शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नुकसान पाहणीसाठी बांधावर नव्हे, थेट शेतात आलो; मुख्यमंत्री शिंदे यांचा उध्दव ठाकरेंना टाेला

By बाबुराव चव्हाण | Updated: April 11, 2023 18:42 IST

''मागील अडीच वर्षात पाहिल्याप्रमाणे मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. त्यामुळे नुकसान पाहणीसाठी बांधावर नव्हे तर थेट शेतात आलाे आहे.''

धाराशिव -अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांसाेबतच फळबागा उद्ध्वस्त झाल्या झाल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी हवालदिल हाेऊ नये. राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. मीही शेतकरी कुटुंताबातीलच आहे. मागील अडीच वर्षात पाहिल्याप्रमाणे मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. त्यामुळे नुकसान पाहणीसाठी बांधावर नव्हे तर थेट शेतात आलाे आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशा शब्दात धीर देतानाच नाव न घेता माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टाेलाही लगावला.

धाराशिव जिल्ह्यात सलग दाेन दिवस अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी झाली. नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी जिल्ह्यात आले हाेते. माेर्डा व वाडीबामणी या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जावू नये. सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही टाेला लगावला. मी शेतकरी कुटुंबातील आहे. शेतकऱ्याचा मुलगा असल्याने आपल्या वेदना मला कळतात. त्यामुळेच नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर नव्हे, थेट शेतात आलाे आहे. नुकसान प्रचंड झाले आहे. नुकसानग्रस्त एकाही शेतकऱ्याला आमचे सरकार वाऱ्यावर साेडणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला. त्यांच्यासमवेत पालकमंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डाॅ. सचिन ओम्बासे, पाेलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड आदी उपस्थित हाेते.

श्री रामाकडे आमच्यासाठी काहीही मागितले नाही...काल-परवाच आम्ही आयाेध्येत जावून आलाे. राज्यातील बळीराजावरील संकट दूर हाेवू दे, अवकाळी पाऊस आणि गारपीट अशा संकटातून सावरण्याचे बळ मिळू दे, एवढेच श्री रामाकडे मागितले आहे. आमच्यासाठी काहीही मागितले नाही, असा टाेलाही त्यांनी विराेधकांना लगावला.

उध्दव ठाकरेंकडून १०० टक्के राजकारण...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे तत्व हाेते. परंतु, माजी मुख्यमंत्री ठाकरे यांना बाळासाहेबांच्या विचाराचाच नव्हे तर तत्वाचाही विसर पडला आहे. ते आता १०० टक्के राजकारण करीत आहेत. पत्रकार परिषदेनंतर त्यांना शेतकर्यांबाबत विचारले असता, ‘नमस्कार’ करून उठून गेले. यावरूनच शेतकर्याबाबतची त्यांची तळमळ दिसून येते, असा चिमटाही काढला.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद