शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी यंदाही द्राक्षे आंबटच !; बदलत्या वातावरणाने उत्पादनात झाली घट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 15:57 IST

पाण्याअभावी उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने मागणी इतका पुरवठा होण्याची शक्यता कमीच आहे

उस्मानाबाद : मागील चार-पाच वर्षांपासून असमान पर्जन्यमान, हवामानातील बदल, गारपीट, अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादनात कमालीची घट झाली आहे़ शाश्वत पैसा मिळवून देणाऱ्या या फळपीकाला यंदा युरोपीय व अरब राष्ट्रातून चांगली मागणी आली आहे़ मात्र, पाण्याअभावी उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने मागणी इतका पुरवठा होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक महादेव वडणे यांनी दिली़

मागणी वाढली, उत्पादन घटले

उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यामध्ये सुमारे ३ हजाराहून अधिक क्षेत्रावर द्राक्षाची लागवड यावर्षी झालेली आहे़ गतवर्षीच्या चांगल्या पावसामुळे मोडलेल्या बागा शेतकऱ्यांनी पुनरुज्जिवीत केल्या होत्या़ मात्र, यावर्षी पावसाने दगा दिला व शेतकरी अडचणीत आला, असे महादेव वडणे यांनी सांगितले़ या भागातील द्राक्षे युरोपीय, अरब देशात तसेच बांग्लादेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात़ यंदा या राष्ट्रातून दरवर्षीपेक्षा जास्त मागणी आलेली आहे़ आपल्या भागात एकरी सरासरी १५ टनापर्यंत द्राक्षाचे उत्पादन होते़ मात्र, पाऊस कमी झाल्याने पाण्याची कमतरता चांगलीच जाणवत आहे़ अपुऱ्या पाण्यामुळे सरासरी उत्पादन गाठण्याची शक्यता कमी झाली आहे़ त्यातच अचानक थंडी वाढली़ तापमान १५ अंश सेल्शियसपेक्षा खाली उतरल्यास त्याचा परिणाम द्राक्ष मण्यांच्या फुगवणीवर होतो़ सध्याच्या थंडीमुळे ही फुगवण थांबलेली आहे़ आता तापमान वाढले तरी, काहि अंशी झालेले नुकसान भरुन निघण्याची शक्यता नाही, असे मतही वडणे यांनी व्यक्त केले़ 

या वर्षी वाढीव दर मिळणार

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या द्राक्ष उत्पादक शेतकरी टँकरने पाणी देऊन बागा जगवीत आहे़ हातातोंडाशी आलेला घास जावू नये, यासाठी ही धडपड सुरु आहे़ एकरी किमान एक टँकर पाणी सध्या लागते़ या टँकरची किंमत २ ते अडीच हजार रुपये इतकी आहे़ हा अतिरिक्त खर्च वाढला आहे़ मागणी वाढल्यामुळे दरही चांगला मिळण्याची शक्यता आहे़ गतवर्षी स्थानिक बाजारपेठेत ४० रुपये तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ६० रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत दर मिळाला होता़ यावर्षी तो वाढेल, अशी अपेक्षा महादेव वडणे यांनी व्यक्त केली़

बागांच्या पुनरुज्जिवनासाठी मदत करावी

गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे़ ऐन काढणीच्या हंगामात अवकाळी पाऊस, गारपीट होवून मोठे नुकसान झाले़ त्यामुळे हा शेतकरी आर्थिक अडचणीत आहे़ शासनाने जे शेतकरी टँकरच्या पाण्याने बागा जगवीत आहेत, त्यांना अनुदान द्यावे़ शेततळ्याला १०० टक्के अनुदान व हवे त्या आकारात शेततळे मंजूर करावे, लातूरच्या धर्तीवर उस्मानाबाद जिल्ह्यातही पणनचे कोल्ड स्टोरेज व्हावे व द्राक्ष बागांच्या पुनरुज्जिवनासाठी शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीही वडणे यांनी केली़

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीweatherहवामानMarketबाजार