शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

मोबाईलचा मेळ लागेना, लागला तर ॲप चालेना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST

कळंब : एकतर अनेक शेतकरी मोबाईल वापरत नाहीत, वापरायचा म्हटला तर मोबाईल घ्यायची ऐपत नाही. त्यात घेतलाच तर ॲप ...

कळंब : एकतर अनेक शेतकरी मोबाईल वापरत नाहीत, वापरायचा म्हटला तर मोबाईल घ्यायची ऐपत नाही. त्यात घेतलाच तर ॲप धड चालत नाही अन् ते चालले तर चांगली रेंज मिळत नाही. यास्थितीत ई-पीक पाहणी करायची कशी, असा सवाल करत छावा संघटनेने ‘ऑफलाइन’ पाहणीची मागणी केली आहे.

कळंब तालुक्यात सध्या खरीप हंगाम बहरात आला आहे. यास्थितीत दरवर्षी १५ सप्टेंबरपर्यंत पीक पाहणी होऊन त्यांची नोंद सातबारावरील नमुना नंबर १२ वर येत असते. यंदा मात्र अशा नोंदीसाठी ‘ई पीक पाहणी’ हा हायटेक कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यात दस्तुरखुद्द शेतकऱ्यांनाच थेट आपल्या वावरातून पिकांची नोंद करावी लागणार आहे. त्यासाठी दिलेल्या १५ सप्टेंबर या अंतिम तिथीपर्यंत मोजक्याच शेतकऱ्यांनी यास प्रतिसाद दिल्याने ३० तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. असे असले तरी प्रत्यक्षात आपल्या शेतामधील उभ्या पिकात उभे राहून ऑनलाईन पिकांची माहिती व फोटो अपलोड करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे एकीकडे गावपातळीवर महसूल विभागाचे तलाठी यासाठी शेतकऱ्यांकडे आग्रह करत असले तरी यासंबंधीच्या प्रगतीचा घोषवारा मात्र धिम्यागतीने वृद्धिंगत होत आहे. त्यास तांत्रिक अडचणीच कारणीभूत ठरत असल्याचा सूर गावोगावी कानी पडत आहे.

यासंदर्भात छावा संघटनेने तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांची मोबाईल घ्यायची ऐपत नाही, घेतला तर वापरता येण शक्य नाही. त्यात रेंज मिळत नसल्याची व ॲप चालत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे यंदाच्या खरीप पिकांची पाहणी ऑफलाइन करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. यावर ‘छावा’चे मराठवाडा अध्यक्ष वसुदेव पाचंगे, तालुका सरचिटणीस लक्ष्मण लोमटे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष वैभव जाधव, संग्राम मुंडे, अभिषेक माने, विशाल शेळके, अजीत लांडगे, रवी शेळके, लक्ष्मण कोठावळे, दीपक कोठावळे, गहिनीनाथ पाटील, नवनाथ तवले, शक्ती गायकवाड नरसिंग लोमटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.