शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

शेतकऱ्यांसाठी यंदाही द्राक्षे आंबटच !; बदलत्या वातावरणाने उत्पादनात झाली घट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 15:57 IST

पाण्याअभावी उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने मागणी इतका पुरवठा होण्याची शक्यता कमीच आहे

उस्मानाबाद : मागील चार-पाच वर्षांपासून असमान पर्जन्यमान, हवामानातील बदल, गारपीट, अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादनात कमालीची घट झाली आहे़ शाश्वत पैसा मिळवून देणाऱ्या या फळपीकाला यंदा युरोपीय व अरब राष्ट्रातून चांगली मागणी आली आहे़ मात्र, पाण्याअभावी उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने मागणी इतका पुरवठा होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक महादेव वडणे यांनी दिली़

मागणी वाढली, उत्पादन घटले

उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यामध्ये सुमारे ३ हजाराहून अधिक क्षेत्रावर द्राक्षाची लागवड यावर्षी झालेली आहे़ गतवर्षीच्या चांगल्या पावसामुळे मोडलेल्या बागा शेतकऱ्यांनी पुनरुज्जिवीत केल्या होत्या़ मात्र, यावर्षी पावसाने दगा दिला व शेतकरी अडचणीत आला, असे महादेव वडणे यांनी सांगितले़ या भागातील द्राक्षे युरोपीय, अरब देशात तसेच बांग्लादेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात़ यंदा या राष्ट्रातून दरवर्षीपेक्षा जास्त मागणी आलेली आहे़ आपल्या भागात एकरी सरासरी १५ टनापर्यंत द्राक्षाचे उत्पादन होते़ मात्र, पाऊस कमी झाल्याने पाण्याची कमतरता चांगलीच जाणवत आहे़ अपुऱ्या पाण्यामुळे सरासरी उत्पादन गाठण्याची शक्यता कमी झाली आहे़ त्यातच अचानक थंडी वाढली़ तापमान १५ अंश सेल्शियसपेक्षा खाली उतरल्यास त्याचा परिणाम द्राक्ष मण्यांच्या फुगवणीवर होतो़ सध्याच्या थंडीमुळे ही फुगवण थांबलेली आहे़ आता तापमान वाढले तरी, काहि अंशी झालेले नुकसान भरुन निघण्याची शक्यता नाही, असे मतही वडणे यांनी व्यक्त केले़ 

या वर्षी वाढीव दर मिळणार

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या द्राक्ष उत्पादक शेतकरी टँकरने पाणी देऊन बागा जगवीत आहे़ हातातोंडाशी आलेला घास जावू नये, यासाठी ही धडपड सुरु आहे़ एकरी किमान एक टँकर पाणी सध्या लागते़ या टँकरची किंमत २ ते अडीच हजार रुपये इतकी आहे़ हा अतिरिक्त खर्च वाढला आहे़ मागणी वाढल्यामुळे दरही चांगला मिळण्याची शक्यता आहे़ गतवर्षी स्थानिक बाजारपेठेत ४० रुपये तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ६० रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत दर मिळाला होता़ यावर्षी तो वाढेल, अशी अपेक्षा महादेव वडणे यांनी व्यक्त केली़

बागांच्या पुनरुज्जिवनासाठी मदत करावी

गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे़ ऐन काढणीच्या हंगामात अवकाळी पाऊस, गारपीट होवून मोठे नुकसान झाले़ त्यामुळे हा शेतकरी आर्थिक अडचणीत आहे़ शासनाने जे शेतकरी टँकरच्या पाण्याने बागा जगवीत आहेत, त्यांना अनुदान द्यावे़ शेततळ्याला १०० टक्के अनुदान व हवे त्या आकारात शेततळे मंजूर करावे, लातूरच्या धर्तीवर उस्मानाबाद जिल्ह्यातही पणनचे कोल्ड स्टोरेज व्हावे व द्राक्ष बागांच्या पुनरुज्जिवनासाठी शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीही वडणे यांनी केली़

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीweatherहवामानMarketबाजार