शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

बेंगळुरुच्या एमटेक तरुणाची दिल्लीवर चाल; शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पायी भारत यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 20:16 IST

farmers protest : शेतीचा वारसा लाभलेल्या कुटूंबातील या तरुणाने दिल्ली बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कर्नाटकातील मलेमहादेश्वर येथून ११ फेब्रुवारी रोजी पायी यात्रा सुरु केली.

उस्मानाबाद : अन्नदाता शेतकर्यांवर त्यांच्या हक्कासाठी वर्ष-वर्ष आंदोलन चालविण्याची वेळ येते, हे पाहून व्यथित झालेल्या बेंगळुरुच्या एका उच्चशिक्षित तरुणाने शेतकरीआंदोलनाचा भारतभर जागर घालण्याचा निर्धार करीत पायी यात्रा सुरु केली आहे. मंगळवारी सायंकाळी या तरुणाने चालतच उस्मानाबाद गाठले. यावेळी त्याचा शेतकर्यांसाठी लढणार्या संघटनांनी सन्मान केला.

नागराज कलकुटगर असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे शिक्षण एमटेकपर्यंत झालेले असून, शेतीचा वारसा लाभलेल्या कुटूंबातील या तरुणाने दिल्ली बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कर्नाटकातील मलेमहादेश्वर येथून ११ फेब्रुवारी रोजी पायी यात्रा सुरु केली. दररोज २५ किलोमीटर चालून वाटेत भेटणार्या शेतकर्यांमध्ये कायद्याविरुद्ध जागृती करीत तो निघाला आहे. मध्यंतरी दुसरा लॉकडाऊन लागला तेव्हा काही काळ ही यात्रा स्थिगित केली होती. मात्र, ३ जुलैपासून नागराजने चित्रदुर्ग येथून पुन्हा या यात्रेला सुरुवात केली. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी नागराजने उस्मानाबाद गाठले. तेव्हा येथील किसान सभेच्या वतीने सचिव सुदेश इंगळे यांनी त्याचा सन्मान केला. यावेळी लखीमपूर येथील घटनेचा निषेधही करण्यात आला. उस्मानाबादेत मुक्काम केल्यानंतर बुधवारी सकाळी नागराजची पदयात्रा पुढे रवाना झाली. यावेळी किसान सभेच्या पदाधिकार्यांसह नागराजला शुभेच्छा दिल्या.

तो जगला तर जग जगेलमागील वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करीत आहेत. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज तयार करण्याचे काम मागील वर्षभरात झाले. तरीही शेतकरी मागे सरला नाही. सरकारी यंत्रणांची दमनशाही झुगारून हे आंदोलन सुरू ठेवले आहे. माझ्यासारख्या तरुणास हे सगळे पाहून अस्वस्थ वाटत होतं. मग मी ठरवलं की आपण देशभर यात्रा करीत लोकांमध्ये जागृती करावी. माझा उद्देश इतकाच आहे की शेतकरी हा अन्नदाता आहे, तो जगला तर जग जगेल. यासाठीच माझा एक छोटा प्रयत्न सुरु आहे.-नागराज कलकुटगर 

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनOsmanabadउस्मानाबाद