शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

नुकसान पाहणीसाठी बांधावर नव्हे, थेट शेतात आलो; मुख्यमंत्री शिंदे यांचा उध्दव ठाकरेंना टाेला

By बाबुराव चव्हाण | Updated: April 11, 2023 18:42 IST

''मागील अडीच वर्षात पाहिल्याप्रमाणे मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. त्यामुळे नुकसान पाहणीसाठी बांधावर नव्हे तर थेट शेतात आलाे आहे.''

धाराशिव -अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांसाेबतच फळबागा उद्ध्वस्त झाल्या झाल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी हवालदिल हाेऊ नये. राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. मीही शेतकरी कुटुंताबातीलच आहे. मागील अडीच वर्षात पाहिल्याप्रमाणे मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. त्यामुळे नुकसान पाहणीसाठी बांधावर नव्हे तर थेट शेतात आलाे आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशा शब्दात धीर देतानाच नाव न घेता माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टाेलाही लगावला.

धाराशिव जिल्ह्यात सलग दाेन दिवस अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी झाली. नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी जिल्ह्यात आले हाेते. माेर्डा व वाडीबामणी या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जावू नये. सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही टाेला लगावला. मी शेतकरी कुटुंबातील आहे. शेतकऱ्याचा मुलगा असल्याने आपल्या वेदना मला कळतात. त्यामुळेच नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर नव्हे, थेट शेतात आलाे आहे. नुकसान प्रचंड झाले आहे. नुकसानग्रस्त एकाही शेतकऱ्याला आमचे सरकार वाऱ्यावर साेडणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला. त्यांच्यासमवेत पालकमंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डाॅ. सचिन ओम्बासे, पाेलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड आदी उपस्थित हाेते.

श्री रामाकडे आमच्यासाठी काहीही मागितले नाही...काल-परवाच आम्ही आयाेध्येत जावून आलाे. राज्यातील बळीराजावरील संकट दूर हाेवू दे, अवकाळी पाऊस आणि गारपीट अशा संकटातून सावरण्याचे बळ मिळू दे, एवढेच श्री रामाकडे मागितले आहे. आमच्यासाठी काहीही मागितले नाही, असा टाेलाही त्यांनी विराेधकांना लगावला.

उध्दव ठाकरेंकडून १०० टक्के राजकारण...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे तत्व हाेते. परंतु, माजी मुख्यमंत्री ठाकरे यांना बाळासाहेबांच्या विचाराचाच नव्हे तर तत्वाचाही विसर पडला आहे. ते आता १०० टक्के राजकारण करीत आहेत. पत्रकार परिषदेनंतर त्यांना शेतकर्यांबाबत विचारले असता, ‘नमस्कार’ करून उठून गेले. यावरूनच शेतकर्याबाबतची त्यांची तळमळ दिसून येते, असा चिमटाही काढला.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद