शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा धरण ओव्हर फ्लो, तीन जिल्ह्याची चिंता मिटली; दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 13:49 IST

लातूर, धाराशीव व बीड अशा तीन जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा मांजरा प्रकल्प यंदा 'थेंबे थेंबे तळं साचे' याची प्रचिती देत अखेर बुधवारी दुपारी ओव्हरफ्लो झाला.

कळंब ( धाराशिव): मागच्या दोन महिन्यापासून थोडा थोडा येवा दाखल होत असलेल्या मांजरा प्रकल्पाची झोळी यंदा भरणार का? असा प्रश्न निर्माण नागरिकांत होता. लातूर, धाराशीव व बीड अशा तीन जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा मांजरा प्रकल्प यंदा 'थेंबे थेंबे तळं साचे' याची प्रचिती देत अखेर बुधवारी दुपारी ओव्हरफ्लो झाला. प्रकल्पाचे दोन दरवाजे ०.२५ मिटरने उंचावून १ हजार ७३० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

धाराशीव जिल्हातील कळंबच्या दाभा व केज तालुक्यातील धनेगावच्या सिवेवर १९८० साली मांजरा नदीवर मांजरा प्रकल्पाची बांधणी झाली. यानंतर या प्रकल्पात प्रथमतः १९८०-८१ हंगामात पाणीसाठा झाला. तो ९७ दलघमी इतका होता. यानंतर पुढील ४४ वर्षाच्या काळात हा प्रकल्प धाराशीव जिल्हातील कळंब, बीड जिल्ह्य़ातील केज, अंबाजोगाई व लातूर जिल्ह्य़ातील लातूर व रेणापूर तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरत आला. याशिवाय लातूर शहर, लातूर औद्योगिक वसाहत, कळंब, केज, अंबाजोगाई, धारूर, मुरूड अशा शहरासह शेकडो गावातील पाण्याचा प्रश्न भागवणारा प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जाते. यामुळेच हा प्रकल्प भरला का? याकडे तिन्ही जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. यंदा प्रकल्पात प्रथमच जून महिन्यातही थोडासा का होईना येवा दाखल झाला. पुढे जुलै, ऑगस्ट महिन्यात अल्पसा का होईना येवा सातत्य सुरूच राहिले . मात्र, तो येवा दखलपात्र नसल्याने प्रकल्प महत्तम पाणी पातळीकडे जात नव्हता. यातच २ सप्टेंबरला पाणलोट क्षेत्रातील कळंब, वाशी, भूम, बीड, पाटोदा भागात जोरदार पाऊस झाला अन् हंगामातील दखलपात्र येव्याची नोंद होवू लागली. यातही २१ सप्टेंबरनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला अन् प्रकल्प आपल्या ६४२ मिटर पाणी पातळीच्या समीप पोहचला. 

सतराव्यांदा झाला ओव्हरफ्लो... २०२०, २०२१ आणि २०२२ अशा सलग तीन वर्ष धरण भरले होते. त्यानंतर गतवर्षी २०२३ ला पाऊस कमी झाल्याने धरणात केवळ २९ टक्के पाणीसाठा होता. आता २०२४ ला एक वर्षाच्या खंडानंतर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. २३ व २४ सप्टेंबर रोजी पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे ८५ टक्क्यावरचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहचत प्रकल्पाची झोळी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास भरली गेली. ४४ वर्षांच्या इतिहासात पूर्ण क्षमतेने भरण्याची ही सतरावी वेळ आहे असे शाखा अभियंता सुरज निकम यांनी सांगितले.

विसर्ग सुरू, दोन दारे उंचावली...बुधवारी दुपारी धरणाची महत्तम पाणी पातळी ६४२.२ मिटर व साठवण क्षमता २२४.०९३ दलघमी 'मेंटेन' ठेवण्यासाठी द्वॉर परिचालन कार्यवाही सुरू करण्यात आली. प्रकल्पाचे दोन दरवाजे ०.२५ मिटरने उंचावून तब्बल १ हजार ७६० क्युसेक्स या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तत्पूर्वी मंगळवारी रात्रीच नदीकाठच्या गावात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला होता.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणRainपाऊसOsmanabadउस्मानाबाद