शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

उस्मानाबादेतील नऊ मंडळात १०० मिलीमीटर पेक्षाही कमी पाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 16:01 IST

जिल्ह्यावरील दुष्काळाची छाया कायम.

ठळक मुद्देसरासरीच्या १३४ मिमीच पाऊस ८८ मिमी पावसाची तूट

उस्मानाबाद : पावसाळा सुरू होवून जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. असे असतानाही जिल्ह्यातील एक-दोन नव्हे, तर तब्बल नऊ महसूल मंडळामध्ये वार्षिक सरासरीच्या १०० मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. यापैकी बहुतांश मंडळामध्ये अद्याप खरीप पेरणीही झालेली नाही. परिणामी पावसाळा सुरू असला तरी दुष्काळाची छाया मात्र कायम आहे.

गतवर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ ५० ते ५४ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्याभरातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यामुळे ऐन हिवाळ्यापासूनच अनेक गावांना टंचाईचे चटके बसण्यात सुरूवात झाली होती. यंदा तरी दमदार पाऊस होईल असे अपेक्षित होते. परंतु, पावसाळा सुरू होवून जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटत आला आहे. असे असतानाही प्रकल्पांची पाणीपातळी उंचावेल, असा एकही पाऊस झालेला नाही. नऊ मंडळामध्ये वार्षिक सरासरीच्या शंभर मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक विदारक चित्र ढोकी मंडात आहे. जून, जुलैचे नॉर्मल पर्जन्यमान सव्वादोनशे मिलीमीटर असताना आजघडीला केवळ ६५ मिमी पाऊस झाला आहे. अशीच अवस्था परंडा तालुक्यातील आसू मंडळाची आहे. १६९मिमी नॉर्मल पर्जन्यमान असले तरी आजवर केवळ ६६ मिमी पाऊस झाला आहे. पाडोळी मंडळात ९४.८ मिमी, केशेगाव ९८.१ मिमी, सोनारी ८६.३ मिमी, वालवड ८६.६ मिमी, कळंब ७६.१ मिमी, ईटकूर ९८.७ मिमी आणि शिराढोण मंडळात ९०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अत्यल्प पर्जन्यमानामुळे उपरोक्त मंडळातील अनेक गावांमध्ये सध्या पेरणी झालेली नाही.

८८ मिमी पावसाची तूटजून आणि जूलैच्या १३ तारखेपर्यंत जिल्ह्यात किमान २२२ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु, सध्याच्या पर्जन्यमानावर नजर टाकली असता, केवळ १३४ मिली एवढला अल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसामध्ये तब्बल ८८ मिलीमीटरची तूट असल्याचे समोर येते. जो पाऊस पडत आहे तो सर्वदूर नाही. परिणामी शेतकरी हवालदिल झाले आहेत.

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी