शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

३५ हजार हेक्टरवरील खरीप पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST

मुरुम : मागील २२ दिवसांपासून शहर व परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने मुरुम मंडळातील जवळपास ३५ हजार हेक्टरवरील खरीप पिके ...

मुरुम : मागील २२ दिवसांपासून शहर व परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने मुरुम मंडळातील जवळपास ३५ हजार हेक्टरवरील खरीप पिके संकटात आली असून, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडाली आहे.

मुरुम मंडळात जवळपास ९० टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या. मात्र, मागील २२ दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपातील पीके पावसाअभावी कोमेजून जात आहेत. मुरुम मंडळात ३९ गावांचा समावेश असून, मे अखेरीस रोहिणी व जूनच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात झालेल्या पावसाच्या ओलिवर परिसरातील हजारो शेतकऱ्यांची खरिपाची पेरणी केली आहे. सर्वाधिक १७ हजार ९४८ हेक्टरवर सोयाबीन, ६ हजार ९५० हेक्टरवर तूर, ४ हजार ८२० हेक्टरवर उडीद तर १ हजार ६५० हेक्टरवर मूग आणि २ हजार ४५० हेक्टरवर उसाची लागण झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

मागील वर्षी परतीच्या पावसाने खरिपाच्या पिकांचे होत्याचे नव्हते केले होते. शिवाय, वांझोट्या सोयाबीन बियाणांमुळे मुरुम मंडळातील ४६० शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवले नसल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यंदा पाऊस वेळेवर झाल्याने पेरण्या वेळेवर झाल्या. त्यामुळे पिकांची उगवणही चांगली झाली आहे. मात्र, मागील २२ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा चिंतीत झाला आहे. सध्या पिके पावसाअभावी कोमेजून जात आहेत.

चौकट.......

यंदा उसाचे क्षेत्र वाढले

मुरुम मंडळात ३९ गावांचा समावेश असून ३५ हजार ५०० हेक्टर खरिपाचे एकूण क्षेत्र आहे. मागील वर्षी ३० हजार ८८४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. यंदा १७ हजार ९४८ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ३३३ हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र घटले आहे. तर तुरीचे २९०, उडिदाचे २४० हेक्टरने पेरणीचे क्षेत्र कमी झाले आहे. या मुख्य खरीप पिकांचे क्षेत्र घटून उसाचे क्षेत्र यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय सूर्यफूल ८५, कारळ ६५, भुईमूग १४५, बाजरी ६५०, मका ४६७ आणि इतर पिके १ हजार २३५ हेक्टर क्षेत्रावर आहेत.

प्रतिक्रिया...........

१६ ते १८ ऑगस्ट दरम्यान पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीनवर १३४५ नायट्रेट व पोटॅशियम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास चार ते आठ दिवस पिके तग धरुन राहू शकतील. मंडळात सर्वाधिक १७ हजार ९४८ हेक्टरवर सोयाबीन आहे. परंतु, पावसाअभावी खरीप उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. यंदा मंडळात उसाचे क्षेत्रही वाढले आहे.

- श्याम खंडागळे, मंडळ कृषी अधिकारी, मुरूम