शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

सुविधा बंद करून नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:33 IST

तुळजापूर : शहरातील पूर्वीच्या कचराकुंड्या, शौचालये व मुतारी पाडून शहरवासीयांची गैरसोय निर्माण करणाऱ्या पालिकेतील मुख्याधिकारी व नगरसेवकांची चाैकशी करून ...

तुळजापूर : शहरातील पूर्वीच्या कचराकुंड्या, शौचालये व मुतारी पाडून शहरवासीयांची गैरसोय निर्माण करणाऱ्या पालिकेतील मुख्याधिकारी व नगरसेवकांची चाैकशी करून कारवाईची मागणी मनसेच्या वतीने तहसीलदारांमार्फत नगरविकास मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरी ही गैरसोयीचे माहेरघर बनले आहे. शहराची लोकसंख्या साधारण ३५ ते ४० हजार असून, येथे दररोज कमीतकमी साधारण ४० ते ५० हजार भाविक देवी दर्शनासाठी येत असतात. त्या सर्व भाविकांना, स्थानिक व्यापाऱ्यांना व नागरिकांना अत्यावश्यक सोयी-सुविधा देण्याचे कर्तव्य हे नगरपालिकेचे असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. शहरात कुठल्याच भागात सुलभ शौचालय, कचराकुंडी व मुतारी दिसून येत नाहीत. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या व आपल्या नातेवाईकांच्या घरासमोरील सुरू असणाऱ्या कचराकुंडी, शाैचालय व मुताऱ्या विनापरवाना पाडून टाकल्या आहेत. याबाबतची चौकशी केली तर उडवाउडवीचे उत्तरे नगर प्रशासनाकडून दिली जातात.

नगरपरिषदेने पूर्वीच्या ठिकाणी व नवीन ठिकाणीही या सुविधा पुरविताना दिसून येत नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या देवीभक्तांची, नागरिकांची व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रत्येक वार्डात आवश्यक तेथे सर्व्हे करून वरील सर्व सोयीसुविधा पुरवाव्यात, अन्यथा या मुलभूत गरजांसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. यावर प्रमोद कदम-परमेश्वर, अक्षय साळवे, उमेश कांबळे, सूरज कोठावळे यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.