शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी वसुलीसाठी महावितरण अधिकाऱ्यांची दारोदार भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST

वाशी : ५ कोटी २० लाख रुपयांच्या थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारीही आता दररोज ग्राहकांच्या दारात जात असून, ...

वाशी : ५ कोटी २० लाख रुपयांच्या थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारीही आता दररोज ग्राहकांच्या दारात जात असून, चालू महिन्यात ४० लाखांची वसुली करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अभियंत्यांनी दिली़ दरम्यान, तालुक्यात ग्राहकांच्या सेवेसाठी वीज कंपनीचे दोन विभाग असून, तिसऱ्या विभागाचीही निर्मिती करावी, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे़

वाशी तालुक्यातील पारगाव व वाशी असे दोन विभाग असून, या दोन्ही विभागाअंतर्गत औद्योगिकच्या १३३ ग्राहकांकडे ५३ लाख ५७ हजार, निवासी ७ हजार ९६७ ग्राहकांकडे ४ कोटी ३३ लाख तर वाणिज्यच्या ४४४ ग्राहकांकडे ४७ लाख ९७ हजार अशी थकबाकी आहे. त्यामुळे वीज कंपनीचे उपविभागीय अभियंता रमेश शेंद्रे हे सहकाऱ्यांसह वीजबिलाच्या वसुलीसाठी दारोदार फिरताना दिसून येत आहेत़ चालू महिनाभरात चाळीस लाखांची वसुली झाली असून, ती नगण्य असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार वसुलीची तगादा विद्युत ग्राहकांना लावला जात आहे़ उपरोक्त थकबाकीशिवाय तालुक्यात पाणीपुरवठ्याचे ८३ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ७ कोटी १० लाख, दिवाबत्तीच्या ७९ ग्राहकांकडे १९ कोटी तर शेतीपंपाच्या ९ हजार ८०९ ग्राहकांकडे ९५ कोटी ७७ लाख रूपये थकबाकी अडकली आहे़ शासनाच्या वतीने विविध विद्युतबिलाच्या थकबाकीसाठी योजना जाहीर केल्या तरी विद्युतग्राहक वीज कंपनीच्या याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नाइलाजास्तव वीजबिलाची वसुली न दिल्यास विद्युतपुरवठा खंडित करावा लागत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर भूम व कळंब तालुक्यांतील ५४ गावांचा तालुका झाला़ लोकसंख्या, विद्युत ग्राहक यांच्या तुलनेनुसार तीन विभाग असणे गरजेचे आहे़ सध्या पारगाव व वाशी असे दोन विभाग असून, तालुक्यातील वाढलेल्या ग्राहकांची संख्या लक्षात घेता तालुक्यातील विद्युत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी तेरखेडा येथे तिसऱ्या विभागाच्या निर्मितीची गरज ग्राहकांमधून व्यक्त केली जात आहे.

अडचणी सुटेनात...

सहा महिन्यांपूर्वी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या योजनेमध्ये सहभागी होत बिलाचा भरणा करून वीजबिल ‘झिरो’ केले होते. मात्र, यानंतर शेतीपंपाचा वापर चालू नसतानाही अनेक शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीजबिले देण्यात आली आहेत. याची चौकशी करण्यासाठी काही शेतकरी वीज कंपनीच्या दारात गेले असता कर्मचाऱ्यांकडून त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांची वीजबिलाची अडचण अजूनही कायम असून, असे प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.