शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

उस्मानाबादेतील नऊ मंडळात १०० मिलीमीटर पेक्षाही कमी पाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 16:01 IST

जिल्ह्यावरील दुष्काळाची छाया कायम.

ठळक मुद्देसरासरीच्या १३४ मिमीच पाऊस ८८ मिमी पावसाची तूट

उस्मानाबाद : पावसाळा सुरू होवून जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. असे असतानाही जिल्ह्यातील एक-दोन नव्हे, तर तब्बल नऊ महसूल मंडळामध्ये वार्षिक सरासरीच्या १०० मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. यापैकी बहुतांश मंडळामध्ये अद्याप खरीप पेरणीही झालेली नाही. परिणामी पावसाळा सुरू असला तरी दुष्काळाची छाया मात्र कायम आहे.

गतवर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ ५० ते ५४ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्याभरातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यामुळे ऐन हिवाळ्यापासूनच अनेक गावांना टंचाईचे चटके बसण्यात सुरूवात झाली होती. यंदा तरी दमदार पाऊस होईल असे अपेक्षित होते. परंतु, पावसाळा सुरू होवून जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटत आला आहे. असे असतानाही प्रकल्पांची पाणीपातळी उंचावेल, असा एकही पाऊस झालेला नाही. नऊ मंडळामध्ये वार्षिक सरासरीच्या शंभर मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक विदारक चित्र ढोकी मंडात आहे. जून, जुलैचे नॉर्मल पर्जन्यमान सव्वादोनशे मिलीमीटर असताना आजघडीला केवळ ६५ मिमी पाऊस झाला आहे. अशीच अवस्था परंडा तालुक्यातील आसू मंडळाची आहे. १६९मिमी नॉर्मल पर्जन्यमान असले तरी आजवर केवळ ६६ मिमी पाऊस झाला आहे. पाडोळी मंडळात ९४.८ मिमी, केशेगाव ९८.१ मिमी, सोनारी ८६.३ मिमी, वालवड ८६.६ मिमी, कळंब ७६.१ मिमी, ईटकूर ९८.७ मिमी आणि शिराढोण मंडळात ९०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अत्यल्प पर्जन्यमानामुळे उपरोक्त मंडळातील अनेक गावांमध्ये सध्या पेरणी झालेली नाही.

८८ मिमी पावसाची तूटजून आणि जूलैच्या १३ तारखेपर्यंत जिल्ह्यात किमान २२२ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु, सध्याच्या पर्जन्यमानावर नजर टाकली असता, केवळ १३४ मिली एवढला अल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसामध्ये तब्बल ८८ मिलीमीटरची तूट असल्याचे समोर येते. जो पाऊस पडत आहे तो सर्वदूर नाही. परिणामी शेतकरी हवालदिल झाले आहेत.

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी