शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

आई-वडिलाचे छत्र हरवल्याने चिमुकल्यांची होतेय उपासमार; आजीच्या खांद्यावर आहे जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 19:47 IST

६५ वर्षीय आजीच्या खांद्यावर आली पालनाची जबाबदारी

ठळक मुद्देचार घरे मागून शमविली जातेय पोटाची आग....

- बालाजी बिराजदार

लोहारा (जि. उस्मानाबाद) : वर्षभरापूर्वी वडिलांचे निधन झाले. घरातील कमावता व्यक्तीच गेल्याने तीन चिमुकल्यांच्या पालनाची जबाबदारी आईवर येवून ठेपली. परंतु, मातेचे ममत्वही या चिमुकल्यांच्या नशिबी नव्हते, म्हणून की काय अवघ्या सहा महिन्यातच आईचेही आजारपणातून निधन झाले. त्यामुळे या मुलांच्या पालन-पोषणाची जबाबदारी ६५ वर्षीय आजींवर आली. वाढत्या वयामुळे त्या कामधंदा करू शकत नाहीत. त्यामुळे गावातील चार घरे मागून सध्या निराधार चिमुकल्यांची भूक भागविली जात आहे. 

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील सुकुमार हरीबा कांबळे यांना दोन मुलं व एक मुलगी अशी तीन आपत्य. मोठा मुलगा अवघा १८ वर्षाचा असताना त्याचे अपघातात निधन झाले. दुसरा मुलगा अमोल कांबळे हे हालाखीच्या परिस्थितीमुळे कामाच्या शोधात पत्नी, दोन मुलं व एका मुलीसह पुणे शहरात स्थलांतरित झाले. मिळेल ते काम करुन अमोल संसाराचा गाडा हाकत होते. सर्व काही बरे सुरू असतानाच साधारपणे वर्षभरापूर्वी अमोल यांचे अकाली निधन झाले. घरातील करता पुरूष गेल्याने कांबळे कुटुंब  उघड्यावर आले. त्यामुळे कुटुंबाच्या पालन-पोषणाची जबाबदारी आई लक्ष्मी यांच्या खांद्यावर आली. संकटासमोर हार न मानता त्या मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा पुढे रेटत होत्या. असे असतानाच अवघ्या सहा महिन्यात लक्ष्मी यांचाही आजारपणातून मृत्यू झाला अन् चिमुकले निराधार झाले.

तेव्हा प्रेमनाथ हा मुलगा ९ वर्षाचा होता. मुलगी आरती चार वर्ष तर अथर्व हा अवघ्या सहा महिन्याचा होता. आई-वडीलांच्या अकाली निधनामुळे चिमुकल्यांच्या पोषणाची जबाबदारी आजी सुकुमार कांबळे यांच्यावर आली. त्यांचे सध्या ६५ वर्ष एवढे वय आहे. वाढत्या वयामुळे त्यांना मोलमजुरीची कामे होत नाहीत. त्यामुळे निराधार चिमुकल्यांचे पोषण करणे कठीण झाले आहे. गावातील चार घरे मागून मिळेल त्या अन्नावर मुलांची भूक भागवित आहेत. काहीवेळा मुलांना अर्धपोटी झोपावे लागते, असे आजी सुकुमार कांबळे सांगतात. अनेकवेळा ग्रामस्था मदतीसाठी धावून येतात. परंतु, अशी मदत कुठपर्यंत पुरेल? असा सवालही त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पोटाची भूक भागविण्यासाठी धडपडणाऱ्या चिमुकल्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. 

कानेगाव येथील सुकुमार कांबळे या आजीवर तीन मुले संभाळण्याची जबाबदारी आली आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी मदत करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, आजींचे वाढते वय लक्षात घेता, मुलांचे पोषण अन् शिक्षणाची कायमस्वरूपी सोय होणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. -सतीश कदम, समन्वयक, हॅलो मेडिकल फाऊंडेशन.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादFamilyपरिवार