शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

Killari Earthquake : शरद पवारांच्या जगण्याला भूकंपग्रस्तांमुळेच बळ मिळाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 17:19 IST

पवारांकडून प्रथमच स्वतःच्या कर्करोग आजारावर उघड भाष्य

सचिन जवळकोटे

बलसूर, ( जि. उस्मानाबाद ) : 'पंचवीस वर्षांपूर्वी भूकंपानंतर केलेल्या माझ्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील भूकंपग्रस्तांनी सोहळा आयोजित केला असला तरी मीच उलट सर्वांचं आभार मानतो; कारण त्यावेळी भूकंपग्रस्तांनी दाखवलेली जगण्याची उमेद मलाही माझ्या संकटात सामना करण्यासाठी बळ देऊन गेली. भूकंपग्रस्तांमुळेच उलट मला जगण्याचे बळ मिळाले,' अशा भाषेत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, त्यांच्या दाढेच्या कर्करोग आजारावर त्यांनी प्रथमच सार्वजनिक ठिकाणी खुलेआमपणे भाष्य केलं.

30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या प्रलयंकारी भूकंपाला आज पंचवीस वर्षे पूर्ण झाली. त्या वेळचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी काही दिवस या ठिकाणी मुक्काम ठोकून भूकंपग्रस्तांना ज्या पद्धतीने धीर दिला होता, त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली होती. त्या प्रती भावना व्यक्त करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पाठीमागे भल्या मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, 'तुमच्यामुळेच जगण्याचे बळ मिळाले !' त्या खाली फोटो होता शरद पवारांचा. बाजूला शिवराज पाटील-चाकूरकर, पद्मसिंह पाटील अन् विलासराव देशमुख यांचे फोटो होते.

सोहळ्यात सर्वच वक्त्यांनी भूकंपग्रस्त भागात शरद पवारांनी केलेल्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. शेवटी पवारांचे भाषण सुरू झाले. मात्र, त्यांनी अत्यंत भावनिक होत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संकटाला प्रथमच जगजाहीर केलं. 2004 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविताना डॉक्टरांनी त्यांना दाढेचा कॅन्सर असल्याचं निदान केलं होतं. ती आठवण शरद पवार सांगत असताना मंडपातलं अवघं वातावरण जणू स्तब्ध झालं, 'डॉक्टरांनी त्यावेळी माझ्यावर शस्त्रक्रिया केली. काही दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो. सकाळी-संध्याकाळी सीनियर डॉक्टर असायचे. दुपारी एक जुनियर डॉक्टर होता. पण एके दिवशी बोलता-बोलता त्यानं एके दिवशी मला सांगितलं की तुम्ही फक्त सहा महिन्यांचेच आहात. तेव्हा वाटणी-बिटणी काय करून घ्यायचं असेल तर करून घ्या. हे ऐकून मी उलट त्याला विचारलं, तुझं वय किती ? डॉक्टरनं सांगितलं 28. तेव्हा मी त्याला म्हणालो, तुमच्या वयाच्या दुप्पट मी जगणार. अन् त्यावेळी तुम्हाला काही अडचण आली तर मला फोन करा. कारण ज्या आत्मविश्वासानं मी बोलत होतो, ती जगण्याची उमेद मला भूकंपग्रस्त भागातील लोकांनी पंचवीस वर्षांपूर्वीच दिली होती. एकाच घरातील सातपैकी सहा माणसं ढिगाऱ्याखाली दगावली, तरीही वाचलेला एकटा माणूस आजपर्यंत ज्या जिद्दीनं जगत आलाय, तेच माझ्या जगण्याचंही बळ ठरलंय.'

पवार आपल्यावर येऊन गेलेल्या संकटाची माहिती देत असताना त्यांच्या पाठीमागच्या पॅनलवर एक वाक्य मोठ्या दिमाखानं झळकत होतं, 'तुमच्यामुळेच जगण्याचे बळ मिळाले !' ते वाचताना अन पवारांना अनुभवताना अनेकांच्या डोळ्यासमोर एक वेगळंच वाक्य तरळून गेलं, ते म्हणजे.. 'भूकंपग्रस्तांमुळेच शरद पवारांच्या जगण्याला बळ मिळाले !'

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारKillari Earthquakeकिल्लारी भूकंप