शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

मांजरा धरण ओव्हर फ्लो, तीन जिल्ह्याची चिंता मिटली; दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 13:49 IST

लातूर, धाराशीव व बीड अशा तीन जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा मांजरा प्रकल्प यंदा 'थेंबे थेंबे तळं साचे' याची प्रचिती देत अखेर बुधवारी दुपारी ओव्हरफ्लो झाला.

कळंब ( धाराशिव): मागच्या दोन महिन्यापासून थोडा थोडा येवा दाखल होत असलेल्या मांजरा प्रकल्पाची झोळी यंदा भरणार का? असा प्रश्न निर्माण नागरिकांत होता. लातूर, धाराशीव व बीड अशा तीन जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा मांजरा प्रकल्प यंदा 'थेंबे थेंबे तळं साचे' याची प्रचिती देत अखेर बुधवारी दुपारी ओव्हरफ्लो झाला. प्रकल्पाचे दोन दरवाजे ०.२५ मिटरने उंचावून १ हजार ७३० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

धाराशीव जिल्हातील कळंबच्या दाभा व केज तालुक्यातील धनेगावच्या सिवेवर १९८० साली मांजरा नदीवर मांजरा प्रकल्पाची बांधणी झाली. यानंतर या प्रकल्पात प्रथमतः १९८०-८१ हंगामात पाणीसाठा झाला. तो ९७ दलघमी इतका होता. यानंतर पुढील ४४ वर्षाच्या काळात हा प्रकल्प धाराशीव जिल्हातील कळंब, बीड जिल्ह्य़ातील केज, अंबाजोगाई व लातूर जिल्ह्य़ातील लातूर व रेणापूर तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरत आला. याशिवाय लातूर शहर, लातूर औद्योगिक वसाहत, कळंब, केज, अंबाजोगाई, धारूर, मुरूड अशा शहरासह शेकडो गावातील पाण्याचा प्रश्न भागवणारा प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जाते. यामुळेच हा प्रकल्प भरला का? याकडे तिन्ही जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. यंदा प्रकल्पात प्रथमच जून महिन्यातही थोडासा का होईना येवा दाखल झाला. पुढे जुलै, ऑगस्ट महिन्यात अल्पसा का होईना येवा सातत्य सुरूच राहिले . मात्र, तो येवा दखलपात्र नसल्याने प्रकल्प महत्तम पाणी पातळीकडे जात नव्हता. यातच २ सप्टेंबरला पाणलोट क्षेत्रातील कळंब, वाशी, भूम, बीड, पाटोदा भागात जोरदार पाऊस झाला अन् हंगामातील दखलपात्र येव्याची नोंद होवू लागली. यातही २१ सप्टेंबरनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला अन् प्रकल्प आपल्या ६४२ मिटर पाणी पातळीच्या समीप पोहचला. 

सतराव्यांदा झाला ओव्हरफ्लो... २०२०, २०२१ आणि २०२२ अशा सलग तीन वर्ष धरण भरले होते. त्यानंतर गतवर्षी २०२३ ला पाऊस कमी झाल्याने धरणात केवळ २९ टक्के पाणीसाठा होता. आता २०२४ ला एक वर्षाच्या खंडानंतर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. २३ व २४ सप्टेंबर रोजी पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे ८५ टक्क्यावरचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहचत प्रकल्पाची झोळी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास भरली गेली. ४४ वर्षांच्या इतिहासात पूर्ण क्षमतेने भरण्याची ही सतरावी वेळ आहे असे शाखा अभियंता सुरज निकम यांनी सांगितले.

विसर्ग सुरू, दोन दारे उंचावली...बुधवारी दुपारी धरणाची महत्तम पाणी पातळी ६४२.२ मिटर व साठवण क्षमता २२४.०९३ दलघमी 'मेंटेन' ठेवण्यासाठी द्वॉर परिचालन कार्यवाही सुरू करण्यात आली. प्रकल्पाचे दोन दरवाजे ०.२५ मिटरने उंचावून तब्बल १ हजार ७६० क्युसेक्स या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तत्पूर्वी मंगळवारी रात्रीच नदीकाठच्या गावात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला होता.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणRainपाऊसOsmanabadउस्मानाबाद