शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
4
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
5
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
6
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
7
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
8
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
9
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
10
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
11
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
12
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
13
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
14
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
15
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
16
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
17
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
18
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
19
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
20
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नाेंदविले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST

उस्मानाबाद - मागील आठवड्यात जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग तसेच साेयाबीनसारख्या नगदी पिकांचे हाेत्याचे ...

उस्मानाबाद - मागील आठवड्यात जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग तसेच साेयाबीनसारख्या नगदी पिकांचे हाेत्याचे नव्हते झाले. अशा शेतकऱ्यांनी अतिवृष्टीनंतर ७२ तासांत विमा कंपनीकडे ऑनलाईन पद्धतीने नुकसानीची नाेंद करणे बंधनकारक केले आहे. परंतु, या प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे अनेकांना नाेंद करताच आलेली नाही. त्यामुळे बुधवारअखेर केवळ ४० हजार शेतकरीच नाेंद करू शकले.

पावसाळ्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने पेरणी उरकली. अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे पिकेही जाेमदार आली. परंतु, ही पिके वाढीच्या तसेच फुले लागण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने सुमारे २१ ते २५ दिवसांचा खंड दिला. त्यामुळे उडीद, मूग या कमी कालावधीच्या पिकाला पुरेशा शेंगा लागल्या नाहीत. ज्या लागल्या त्या भरल्या गेल्या नाहीत, तर साेयाबीनची वाढ खुंटली. या संकटातून हाती लागलेल्या शेतमालातून किमान उत्पादन खर्च तरी निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना हाेती. उडीद, मुगाची काढणी सुरू असतानाच जिल्ह्यात पावसाने थैमान घातले. अनेक भागांत दाेन ते तीनवेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिके पाण्याखाली गेली. काढणी झालेली पिके वाढून गेली. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. हाती आलेले सर्वच निसर्गाने हिरावल्यानंतर शेतकऱ्यांच्या नजरा विका कंपनीकडे लागल्या. परंतु, पूर्वीप्रमाणे महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे केले जात नाहीत. शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अतिवृष्टी झाल्यापासून ७२ तासांत विमा कंपनीला नुकसान कळविणे बंधनकारक केले आहे. बहुतांश शेतकरी ऑनलाईन कळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने ॲप सातत्याने हॅंग हाेत हाेते. तसेच अन्य तांत्रिक अडचणींनाही ताेंड द्यावे लागत असे. परिणामी हाताताेंडाशी आलेला घास वाया गेला असतानाही अनेकजण विमा कंपनीला कळवू शकले नाहीत. आजवर जिल्हाभरातून केवळ ४० हजार शेतकरीच कंपनीकडे नुकसान नाेंदवू शकले. ही संख्या आणखे वाढू शकते, असे कृषी विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

चाैकट...

जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा...

जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनी बुधवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नुकसान नाेंदविताना काेणकाेणत्या अडचणी येत आहेत? त्यावर उपाय काय? आदी बाबींचा आढावा घेतला. नुकसानग्रस्त जे शेतकरी विमा कंपनीकडे ऑनलाईन नाेंदी करू शकले नाहीत, त्यांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.