शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

कमी दाबाने वीजपुरवठा, केसरजवळग्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:36 IST

मुरूम (जि. उस्मानाबाद) - उमरगा तालुक्यातील केसरजवळगा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाखालील विहिरीवरील पंप विजेच्या कमी दाबामुळे नेहमी बंद ...

मुरूम (जि. उस्मानाबाद) - उमरगा तालुक्यातील केसरजवळगा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाखालील विहिरीवरील पंप विजेच्या कमी दाबामुळे नेहमी बंद असताे. त्यामुळे गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. प्रामुख्याने प्रभाग क्रमांक-१ व २ या दोन प्रभागांत पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे.

केसरजवळगा हे गाव कर्नाटकच्या सीमेवरील शेवटचे गाव आहे. गावची लोकसंख्या आठ हजारांच्या जवळपास असून, गावात पाच प्रभाग आहेत. गावास केसरजवळगा-निरगुडी रस्त्यावरील साठवण तलावाखालील विहिरीतून नळयोजनेद्वारे आणि कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. दाेन्ही स्रोतांना यंदा भरपूर पाणी उपलब्ध आहे. मात्र, साठवण तलाव परिसरात पिकांना पाणी देण्यासाठी शेतीपंपांचा वापर वाढला आहे. त्यामुळे या भागातील रोहित्रांवर क्षमतेपेक्षा अधिक भार झाल्याने पाणीपुरवठ्याचे पंप कमी दाबामुळे चालत नसल्याचे पाणीपुरवठा कर्मचारी व ग्रामपंचायतीकडून सांगितले जात आहे. साठवण तलाव परिसरात यंदा पाऊस चांगला झाल्याने उसाचे क्षेत्रही वाढले आहे. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी वीजपंपांचा वापर एकाच वेळी करीत असल्याने सगळ्याच पंपांना योग्य दाबाने वीज मिळणे अवघड झाले आहे.

चाैकट...

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

गावातील प्रभाग-१ व २ च्या सदस्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मासिक बैठकीत हनुमान मंदिरापासून ते अंबाबाई मंदिरापर्यंत नव्याने जलवाहिनी टाकण्याची मागणी केली आहे. मात्र, याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याचे ग्रामपंचायत सदस्य सांगत आहेत.

जलवाहिनीसाठी दमडीही नाही...

चौदाव्या वित्त आयोगातून अनेकवेळा ग्रामपंचायतीने लाखो रुपयांची उधळपट्टी केली आहे. मात्र, नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जलवाहिनीसाठी दमडीही खर्च केली नाही. ५० पाइप टाकले की, या प्रभागासाठी पर्यायी कूपनलिकांचे पाणी प्रभाग-१ व २ मधील नागरिकांना मिळू शकते, असे ग्रामपंचायत सदस्यांकडून सांगितले जात आहे.

विजेच्या कमी दाबामुळे प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यापासून साठवण तलावाखालील विहिरीवरील पाणीपुरवठ्याचे पंप चालत नाहीत. त्यामुळे हनुमान मंदिरापासून ते अंबाबाई मंदिरापर्यंत नव्याने जलवाहिनी टाकण्याची मागणी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे केली आहे. मात्र, आमच्या मागणीकडे सरपंच व तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.

-जयपालसिंग राजपूत, सदस्य

केसरजवळगा येथे पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाखालील विहिरीवरील पंपाला कमी दाबाने वीज मिळत असल्याने पंप अनेकवेळा चालत नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडते. नवीन जलवाहिनी टाकण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी माझ्याकडे तरी अद्यापपर्यंत केलेली नाही.

-जी.डी. हलबुर्गे, ग्रामविकास अधिकारी