शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

गॅस दरवाढीने जेवणासाठी गृहिणींचा मोर्चा चुलीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : सर्वसामान्यांना गॅस सिलिंडरचा वापर करता यावा, म्हणून पंतप्रधान उज्ज्वला योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील ९६ ...

उस्मानाबाद : सर्वसामान्यांना गॅस सिलिंडरचा वापर करता यावा, म्हणून पंतप्रधान उज्ज्वला योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील ९६ हजार ५९८ कुटूंबाना मोफत गॅस कनेक्शन जोडणी दिली आहे. गॅसच्या किंमती वाढल्याने दारिद्र्य रेषेखालील अनेक कुटुंबे चुलीकडे वळले आहेत.

धुरापासून डोळ्यांचे आजार उद्भवण्याचा अधिक धोका असतो. तसेच श्वसनाचे विकारही जडू शकतात. शिवाय, धुरामुळे प्रदूषणही वाढत असते. ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधानांनी उज्ज्वला योजना कार्यान्वित केली आहे. दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यात काही अटींमध्ये सवलत देण्यात आलेली आहे. कोणतीही रक्कम न भरता अल्प उत्पन्न असलेल्या कुटूंबाना गॅस जोडणी दिली जात आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत या योजनेंतर्गत ९६ हजार ५९८ कुटूंबांना गॅस जोडणी देण्यात आली आहे. मात्र, गॅसच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्यांना गॅस परवडेनासा झाला आहे. त्यामुळे अनेक कुटूंब चुलीकडे वळले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत मिळालेले उज्ज्वला कनेक्शन

९६५९८

गॅस सिलेंडरचे दर

जानेवारी २०१९ ५५०

जानेवारी २०२० ५९५

जानेवारी २०२१ ७१०

ऑगस्ट २०२१ ८५१

सिलेंडर भरणे कसे परवडणार

शासनानाने उज्ज्वला गॅस कनेक्शन मोफत दिला आहे. मागील दोन वर्षापूर्वी सिलिंडरचे दर कमी होते. तसेच सबसिडीही मिळत होती. मात्र सध्या सबसिडी कमी मिळत आहे. त्याचबरोबर दरही वाढले आहेत. त्यामुळे आता चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे.

सुरेखा सोनवणे

गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यात गॅसचे दर वरचेवर वाढत आहेत. यामुळे महिलांचे गणित बिघडत आहे.

महानंदा राऊत

सामान्य माणसाला आता कोरोना संकटात जगणे अवघड झाले आहे. सरकारकडूनही महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत.

कामिनी देवकते