय यंत्रणा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST

उस्मानाबाद : ग्रामीण विकासात रोजगार हमी योजना ही मोलाची भूमिका बजावत आलेली आहे. असे असले तरी अद्यापपर्यंत शासकीय यंत्रणा ...

उस्मानाबाद : ग्रामीण विकासात रोजगार हमी योजना ही मोलाची भूमिका बजावत आलेली आहे. असे असले तरी अद्यापपर्यंत शासकीय यंत्रणा उभी राहू शकलेली नाही. त्यामुळे मनुष्यबळासाठी ठेकेदार नियुक्त करण्याऐवजी पूर्वीच्याच पद्धतीने शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून कर्मचारी निवडल्यास त्यांची पिळवणूक थांबेल, असा विश्वास व्यक्त करीत आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्राद्वारे साकडे घातले आहे.

रोजगार हमी योजनेने मजूरवर्गास मोठा आधार मिळालेला आहेच. शिवाय, ग्रामीण भागाच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. विशेष म्हणजे, ही योजना महाराष्ट्राने देशाला दिलेली देण आहे. असे असतानाही रोहयोची स्वतंत्र शासकीय यंत्रणा आजवर उभी राहू शकलेली नाही. ती निर्माण करण्याची गरज आहे. नुकताच शासनाने या योजनेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना योजना सुरू असेपर्यंत किंवा नियत वयोमानापर्यंत कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेऊन मोठा दिलासा आहे. हे कर्मचारी वर्षानुवर्षे योजनेची सर्व कामे यशस्वीरीत्या पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान, त्यांच्या नियुक्त्यांसाठी खासगी ठेकेदार नेमण्याऐवजी पूर्वीच्याच पद्धतीने नरेगा आयुक्तालयाच्या माध्यमातून किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील सेतू समितीच्या माध्यमातून निवड प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवरही अधिकचा भार पडणार नाही व कर्मचाऱ्यांची पिळवणूकही होणार नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासोबतच स्वत:ची यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी विनंतीही आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.