शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

‘मराठा क्रांती’चा एल्गार आता तुळजापुरातून; आंदोलनाची नव्याने होणार आखणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 17:09 IST

सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची राज्यव्यापी बैठक बुधवारी तुळजाभवानी मंदिरातील पुजारी मंडळाच्या कार्यालयात घेण्यात आली़

ठळक मुद्देसकल मराठा समाजच्या वतीने पुन्हा नव्याने आंदोलनाची आखणी केली जात आहे. यावेळचे मोर्चे मूक न राहता आक्रमक राहण्याचे संकेत आज दुपारी तुळजापुरात झालेल्या बैठकीतून देण्यात आले़

तुळजापूर (उस्मानाबाद) : ५८ मूकमोर्चे काढूनही या सरकारला मराठा समाजाच्या मागण्यांविषयी थोडीही आस्था दिसून आली नाही. ज्या घोषणा सरकारने केल्या, त्या फसव्या आहेत़ एकाही घोषणेवर अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप करीत सकल मराठा समाजच्या वतीने पुन्हा नव्याने आंदोलनाची आखणी केली जात आहे. यावेळचे मोर्चे मूक न राहता आक्रमक राहण्याचे संकेत आज दुपारी तुळजापुरात झालेल्या बैठकीतून देण्यात आले़

सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची राज्यव्यापी बैठक बुधवारी तुळजाभवानी मंदिरातील पुजारी मंडळाच्या कार्यालयात घेण्यात आली़ यावेळी पदाधिकाऱ्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली़ राज्यभरात ५८ मूकमोर्चे निघाल्यानंतर सरकारला जाग आली़ त्यानंतर त्यांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळास भरीव तरतूद, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे अर्धे शैक्षणिक शुल्क माफ, अशा काही घोषणा केल्या होत्या़ त्या निव्वळ फसव्या निघाल्या आहेत़ झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी आता मूक नव्हे ‘गनिमी कावा’ पद्धतीने आक्रमक मोर्चे काढण्याचा ठराव बैठकीत मांडण्यात आला़ हा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यानंतर राज्यभर असे मोर्चे काढण्यासाठी नव्याने आखणी करण्याचा कार्यक्रम लगेच हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले़

शिवाय, आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात तुळजापुरातून करण्यात येणार आहे़ यानंतर राज्याच्या इतरही भागात अशी आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात आला़ यावेळी आबासाहेब पाटील, रमेश कैरे पाटील, श्रीमंत कोकाटे, सज्जनराव साळुंके, वसंतराव पाटील, किशोर पवार, जगदीश पाटील, सतिश खोपडे, अर्जुन साळुंके, नितीन पवार, प्रतिक रोचकरी, सज्जन जाधव, जीवनराजे इंगळे, विष्णु इंगळे, जगदीश पलंगे, आलोक शिंदे, सुनिल नागणे, रामभाऊ गायकवाड, विजय पवार, देविदास पाटील, धनंजय देशमुख, भैय्या पाटील, प्रदीप मुंडे उपस्थित होते़

२९ जूनला जागरण-गोंधऴ़मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलनाचे दुसरे पर्व तुळजापूर येथून सुरु करण्यात येणार आहे़ २९ जून रोजी तुळजाभवानी मातेच्या दरबारात जागरण-गोंधळ घालून आंदोलनास प्रारंभ करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले़ यावेळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले़सरकारकडे मागण्या : - मराठा आरक्षणाची तारीख व वेळ निश्चत करावी़- शैक्षणिक सवलतींचा जी़आऱ काढावा़- शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे़- अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्त्या कराव्यात़

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाState Governmentराज्य सरकारagitationआंदोलन