शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान पाहणीसाठी बांधावर नव्हे, थेट शेतात आलो; मुख्यमंत्री शिंदे यांचा उध्दव ठाकरेंना टाेला

By बाबुराव चव्हाण | Updated: April 11, 2023 18:42 IST

''मागील अडीच वर्षात पाहिल्याप्रमाणे मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. त्यामुळे नुकसान पाहणीसाठी बांधावर नव्हे तर थेट शेतात आलाे आहे.''

धाराशिव -अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांसाेबतच फळबागा उद्ध्वस्त झाल्या झाल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी हवालदिल हाेऊ नये. राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. मीही शेतकरी कुटुंताबातीलच आहे. मागील अडीच वर्षात पाहिल्याप्रमाणे मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. त्यामुळे नुकसान पाहणीसाठी बांधावर नव्हे तर थेट शेतात आलाे आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशा शब्दात धीर देतानाच नाव न घेता माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टाेलाही लगावला.

धाराशिव जिल्ह्यात सलग दाेन दिवस अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी झाली. नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी जिल्ह्यात आले हाेते. माेर्डा व वाडीबामणी या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जावू नये. सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही टाेला लगावला. मी शेतकरी कुटुंबातील आहे. शेतकऱ्याचा मुलगा असल्याने आपल्या वेदना मला कळतात. त्यामुळेच नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर नव्हे, थेट शेतात आलाे आहे. नुकसान प्रचंड झाले आहे. नुकसानग्रस्त एकाही शेतकऱ्याला आमचे सरकार वाऱ्यावर साेडणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला. त्यांच्यासमवेत पालकमंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डाॅ. सचिन ओम्बासे, पाेलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड आदी उपस्थित हाेते.

श्री रामाकडे आमच्यासाठी काहीही मागितले नाही...काल-परवाच आम्ही आयाेध्येत जावून आलाे. राज्यातील बळीराजावरील संकट दूर हाेवू दे, अवकाळी पाऊस आणि गारपीट अशा संकटातून सावरण्याचे बळ मिळू दे, एवढेच श्री रामाकडे मागितले आहे. आमच्यासाठी काहीही मागितले नाही, असा टाेलाही त्यांनी विराेधकांना लगावला.

उध्दव ठाकरेंकडून १०० टक्के राजकारण...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे तत्व हाेते. परंतु, माजी मुख्यमंत्री ठाकरे यांना बाळासाहेबांच्या विचाराचाच नव्हे तर तत्वाचाही विसर पडला आहे. ते आता १०० टक्के राजकारण करीत आहेत. पत्रकार परिषदेनंतर त्यांना शेतकर्यांबाबत विचारले असता, ‘नमस्कार’ करून उठून गेले. यावरूनच शेतकर्याबाबतची त्यांची तळमळ दिसून येते, असा चिमटाही काढला.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद