शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

धाराशिव साखर कारखान्यावर आयकरची धाड; गाडीवर कृषी शिबीराचे स्टीकर लावून आले पथक

By चेतनकुमार धनुरे | Updated: August 25, 2022 12:49 IST

पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांनी चोराखळी येथील साखर कारखाना काही वर्षांपूर्वीच विकत घेऊन सुरु केला आहे.

उस्मानाबाद : पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी धाड टाकली आहे. मागील ६ तासांपासून येथील कागदपत्रांची छाननी पथक करीत आहे. दरम्यान, त्यांच्या नांदेड येथील कारखाना व पंढरपुरातील घरातही तपासणी सुरु असल्याची माहिती आहे.

पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांनी चोराखळी येथील साखर कारखाना काही वर्षांपूर्वीच विकत घेऊन सुरु केला आहे. कोविड काळात देशातील पहिला ऑक्सिजन प्लँट उभा करण्याचा मान या कारखान्याने मिळवला होता. पाटील यांचा नांदेड येथेही साखर कारखाना आहे. नुकतेच त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने पंढरपूरच्या विठ्ठल कारखानाही ताब्यात घेतला आहे. 

दरम्यान, गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दिल्ली व पुणे येथील आयकर विभागाच्या १० अधिकाऱ्यांचे एक पथक पोलिसांसह अचानक धाराशिव कारखान्यावर धडकले. लागलीच त्यांनी कार्यालयाचा ताबा घेत येथील कागदपत्रांची छाननी सुरु केली. याचवेळी कारखान्यातील सर्व कर्मचार्यांना एकत्र वेगळ्या हॉलमध्ये थांबण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मागील जवळपास ६ तासांपासून हे पथक कारखान्यावरच ठाण मांडून आहे. तपासणीअंती त्यांच्या हाती काय लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कृषी शिबीराचे स्टीकर लावून आली वाहने...आयकर विभागाच्या या छाप्याबाबत अतिशय गोपनीयता बाळगण्यात आली होती. स्थानिक अधिकार्यांनाही याबाबतची कुणकूण लागू देण्यात आली नाही. समोरच्या काचेवर कृषी अभ्यास शिबीर, असे स्टीकर लावलेली पुणे पासिंगची दोन वाहने भल्या सकाळीच कारखान्यावर दाखल झाली. त्यातून दहा अधिकारी व पोलीस उतरले व त्यांनी कार्यालयाचा ताबा घेत तपासणी सुरु केली.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सraidधाडOsmanabadउस्मानाबाद