शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

उस्मानाबाद जिल्ह्यातील ३२ गावांतील पाणी योजनांना सरकारची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 19:12 IST

राष्ट्रीय पेयजल अंतर्गत जिल्हाभरातील १३५ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली होती.

उस्मानाबाद : राष्ट्रीय पेयजल अंतर्गत जिल्हाभरातील १३५ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली होती. परंतु, यापैकी ३२ गावांमध्ये प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यापूर्वीच राबविल्याची सबब देत राज्य सरकारने सदरील ३२ गावांच्या मंजूर पाणी योजनांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.

साधारपणे एक ते दीड दशकांपूर्वी जिल्ह्यातील ४३ गावांसाठी नऊ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या होत्या. परंतु, दोन ते तीन योजना सोडल्या तर इतर योजनांची कामे फारशी दर्जेदार झाली नव्हती. परिणामी लाखो रूपये खर्च करूनही ग्रामस्थांना पाणी मिळत नव्हते. अशा गावांतील ग्रामस्थांतून वेळोवेळी आंदोलने झाली. दरम्यानच्या काळात टंचाईचा सामना करणा-या जिल्हाभरातील सुमारे १३५ गावांमध्ये ‘राष्ट्रीय पेयजल’मधून पाणी योजना राबविण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता.

यामध्ये प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविलेल्या ४३ पैैकी ३२ गावांचा समावेश करण्यात आला होता. दरमयान, दीड ते दोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर शासनाने १३५ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबविण्यास मंजुरी दिली. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून निविदा प्रक्रियाही सुरू केली होती. काही निविदा पूर्णही झाल्या आहेत. असे असतानाच सहा ते सात दिवसांपूर्वी शासनाने नव्याने फतवा काढला आहे.  ज्या गावांमध्ये यापूर्वी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे, अशा गावांना ‘राष्ट्रीय  पेयजल’मधून पाणी योजना मंजूर झाली तरी ती राबवू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

शासनाच्या या निर्णयाचा जिल्हाभरातील एक-दोन नव्हे, तर तब्बल ३२ गावांना फटका बसणार आहे.  यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील सर्वाधिक १४ गावांचा समावेश आहे. यानंतर उमरगा तालुक्यातील ९, लोहारा तालुक्यातील ५, कळंब तालुक्यातील तीन आणि भूम तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे. शासनाच्या या निर्णयाविरूद्ध संबंधित गावांतील ग्रामस्थांतून आता तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या असून हा निर्णय मागे घेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारWaterपाणीOsmanabadउस्मानाबाद