शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद जिल्ह्यातील ३२ गावांतील पाणी योजनांना सरकारची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 19:12 IST

राष्ट्रीय पेयजल अंतर्गत जिल्हाभरातील १३५ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली होती.

उस्मानाबाद : राष्ट्रीय पेयजल अंतर्गत जिल्हाभरातील १३५ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली होती. परंतु, यापैकी ३२ गावांमध्ये प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यापूर्वीच राबविल्याची सबब देत राज्य सरकारने सदरील ३२ गावांच्या मंजूर पाणी योजनांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.

साधारपणे एक ते दीड दशकांपूर्वी जिल्ह्यातील ४३ गावांसाठी नऊ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या होत्या. परंतु, दोन ते तीन योजना सोडल्या तर इतर योजनांची कामे फारशी दर्जेदार झाली नव्हती. परिणामी लाखो रूपये खर्च करूनही ग्रामस्थांना पाणी मिळत नव्हते. अशा गावांतील ग्रामस्थांतून वेळोवेळी आंदोलने झाली. दरम्यानच्या काळात टंचाईचा सामना करणा-या जिल्हाभरातील सुमारे १३५ गावांमध्ये ‘राष्ट्रीय पेयजल’मधून पाणी योजना राबविण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता.

यामध्ये प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविलेल्या ४३ पैैकी ३२ गावांचा समावेश करण्यात आला होता. दरमयान, दीड ते दोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर शासनाने १३५ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबविण्यास मंजुरी दिली. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून निविदा प्रक्रियाही सुरू केली होती. काही निविदा पूर्णही झाल्या आहेत. असे असतानाच सहा ते सात दिवसांपूर्वी शासनाने नव्याने फतवा काढला आहे.  ज्या गावांमध्ये यापूर्वी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे, अशा गावांना ‘राष्ट्रीय  पेयजल’मधून पाणी योजना मंजूर झाली तरी ती राबवू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

शासनाच्या या निर्णयाचा जिल्हाभरातील एक-दोन नव्हे, तर तब्बल ३२ गावांना फटका बसणार आहे.  यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील सर्वाधिक १४ गावांचा समावेश आहे. यानंतर उमरगा तालुक्यातील ९, लोहारा तालुक्यातील ५, कळंब तालुक्यातील तीन आणि भूम तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे. शासनाच्या या निर्णयाविरूद्ध संबंधित गावांतील ग्रामस्थांतून आता तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या असून हा निर्णय मागे घेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारWaterपाणीOsmanabadउस्मानाबाद