शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

मांजरा धरण ओव्हर फ्लो, तीन जिल्ह्याची चिंता मिटली; दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 13:49 IST

लातूर, धाराशीव व बीड अशा तीन जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा मांजरा प्रकल्प यंदा 'थेंबे थेंबे तळं साचे' याची प्रचिती देत अखेर बुधवारी दुपारी ओव्हरफ्लो झाला.

कळंब ( धाराशिव): मागच्या दोन महिन्यापासून थोडा थोडा येवा दाखल होत असलेल्या मांजरा प्रकल्पाची झोळी यंदा भरणार का? असा प्रश्न निर्माण नागरिकांत होता. लातूर, धाराशीव व बीड अशा तीन जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा मांजरा प्रकल्प यंदा 'थेंबे थेंबे तळं साचे' याची प्रचिती देत अखेर बुधवारी दुपारी ओव्हरफ्लो झाला. प्रकल्पाचे दोन दरवाजे ०.२५ मिटरने उंचावून १ हजार ७३० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

धाराशीव जिल्हातील कळंबच्या दाभा व केज तालुक्यातील धनेगावच्या सिवेवर १९८० साली मांजरा नदीवर मांजरा प्रकल्पाची बांधणी झाली. यानंतर या प्रकल्पात प्रथमतः १९८०-८१ हंगामात पाणीसाठा झाला. तो ९७ दलघमी इतका होता. यानंतर पुढील ४४ वर्षाच्या काळात हा प्रकल्प धाराशीव जिल्हातील कळंब, बीड जिल्ह्य़ातील केज, अंबाजोगाई व लातूर जिल्ह्य़ातील लातूर व रेणापूर तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरत आला. याशिवाय लातूर शहर, लातूर औद्योगिक वसाहत, कळंब, केज, अंबाजोगाई, धारूर, मुरूड अशा शहरासह शेकडो गावातील पाण्याचा प्रश्न भागवणारा प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जाते. यामुळेच हा प्रकल्प भरला का? याकडे तिन्ही जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. यंदा प्रकल्पात प्रथमच जून महिन्यातही थोडासा का होईना येवा दाखल झाला. पुढे जुलै, ऑगस्ट महिन्यात अल्पसा का होईना येवा सातत्य सुरूच राहिले . मात्र, तो येवा दखलपात्र नसल्याने प्रकल्प महत्तम पाणी पातळीकडे जात नव्हता. यातच २ सप्टेंबरला पाणलोट क्षेत्रातील कळंब, वाशी, भूम, बीड, पाटोदा भागात जोरदार पाऊस झाला अन् हंगामातील दखलपात्र येव्याची नोंद होवू लागली. यातही २१ सप्टेंबरनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला अन् प्रकल्प आपल्या ६४२ मिटर पाणी पातळीच्या समीप पोहचला. 

सतराव्यांदा झाला ओव्हरफ्लो... २०२०, २०२१ आणि २०२२ अशा सलग तीन वर्ष धरण भरले होते. त्यानंतर गतवर्षी २०२३ ला पाऊस कमी झाल्याने धरणात केवळ २९ टक्के पाणीसाठा होता. आता २०२४ ला एक वर्षाच्या खंडानंतर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. २३ व २४ सप्टेंबर रोजी पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे ८५ टक्क्यावरचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहचत प्रकल्पाची झोळी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास भरली गेली. ४४ वर्षांच्या इतिहासात पूर्ण क्षमतेने भरण्याची ही सतरावी वेळ आहे असे शाखा अभियंता सुरज निकम यांनी सांगितले.

विसर्ग सुरू, दोन दारे उंचावली...बुधवारी दुपारी धरणाची महत्तम पाणी पातळी ६४२.२ मिटर व साठवण क्षमता २२४.०९३ दलघमी 'मेंटेन' ठेवण्यासाठी द्वॉर परिचालन कार्यवाही सुरू करण्यात आली. प्रकल्पाचे दोन दरवाजे ०.२५ मिटरने उंचावून तब्बल १ हजार ७६० क्युसेक्स या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तत्पूर्वी मंगळवारी रात्रीच नदीकाठच्या गावात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला होता.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणRainपाऊसOsmanabadउस्मानाबाद