शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीधारकांची थट्टा ; महिन्याकाठी अवघे ८३ रूपये, तेही दोन-दोन वर्ष मिळेनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 16:22 IST

नाममात्र रक्कमही होतकरू विद्यार्थ्यांना दोन-दोन वर्ष मिळत नाही

ठळक मुद्देदहा वर्षांपासून शिष्यवृत्तीमध्ये छदामही वाढ नाही 

- बाबूराव चव्हाण 

उस्मानाबाद :  होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक हातभार लागावा, यासाठी राज्य सरकारच्या वतीने पाचवी आणि आठवीच्या वर्गातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष अनुक्रमे एक हजार व दीड हजार रूपये दिले जातात. यानुसार महिन्याकाठी एका विद्यार्थ्यास देय ८३ ते १२५ रूपये एवढी नाममात्र रक्कमही २०१७ पासून खात्यावर जमा झालेली नाही. विशेष म्हणजे, वर्षागणिक महागाईचा आलेख उंचावत असतानाही सरकारकडून शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ केलेली नाही.

राज्य सरकारच्या वतीने पाचवी आणि ठावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी वर्ष-वर्ष तयारी करतात. दरवर्षी जिल्हाभरातून पाचवी आणि आठवीच्या वर्गातून प्रत्येकी २५६ ते २५७ दरम्यान विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरतात. पाचवीच्या वर्गातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना सहावी, सातवी आणि आठवीपर्यंत प्रतिवर्ष केवळ १ हजार रूपये एवढी शिष्यवृत्ती दिली जाते. तर आठवीच्या वर्गात असताना शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्यास अकरावी पर्यंत वर्षाकाठी दीड हजार रूपये एवढी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली जाते. २०१७-२०२० या कालावधीत पाचवी आणि आठवीच्या वर्गातील जिल्हाभरातील सुमारे दीड हजारापेक्षा अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. परंतु, मागील दोन ते अडीच वर्षांपासून संबंधित पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीचा छदामही जमा झालेला नाही.

पूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम शिक्षणाधिकारी यांच्या खात्यावर जमा होत होती. ही रक्कम विद्यार्थीनिहाय मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा होत होती. यानंतर त्यांच्याकडून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना धनादेश देण्यात येत होते. परंतु, सध्या शिष्यवृत्तीचे पैैसे ‘डीबीटी’च्या माध्यामातून थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम नियमित मिळते की नाही, याची कल्पना खुद्द शिक्षण विभागालाही नाही. २०१७ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्तीती मिळालेली नाही. पाचवीच्या विद्यार्थ्यास महिन्याकाठी ८३ ते ८४ रूपये आणि आठवीच्या वर्गातील शिष्यवृत्तीधारकास १२५ रूपये एवढी रक्कम देय आहे. एवढी नाममात्र रक्कमही होतकरू विद्यार्थ्यांना दोन-दोन वर्ष मिळत नाही, हे विशेष. राज्य सरकारच्या अशा कार्यपद्धतीसंदर्भात विद्यार्थी, पालकांसह आता शिक्षणप्रेमींतूनही तीव्र प्रतिकीया उमटू लागल्या आहेत. एकीकडे शालेय साहित्याचे दर वर्षागणिक वाढत असतानाही राज्य सरकारने मात्र मागील दहा वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या रक्कमेत एक रूपयानेही वाढ केलेली नाही.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीOsmanabadउस्मानाबादStudentविद्यार्थी