शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

रोहयोत ठेकेदार नको, शासकीय यंत्रणा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST

उस्मानाबाद : ग्रामीण विकासात रोजगार हमी योजना ही मोलाची भूमिका बजावत आलेली आहे. असे असले तरी अद्यापपर्यंत शासकीय यंत्रणा ...

उस्मानाबाद : ग्रामीण विकासात रोजगार हमी योजना ही मोलाची भूमिका बजावत आलेली आहे. असे असले तरी अद्यापपर्यंत शासकीय यंत्रणा उभी राहू शकलेली नाही. त्यामुळे मनुष्यबळासाठी ठेकेदार नियुक्त करण्याऐवजी पूर्वीच्याच पद्धतीने शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून कर्मचारी निवडल्यास त्यांची पिळवणूक थांबेल, असा विश्वास व्यक्त करीत आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्राद्वारे साकडे घातले आहे.

रोजगार हमी योजनेने मजूरवर्गास मोठा आधार मिळालेला आहेच. शिवाय, ग्रामीण भागाच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. विशेष म्हणजे, ही योजना महाराष्ट्राने देशाला दिलेली देण आहे. असे असतानाही रोहयोची स्वतंत्र शासकीय यंत्रणा आजवर उभी राहू शकलेली नाही. ती निर्माण करण्याची गरज आहे. नुकताच शासनाने या योजनेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना योजना सुरू असेपर्यंत किंवा नियत वयोमानापर्यंत कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेऊन मोठा दिलासा आहे. हे कर्मचारी वर्षानुवर्षे योजनेची सर्व कामे यशस्वीरीत्या पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान, त्यांच्या नियुक्त्यांसाठी खासगी ठेकेदार नेमण्याऐवजी पूर्वीच्याच पद्धतीने नरेगा आयुक्तालयाच्या माध्यमातून किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील सेतू समितीच्या माध्यमातून निवड प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवरही अधिकचा भार पडणार नाही व कर्मचाऱ्यांची पिळवणूकही होणार नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासोबतच स्वत:ची यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी विनंतीही आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.