शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

एसटी सुरू असती तर अर्जुन वाचला असता; बारावीच्या पहिल्या पेपरला जाताना अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 14:04 IST

नळदुर्ग-तुळजापूर रोडवरून जात असताना गंधोरा शिवारात वळणावर त्याच्या दुचाकीस समोरून येणाऱ्या ट्रकने ठोकरले.

नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : बारावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या पेपरला नळदुर्ग येथील केंद्राकडे दुचाकीने जात असताना एका विद्यार्थ्यास ट्रकने ठोकरल्याची घटना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. यात या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. एसटी सुरू असती तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते, अशी चर्चा त्याच्या नातेवाइकांत सुरू होती.

अर्जुन गोविंद राठोड (रा. नंदगुल तांडा, ता. तुळजापूर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता. शुक्रवारी बारावीचा पहिला पेपर होता. या परीक्षेसाठी शुक्रवारी अर्जुन आपल्या घरातील दुचाकी घेऊन परीक्षा केंद्राकडे निघाला होता. नळदुर्ग-तुळजापूर रोडवरून जात असताना गंधोरा शिवारात वळणावर त्याच्या दुचाकीस समोरून येणाऱ्या ट्रकने ठोकरले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, महाविद्यालयात अर्जुनला श्रद्धांजली वाहून परीक्षेला सुरुवात करण्यात आली.

सैन्यात जाण्याचे होते स्वप्न...अर्जुनला कसरतीचा मोठा छंद होता. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने बारावी उत्तीर्ण करून सैन्यात जाण्याचे ध्येय त्याने बाळगले होते. यामुळे तो नियमित व्यायाम करीत होता. आई-वडील व एक लहान भाऊ असा परिवार असल्याने त्यांची जबाबदारी घेण्याचे त्याचे ध्येय होते. अर्जुनच्या मृत्यूनंतर त्याच्या मित्रांनी तो व्यायाम करीत असतानाचे व्हिडिओ प्रसारित करून श्रद्धांजली वाहिली.

एसटी सुरू असती तर...अर्जुन हा कॉलेजला दुचाकीने जात नव्हता. मात्र, शुक्रवारी पहिलाच पेपर होता. त्यात एसटी पुरेशा नाहीत. वेळेवर पोहोचता आले नाही तर पेपरला मुकावे लागेल, या विवंचनेतून अर्जुनने दुचाकीवरून नळदुर्ग गाठण्याचा निर्णय घेतला अन् वाटेतच घात झाला. दरम्यान, एसटी सुरू असती तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते, अशी चर्चा त्याच्या नातेवाइकांत सुरू होती.

टॅग्स :Deathमृत्यूOsmanabadउस्मानाबाद