शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

नळदुर्गचा किल्ला पुन्हा ‘पुरातत्त्व’च्या ताब्यात; खासगी संस्थेसोबतचा संगोपन करार संपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 20:30 IST

महाराष्ट्र शासनाने येथील किल्ला २५ जुलै २०१४ रोजी युनिटी मल्टिकॉन प्रा. लिमिटेड या कंपनीला दहा वर्षांच्या कालावधीसाठी महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक योजना अंतर्गत सोपविला होता.

नळदुर्ग (जि. धाराशिव) : पर्यटक व इतिहासप्रेमींमध्ये मोठे आकर्षण तयार केलेल्या नळदुर्गच्या किल्ल्याच्या चाव्या आता पुन्हा ‘पुरातत्त्व’ विभागाच्या हाती गेल्या आहेत. एका खासगी संस्थेसोबत केलेला संगोपन करार संपुष्टात आल्याने पुरातत्त्व विभागाने किल्ला ताब्यात घेऊन त्यावर नऊ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. दरम्यान, तोकड्या कर्मचाऱ्यांवर देखभालीची जबाबदारी सोडल्याने किल्ला पुन्हा भग्नावस्थेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नळदुर्ग येथील भुईकोट किल्ला बांधणीची सुरुवात राजा कल्याणी यांच्या काळात तेराव्या शतकात झाली. त्यानंतर विविध राजे-महाराजे यांनी क्रांती घडवून किल्ल्यावर कब्जा केला. किल्ला बांधून जवळपास सातशे वर्षे लोटले तरी हा किल्ला सुस्थितीत आहे. तो बेसॉल्ट प्रकारात मोडणाऱ्या काळ्या पाषाण दगडाने बांधलेला आहे. या ऐतिहासिक वास्तूची देखभाल करण्याची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे आहे. महाराष्ट्र शासनाने हा किल्ला राज्य स्मारक म्हणून घोषित करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी पुरातत्त्व खात्याकडे सोपवली होती. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने येथील किल्ला २५ जुलै २०१४ रोजी युनिटी मल्टिकॉन प्रा. लिमिटेड या कंपनीला दहा वर्षांच्या कालावधीसाठी महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक योजना अंतर्गत बाग, बगिचा विकसित करणे, तटभिंती, वास्तू यांची डागडुजी करणे, पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची सोय करणे, स्वच्छतागृह बांधणे, किल्ला अतिक्रमणापासून मुक्त ठेवणे आदी कामांसाठी सोपविला होता. हा करार आता संपुष्टात आला आहे. सोमवारी पुरातत्त्व विभागाच्या सहसंचालिका जया वाहने यांनी किल्ल्यास भेट देऊन पाहणी केली.

...तर खुललेल्या सौंदर्याचे काय?करारातील मुद्दा क्रमांक ३६ अन्वये करार संपुष्टात आल्यानंतर किल्ला परिसरात केलेली लँड स्केपिंगची कामे, बागबगिचे, कारंजे, फुलांची झाडे व विकसित केलेली गवती लॉन काढून घेऊन किल्ला पूर्ववत करून द्यावे, असे नमूद केले आहे. कंपनीने जर हे सर्व काढून घेतले तर किल्ला भग्न होईल व पर्यटकही इकडे फिरकणार नाहीत.

रोजगारावरही होणार परिणामसध्या करार संपल्याने पुरातत्त्व खात्याने तीन चौकीदार, दोन पहारेकरी, प्रत्येकी एक शिपाई, माळी, किल्लेदार व पर्यवेक्षक तैनात केले आहेत. कंपनीकडून सुमारे पन्नासावर कर्मचारी कार्यरत होते. शिवाय, पर्यटकांमुळे स्थानिक रोजगारही चांगला विकसित झाला होता. या सर्वांपुढे आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :FortगडOsmanabadउस्मानाबाद