शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

बसस्थानकासाठी अर्थसंकल्पात तरतूद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:32 AM

उस्मानाबाद : अनेक वेळेस उद्घाटन सोहळे होऊनही उस्मानाबाद येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. यामुळे परिवहनमंत्री ...

उस्मानाबाद : अनेक वेळेस उद्घाटन सोहळे होऊनही उस्मानाबाद येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. यामुळे परिवहनमंत्री म्हणून याकडे वैयक्तिक लक्ष द्यावे व यासाठी ८ मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करून हे काम शासन निधीतून हाती घेण्यात यावे, अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्याकडे केली आहे.

आघाडी सरकारने राज्यातील महत्त्वाच्या शहरात असलेल्या बस डेपोची जागा व्यापारी संकुल योजनेच्या मध्यमातून विकसित करण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यात उस्मानाबादसह अन्य बसस्थानकांचा समावेश होता. यानुसार २४ ऑगस्ट २०१४ रोजी उस्मानाबाद बसस्थानकाचे भूमिपूजनही झाले होते; परंतु शासनाला वरील बसस्थानकांची कामे शासन निधीतून करणे अभिप्रेत असल्याने महामंडळाने १८ मे २०१६ रोजी सभा घेऊन त्यामध्ये उपरोक्त व्यापारी संकुल योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली निवड रद्द करून त्याऐवजी मंजूर बसस्थानकांची कामे शासन निधीतून अथवा महामंडळाच्या निधीतून हाती घेण्याचे प्रस्तावित करण्याचा ठराव घेतला असल्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

यानंतर ९ ऑगस्ट २०१९ रोजी उस्मानाबाद येथील मध्यवर्ती बसस्थानकाचे उपकामासह पुनर्बांधणी करण्याकारिता प्रशासकीय मान्यता देऊन १०.१५ कोटींच्या निधीस शासनाकडून मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार २३ ऑगस्ट २०१९ रोजी ई-निविदा प्रकाशित करण्यात आल्या व १३ सप्टेंबर रोजी निविदा उघडण्यात आली. दरम्यान, ३१ ऑगस्ट २०१९ रोजी वा त्या सुमारास तत्कालीन मंत्र्यांच्या हस्ते सदर कामाचे पुन्हा एकदा उद्घाटनदेखील करण्यात आले होते, तरीही या कामास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे ८ मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करून हे काम शासन निधीतून हाती घेण्यात यावे, अशी मागणी यावेळी केली आहे.

चौकट..........

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई कार्यालयात ६ ऑक्टोबर २०२० रोजी पुन्हा उस्मानाबाद बसस्थानकाचे बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर आधुनिकीकरण करण्याबाबत प्रस्ताव मागविण्यात आला होता; परंतु यातही पुढे काहीच न झाल्यामुळे व अनेक वेळेस उद्घाटन सोहळे होऊनदेखील प्रत्यक्ष कामास सुरुवात न झाल्याने जिल्ह्यातील जनता शासनाप्रती नाराजी आहे. त्यामुळे परिवहनमंत्री म्हणून आपण स्वत: यात लक्ष घालावे, अशी मागणी आ. पाटील यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.