शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
3
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
4
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
5
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
6
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
7
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
8
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
9
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
10
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
11
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
12
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
13
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
14
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
15
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
16
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
17
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
18
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
19
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
20
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा

उस्मानाबादेत हायव्होल्टेज लढत, ११ वाजेपर्यंत केवळ १७ टक्के मतदान

By चेतनकुमार धनुरे | Updated: May 7, 2024 11:42 IST

दुपारी १ ते २ वाजेदरम्यान तापमान ४३ अंशापर्यंत पोहोचेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

धाराशिव : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या मतदानाला सोमवारी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात मतदानाला फारशी गर्दी झाली नाही. यामुळे ९ वाजेपर्यंत केवळ ५.७९ टक्के इतकेच मतदान नोंदवले गेले आहे. दरम्यान, यानंतर मात्र मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पहायला मिळाली. 

११ वाजेपर्यंत सुमारे १७.०६ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. सकाळी ११ वाजता उन्हाचा पारा ३७ अंशावर पोहोचला होता. दुपारी १ ते २ वाजेदरम्यान तापमान ४३ अंशापर्यंत पोहोचेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे मतदानाचा टक्का या वेळेत कमी राहण्याचीही शक्यता आहे.

भीमनगरातील मतदान यंत्र बिघडले...धाराशिव शहरातील भीम नगर भागातील मतदान केंद्रावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मतयंत्रात बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. मतदान केल्यानंतर आवाज येत नसल्याने केंद्राध्यक्षांनी दुसऱ्या मशिनची मागणी नोंदवली.जवळपास अर्धा तास यामुळे मतदान ठप्प होते.

उस्मानाबाद मतदारसंघात ३१ उमेदवारमागील २० दिवस चाललेल्या प्रचाराच्या रणधुमाळीनंतर आज मतदानाला सुरुवात झाली. येथे लोकसभेसाठी ३१ उमेदवार उभे आहेत. या सर्व उमेदवारांचे भविष्य मतदार मतयंत्रात आज सील करतील. यानंतर थेट ४ जूनलाच मतदारांचा कौल समोर येणार आहे.

हायव्होल्टेज लढत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात हायव्होल्टेज लढत होत आहे. महाविकास आघाडी, महायुती, वंचित बहुजन आघाडीसह विविध प्रादेशिक पक्ष-संघटनांचे व अपक्ष असे एकूण ३१ उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघात यावेळी १९ लाख ९२ हजार ७३७ मतदारांची नोंद झालेली आहे. यापैकी पहिल्यांदाच मतदान करीत असलेले २९ हजार ८१९ नवमतदारही नोंदले गेले आहेत. निवडणूक आयोगाने यावेळी ८५ वर्षे वयावरील व दिव्यांग मतदारांसाठी घरून मतदानाची सोय केली होती. २ ते ५ मे या कालावधीत त्यांचे मतदान झाले आहे. जवळपास ९४ टक्के मतदान त्यांचे नोंदविले गेले आहे.

६ मतदान केंद्र संवेदनशीलदरम्यान, मतदारसंघात औसा, उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, परंडा, बार्शी या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात एकूण २ हजार १३९ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यातील ६ मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या सर्वच मतदान केंद्रांवर सुमारे १० हजार अधिकारी-कर्मचारी, पोलिस नियुक्त आहेत. 

दिवसभरात ४३ अंश तापमानाचा अंदाजउमेदवारांची संख्या ३१ असल्याने यावेळी दोन बॅलेट युनिटचा वापर करावा लागत आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालेल. दिवसभरात कमाल ४३ अंश तापमानाची नोंद होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असल्याने सकाळच्या सत्रातच जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४osmanabad-pcउस्मानाबादmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४