शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

४० हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नाेंदविले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST

उस्मानाबाद - मागील आठवड्यात जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग तसेच साेयाबीनसारख्या नगदी पिकांचे हाेत्याचे ...

उस्मानाबाद - मागील आठवड्यात जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग तसेच साेयाबीनसारख्या नगदी पिकांचे हाेत्याचे नव्हते झाले. अशा शेतकऱ्यांनी अतिवृष्टीनंतर ७२ तासांत विमा कंपनीकडे ऑनलाईन पद्धतीने नुकसानीची नाेंद करणे बंधनकारक केले आहे. परंतु, या प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे अनेकांना नाेंद करताच आलेली नाही. त्यामुळे बुधवारअखेर केवळ ४० हजार शेतकरीच नाेंद करू शकले.

पावसाळ्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने पेरणी उरकली. अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे पिकेही जाेमदार आली. परंतु, ही पिके वाढीच्या तसेच फुले लागण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने सुमारे २१ ते २५ दिवसांचा खंड दिला. त्यामुळे उडीद, मूग या कमी कालावधीच्या पिकाला पुरेशा शेंगा लागल्या नाहीत. ज्या लागल्या त्या भरल्या गेल्या नाहीत, तर साेयाबीनची वाढ खुंटली. या संकटातून हाती लागलेल्या शेतमालातून किमान उत्पादन खर्च तरी निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना हाेती. उडीद, मुगाची काढणी सुरू असतानाच जिल्ह्यात पावसाने थैमान घातले. अनेक भागांत दाेन ते तीनवेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिके पाण्याखाली गेली. काढणी झालेली पिके वाढून गेली. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. हाती आलेले सर्वच निसर्गाने हिरावल्यानंतर शेतकऱ्यांच्या नजरा विका कंपनीकडे लागल्या. परंतु, पूर्वीप्रमाणे महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे केले जात नाहीत. शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अतिवृष्टी झाल्यापासून ७२ तासांत विमा कंपनीला नुकसान कळविणे बंधनकारक केले आहे. बहुतांश शेतकरी ऑनलाईन कळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने ॲप सातत्याने हॅंग हाेत हाेते. तसेच अन्य तांत्रिक अडचणींनाही ताेंड द्यावे लागत असे. परिणामी हाताताेंडाशी आलेला घास वाया गेला असतानाही अनेकजण विमा कंपनीला कळवू शकले नाहीत. आजवर जिल्हाभरातून केवळ ४० हजार शेतकरीच कंपनीकडे नुकसान नाेंदवू शकले. ही संख्या आणखे वाढू शकते, असे कृषी विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

चाैकट...

जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा...

जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनी बुधवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नुकसान नाेंदविताना काेणकाेणत्या अडचणी येत आहेत? त्यावर उपाय काय? आदी बाबींचा आढावा घेतला. नुकसानग्रस्त जे शेतकरी विमा कंपनीकडे ऑनलाईन नाेंदी करू शकले नाहीत, त्यांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.