शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

विवाह नोंदणी प्रमाणपत्र हवेय? अगोदर वृक्ष लावा; हगलूर ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

By गणेश कुलकर्णी | Updated: August 21, 2023 16:36 IST

गावकऱ्यांनीही या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले आहे.

धाराशिव : गावातील नव्याने विवाह केलेल्या दाम्पत्याने विवाह दाखला मिळण्यासाठी आपल्या घरासमोर नवीन वृक्ष लागवड करून फोटो काढून ग्रामपंचायत कार्यालयात दाखविल्यानंतरच विवाह नोंदणीचा दाखला देण्याचा ठराव घेत तुळजापूर तालुक्यातील हगलूर ग्रामपंचायतीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे.

हवा शुद्ध करण्यासाठी अधिकाधिक झाडे लावणे आवश्यक आहे. झाडे आणि वनस्पती मानवी आरोग्यासोबतच पर्यावरणही निरोगी ठेवतात. ते हवामानावरही नियंत्रण ठेवतात. अधिक झाडे लावल्याने वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राहते. हीच बाब लक्षात घेत तालुक्यातील हगलूर येथील सरपंच ॲड. जयपाल पाटील यांनी मांडलेल्या संकल्पनेतून नवदाम्पत्याने घरासमोर एक झाड लावून झाडाचा फोटो काढून ग्रामपंचायत कार्यालयात दाखवल्यानंतर विवाह प्रमाणपत्र देण्याचा ठराव घेण्यात आला. गावकऱ्यांनीही या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले आहे.

यावेळी सरपंच ॲड. जयपाल पाटील, उपसरपंच महेश गवळी, ग्रामसेविका एस. एस. कदम, माजी सरपंच नालंदा पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष अंकुश पाटील, सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब दराडे, रोजगार सेवक जयकुमार घुगे, संगणक परिचालक रफिक शेख, शिपाई आणि जलसुरक्षक दिनकर गवळी, ग्रामपंचायत सदस्य अलका पाटील, कौशल्याबाई घुगे, शीतल घुगे, रंजना पवार, संजय पवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

वृक्षारोपण वाढणे महत्वाचेगावामध्ये वृक्षारोपण होऊन चांगले वातावरण निर्माण होईल. तसेच आरोग्यदायक वातावरण राहील. उन्हाळ्यात उन्हाचा त्रास लोकांना जाणवणार नाही. यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. त्यामुळेच विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी ‘एक झाड लावा आणि त्याचा फोटो ग्रामपंचायतीला दाखवा’ असा नियम लागू केला आहे. त्याची अंमलबजावणीही करण्यात येणार आहे.- ॲड. जयपाल पाटील, सरपंच

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतOsmanabadउस्मानाबाद