शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

जिल्ह्यातील ४० ते ४५ टक्के ग्रामपंचायतीत ‘महाविकास आघाडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:23 IST

उस्मानाबाद : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. यांचे सरकार ...

उस्मानाबाद : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. यांचे सरकार फारकाळ टिकणार नाही, असा दावा भाजपकडून पहिल्या दिवसापासून केला जात आहे. असे असतानाच मध्यंतरी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने एकी दाखवून दिली. सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत मात्र, १०० टक्के ग्रामपंचायतींत तिन्ही पक्षांची माेट बांधून ‘महाविकास आघाडी’चा एकच पॅनल देण्यात स्थानिक नेतृत्व यशस्वी हाेऊ शकले नाही. तीनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या दाव्यानुसार केवळ ४० ते ४५ टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी लढत देत आहे. मात्र, निकालानंतर अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांची गट्टी जमून येईल, अशी अशा या मंडळीने व्यक्त केली.

जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली हाेती. यापैकी ४० ग्रामपंचायती बिनिवराेध निघाल्या आहेत. त्यामुळे १५ जानेवारी राेजी ३८८ ग्रामपंचायतीसाठी मतदान हाेणार आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. ही महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुकीतही दिली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या आखाड्यातही हे तीन पक्ष एकत्र येत ताकद दाखवितील, असा दावा राज्यपातळीवरील नेत्यांकडून करण्यात आला हाेता; परंतु प्रत्यक्षात स्थानिक पातळीवरील नेतेमंडळीला या तीन पक्षांची माेट बांधण्यात फारसे यश आलेले नाही. ४० ते ४५ टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे पॅनल एकत्रित लढत आहे, असा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हे प्रमाण कमी आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर अनेक ग्रामपंचायतीत वेगवेगळे लढणारे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असा विश्वासही या तीनही पक्षांकडून व्यक्त करण्यात आला आहे. असे असले तरी महाविकास आघाडीला विधानसभा, विधान परिषदेत जे जमले ते स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत का जमले नाही? हे स्थानिक नेत्यांचे अपयश आहे का? असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

चाैकट...

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापली आहे. हे सरकार चांगले काम करीत आहे. हे सूत्र जास्तीत जास्त ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्यक्षात यावे, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात आले. त्याला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास ५० टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी लढत देत आहे.

-कैलास पाटील, आमदार तथा जिल्हाध्यक्ष, शिवसेना.

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला माेठे यश मिळाले. त्यामुळे अधिकाधिका ग्रामपंचायतीतही तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढावी, अशी चर्चा झाली हाेती. त्यानुसार प्रयत्नही करण्यात आले. त्यास चांगले यश आले आहे. साधारपणे ४० ते ४५ ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढत आहेत.

-ॲड. धीरज पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून ज्या-ज्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढत देण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रयत्न यशस्वी झाले. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त ग्रामपंचायतींत हा प्रयत्न केला आहे. साधारपणे ४५ ते ५० टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी म्हणून आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते लढत आहेत. हा प्रयाेगही निश्चित यशस्वी हाेईल.

-सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

निकालानंतर बदलू शकते चित्र...

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीकडून करण्यात ४० ते ४५ टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढत आहाेत, असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात हे प्रमाण एवढे नाही. मात्र, निवडणूक निकालानंतर अनेक ग्रामपंचायतींत हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता काबीज करू शकतात. त्यामुळे निकालानंतर महाविकास आघाडीच्या स्थानिक नेतेमंडळीचा दावा प्रत्यक्षात येऊ शकताे.

पाॅइंटर...

जिल्ह्यातील निवडणूक रणधुमाळी सुरू असलेल्या खासकरून माेठ्या ग्रामपंचायतींत अनेक ठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादी या दाेनच पक्षात प्रमुख लढत झालेली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी महाविकास आघाडी आकारास येऊ शकली नाही. तसेच काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दाेनच पक्ष प्रबळ आहेत. त्यामुळे अशा ठिकाणीही आघाडी हाेऊ शकली नाही. ज्या ठिकाणी भाजप प्रमुख विराेधक आहे, अशा बहुतांश ठिकाणी आघाडी दिसते. तर काही काही ठिकाणी आघाडीत फूट पडली आहे.