शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शेतरस्ता खुला करण्यासाठी माळकरंजा ग्रामस्थ आक्रमक

By सूरज पाचपिंडे  | Updated: May 8, 2023 16:42 IST

मागणी मान्य होत नसल्याने ग्रामस्थ जिल्हाकचेरी गाठून उपोषणास बसले आहेत. 

धाराशिव : शेतरस्ता खुला करण्यात यावा, या मागणीसाठी कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील शेतकरी सोमवारपासून जिल्हाकचेरीसमोर उपोषणास बसले आहेत. मागणी मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. 

माळकरंजा येथील महादेव तूपसौंदरे राजकुमार तूपसौंदरे, सुखदेव मुळे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी शेतरस्ता होता. मात्र, शेतरस्त्यावर काही जणांनी अतिक्रमण केल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करता येत नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. शेतरस्ता खुला करून देण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी केली जात आहे. मात्र, मागणी मान्य होत नसल्याने सोमवारी ग्रामस्थ जिल्हाकचेरी गाठून उपोषणास बसले आहेत. 

यावेळी उपोषणकर्ते शेतकरी म्हणाले की, शेतरस्त्याचे काम रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेले आहे. मात्र, शेतरस्ता खुला करून देण्यात आलेला नाही. याच परिसरातील स्मशानभूमीच्या जागेवर बंधारा बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. अतिक्रमण प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. ते अद्याप काढण्यात आलेले नाही. प्रशासनाने शेतरस्ता खुला करून स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीOsmanabadउस्मानाबाद