शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

अतिवृष्टीने जमिनी खरडून गेल्याने शंभर एकर क्षेत्र राहणार पेरणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 16:13 IST

पुराचे पाणी शेतात घुसून ओढ्याकाठच्या, तलावाच्या सांडव्याशेजारील जमिनी अक्षरश: खरडून गेला.

ठळक मुद्दे१४ आक्टोबर रोजी तामलवाडी भागात अतिवृष्टीचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसला.

तामलवाडी (जिल्हा उस्मानाबाद)  : मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीवेळी पुराच्या तडाख्याने ओढ्या काठच्या जमीनी खरडुन गेल्याने त्या आता नापिक बनल्या आहेत. त्यामुये यंदाच्या रबी हंगामात या भागातील जवळपास १०० एकर पेरणी विना राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

१४ आक्टोबर रोजी तामलवाडी भागात अतिवृष्टीचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसला. पुराचे पाणी शेतात घुसून ओढ्याकाठच्या, तलावाच्या सांडव्याशेजारील जमिनी अक्षरश: खरडून गेला. यामुळे सांगवी, सुरतगांव तामलवाडी देवकुरुळी वडगांव कदमवाडी पिंपळा बु शिवारातील शेतातील माती घासून जमीन नापीक बनली. सध्या बहुतांश जमिनीवर खड्डे , अन्‌ दगड-गोटे शिल्लक आहेत. घासून गेलेला गाळ पुन्हा कुठून व कसा भरायचा? यासाठी पैसा कसा उभा करायचा, असे प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहेत. शिवाय पुराच्या पाण्याने जमिनीसोबतच विहरीचे देखील मोठे नुकसान झाले. अनेकांचे बांध फूटले असून, शंभरावर विहरी गाळाने बुजल्या आहेत. त्यामुळे जमीन दुरूस्तीसाठी शासनाने मदत करण्याची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

जनावराच्या आजाराचे प्रमाण वाढलेतामलवाडी भागात पाळीव जनावरांच्या आजाराच्या प्रमाणात वाढ. होत आहे. संसर्गजन्य आजाराचा फैलाव उपचारानंतर कमी होत नसल्याने पशुपालक चिंताग्रस्त आहेत. लम्पी स्किनसदृश्य आजारानेही अनेक जनावरे त्रस्त आहेत. ऐन रबी पेरणीच्या मोसमात बैलाना आजार जडत असल्याने शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभारले आहे

विहीर नुकसानीच्या २५ तक्रारीअतिवृष्टीच्या पुराचे पाणी ओढ्या काठच्या विहिरीत शिरल्याने त्या गाळाने भरल्याच्या तक्रारी २५ शेतकऱ्यांनी केल्या आहेत. याशिवाय जमीन खरडून झालेल्या नुकसानीचा अहवाल देखील वरिष्ठांनी मागवून घेतल्यास तो सादर केला जाणार असल्याची माहिती कृषी सहाय्यक आर. पी. संकपाळ यानी दिली.

शेतकऱ्यांना भरीव मदत करावीनुकसानीपोटी शासनाने हेक्टरी अनुदान जाहीर केले. परंतु, जमीन पुराच्या पाण्याने खरडून जाऊन विहीर व बोअर देखीलगाळाने बुजले आहे हे नुकसान नाही का यासाठी यंदा रबी हंगामात खरडुन गेलेल्या जमिनीत पेरणी करता येत नाही. यामुळे जमिनी नापीक बनल्या असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्याना भरीव मदत करावी.- नागनाथ मुरलीधर मगर, शेतकरी, सांगवी

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस