शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

मोबाइल ॲप लावणार अपघातांना ब्रेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : राज्य महामार्गावर रस्त्याचे काम उत्तम झाले असले तरी अपघाताचे प्रमाण मात्र घटले नाही. उलट त्यामध्ये आणखी वाढ ...

उस्मानाबाद : राज्य महामार्गावर रस्त्याचे काम उत्तम झाले असले तरी अपघाताचे प्रमाण मात्र घटले नाही. उलट त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. या वाढत्या अपघातांना नियंत्रित करण्यासाठी आयआरएडी अर्थात इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट प्रकल्प राबविला जाणार आहे. हे एक सॉफ्टवेअर आहे. त्यामध्ये अपघाताची संपूर्ण माहिती संकलित केल्यानंतर त्यातून अपघाताचे कारण शोधून त्यावर उपाययोजना करणे सुलभ होणार आहे. अपघात घडल्यानंतर त्या ठिकाणचा ऑनलाइन पंचनामा होणार आहे. याशिवाय अपघाताच्या वेळी त्या ठिकाणचे वातावरण कसे होते, याची नोंद होईल, रस्त्याची स्थिती कशी आहे. गाडीची स्थिती कशी होती. या संपूर्ण बाबीची माहिती सॉफ्टवेअरवर ऑनस्पॉट भरली जाणार आहे. यामुळे रस्त्याचा संपूर्ण अहवाल या सॉफ्टवेअरवर येणार आहे. यातून अपघाताचे नेमके कारण पुढे येईल. या दृष्टीने आयआरडी प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

आता नव्याने अपघाताची नोंद होणार

पूर्वी अपघात घडल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभाग अपघातग्रस्त स्थळावर प्रत्यक्ष पाहणी करीत होते. संबंधिताना माहिती देत होते.

आता ही संपूर्ण माहिती आयआरएडी सॉफ्टवेअरवर डाऊनलोड होणार आहे. अद्ययावत प्रणालीमध्ये सध्यातरी कुठलीही माहिती डाऊनलोड झाली नाही. पुढील काळात ही माहिती नवीन प्रकल्पातून भरली जाणार आहे.

असे चालणार कामकाज

या प्रकल्पामध्ये अपघाताचा स्पॉट पंचनामा ऑनलाइन होणार आहे. या ठिकाणची संपूर्ण रस्त्याची कंडिशन कशी होते, याची नोंद या ॲपमध्ये घेतली जाणार आहे. त्यासाठी बांधकाम विभागाची यंत्रणा, पोलीस यंत्रणा, वैद्यकीय यंत्रणा, उपप्रादेशिक परिवहन विभागाची यंत्रणा एकत्र येऊन हा पंचनामा करेल आणि संपूर्ण माहिती संकलित करून सॉफ्टवेअरवर अपलोड करील. सध्या पोलीस व आरटीओ विभाग दोन विभागाचे कामकाज सुरू आहे.

६६ जणांना प्रशिक्षण

उपप्रादेशिक परिवहन विभागाने रस्ते अपघात नियंत्रित करण्यासाठी आयआरएडी म्हणजेच इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेट प्रकल्प या प्रशिक्षणासाठी ११ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. तर जिल्ह्यातील १८ पोलीस ठाण्यातील ५५ अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षित केले आहे.

अपघात घडल्यास माहिती कशी भरायची, याबाबत माहिती दिली आहे.

जिल्ह्यातील रस्ते अपघात

रोड अपघात जखमी मृत्यू

२०१९ ६६१ ५५१ २३८

२०२० ४७५ ३८४ २३२

२०१९ मध्ये झालेले अपघात ६६१

आतापर्यंत ८५ अपघातांची नोंद

जिल्ह्यात मे महिन्यापासून या प्रकल्पांतर्गत कामकाम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील १८ पोलीस ठाण्यांतर्गत जानेवारी २०२१ पासून घडलेल्या अपघातांची नोंद केली जात आहे. अद्यापपर्यंत ८५ अपघातांची नोंद झालेली आहे.

जीव वाचविण्यास होईल मदत

या प्रकल्पात आरटीओ, पोलीस, वैद्यकीय यंत्रणा, बांधकाम विभाग यंत्रणा एकत्र येऊन काम करणार आहेत. माहिती संकलित झाल्यानंतर कोणत्या ठिकाणी अपघात जास्त हाेतात. अपघाताचे नेमके कारण हे शोधणे सोपे होणार आहे. त्यामुळे अपघात रोखण्यास मदत होईल व त्यातून जीव वाचण्यास मदत होणार आहे.