शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

मुख्य बाजारपेठ, ठाकरे चौकात कोंडी, वाहनांच्या गर्दीतून चालावे तरी कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST

समीर सुतके उमरगा : शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी समस्या कायम आहे. शहरातून जाणारा महामार्ग असो वा शहरातील ...

समीर सुतके

उमरगा : शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी समस्या कायम आहे. शहरातून जाणारा महामार्ग असो वा शहरातील मुख्य बाजारपेठ असो, येथे कायम वाहनांची गर्दीमुळे असते. यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना पादचाऱ्यांनादेखील मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज शहरवासीयांमधून व्यक्त होत आहे.

शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट बनत आहे. विशेषत: बाळासाहेब ठाकरे चौक, इंदिरा चौक, आरोग्य नगरी कॉर्नर, पतंगे रोड, शिवपुरी कॉर्नर व मुख्य बाजारपेठ येथे वाहनांच्या गर्दीने कायमस्वरूपी वाहतूक कोंडी निर्माण होते. शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये रस्ता खूपच अरुंद असल्याने पायी चालणे अवघड असताना येथे दुचाकी, रिक्षा यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे सर्वात जास्त कोंडी होताना दिसते. इंदिरा चौकातून महादेव मंदिराला जाणारा रस्ता मुळातच अरुंद. त्यातच रस्त्यावर दुभाजक केल्याने वाहनांच्या गर्दीतून पायी जाणे शक्य होत नाही. पतंगे रोडवर तर बेशिस्त वाहन पार्किंगसह भरधाव वाहने चालविली जात असल्याने येथे नेहमीच छोटे-मोठे अपघात होतात.

चौकट.....

महामार्गावर गर्दी

शहरातून जाणाऱ्या महामार्गावर कायम वाहनांची गर्दी असते. त्यात दोन्ही बाजूंनी फळविक्रेते, भाजी विक्रेते, लहानसहान साहित्य विक्री करणाऱ्यांची गर्दी असते. याच रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने सर्रास लावली जातात. यामुळे महामार्गावरून एकेरी वाहतूक करावी लागते.

फूटपाथ नाहीच

शहरातून जवळपास चार किमी महामार्ग जातो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फूटपाथ होणे गरजेचे असताना पालिकेतील आतापर्यंतच्या कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले नाहीत. परिणामी या जागी अतिक्रमणे झालेली आहेत. कित्येक दुकानदार आपल्या दुकानासमोरील जागा हातगाडे व फेरीवाल्यांना भाड्याने देऊन पैसे कमवीत आहेत.

अतिक्रमण हटाव मोहीम नावालाच

अतिक्रमणाबाबत जास्त गदारोळ झाल्यास पालिका प्रशासनाकडून शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम चालू केली जाते. परंतु, यानंतर पुन्हा तिथे अतिक्रमण होऊ नये याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम ही नावालाच होत आहे असे दिसून येते.

कोट.......

शहरातील वाहनचालकांवर ना कोणाचे नियंत्रण आहे, ना पार्किंगसाठी कोठे जागा. वाहनांच्या बेशिस्तपणामुळे कधी अपघात होईल याची शाश्वती राहिली नाही. प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे.

- गजानन पाटील,नागरिक

शहराचा विस्तार, तसेच वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यानुसार पार्किंगची सुविधा व वाहन चालविणाऱ्यांवर नियंत्रण प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्याचबरोबर पालिकेतील लोकप्रतिनिधींनादेखील या समस्येची जाणीव नसल्याचे दिसून येते.

- बळीराम गायकवाड, नागरिक

‘पे अँड पार्किंग’ स्वरूपात शहरातील महामार्गालगत असलेल्या मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. बाजारपेठेत जाणाऱ्यांना या ठिकाणी वाहने पार्किंग करावी लागणार आहेत. याचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहोत.

- रामकृष्ण जाधवर, मुख्याधिकारी