शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अफवांतून घडणाऱ्या हिंसाचारास सरकारच जबाबदार; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 12:03 IST

गेल्या चार वर्षांत ज्या दंगली, घटना घडल्या, त्यातील क्रुरता यापूर्वी कधीही पाहिली नव्हती़ त्यामुळेच माणसातील सैतान जागे करण्यास आणि अशा हिंसाचारास सरकारच जबाबदार असल्याचा घणाघात अ‍ॅड़प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी उस्मानाबाद येथे केला़

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी, ओबीसी, मुस्लिम समाजाशी मंगळवारी अ‍ॅड. आंबेडकर यांनी संवाद साधला़

उस्मानाबाद : अफवांमुळे राज्यभर घडत असलेल्या हिंसाचाराच्या घटना माणसातील माणूसपण संपत चालल्याची प्रतिके आहेत़ गेल्या चार वर्षांत ज्या दंगली, घटना घडल्या, त्यातील क्रुरता यापूर्वी कधीही पाहिली नव्हती़ त्यामुळेच माणसातील सैतान जागे करण्यास आणि अशा हिंसाचारास सरकारच जबाबदार असल्याचा घणाघात अ‍ॅड़प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी उस्मानाबाद येथे केला़

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी, ओबीसी, मुस्लिम समाजाशी मंगळवारी अ‍ॅड़आंबेडकर यांनी संवाद साधला़ यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर त्यांनी हल्ला चढविला़ ते म्हणाले, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिमविरोधी राजकारण करीत आहेत़ मुस्लिम समाजाविनाही सत्ता आणू शकतो, हे रुजविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून देशात चालला आहे़ व्यापारी, मुस्लिम समाज, राजकीय विरोधक यांच्यात वेगवेगळ्या माध्यमातून दहशत निर्माण करणे व राज्य करणे, हा केंद्र व राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचा दावाही त्यांनी केला़

आपण वंचितांची मूठ बांधत असताना मला इतरांना का जागे करताय? तुम्ही दलितांचेच राजकारण बघा, असा सल्ला मिळू लागला आहे़ मात्र, मी कोणाच्याही दबावाला बळी पडणारा नाही, असेही आंबेडकर म्हणाले़ बड्या उद्योजकांवर सरकारची चांगलीच मेहेरनजर आहे. अनिल अंबानींच्या अस्तित्वात नसलेल्या कंपनीस १०० लढाऊ विमानांचे कंत्राट कोणत्या आधारावर दिले? हे ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणणाऱ्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी दिले़ 

पक्षनिधीची चौकशी व्हावी भाजपच्या पक्ष निधीत अचानक ५०० कोटी रुपये वाढतात़ ते कोणत्या उद्योजकाने दिले, याचा खुलासा व्हावा़ जेणेकरुन त्या उद्योजकाला सरकारने याबदल्यात काय दिले, हेही समोर येईल़ निवडणूक आयोगाने पक्षनिधीची चौकशी करुन ‘दूध का दूध़़’ करावे, अशी मागणी  आंबेडकर यांनी केली़

अदानीच्या तुरीसाठी शेतकरी सुळावऱ देशातील बडे उद्योजक अदानींनी आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठ्या प्रमाणात तूर, खरेदी केली होती़ ही तूर देशांतर्गत बाजारपेठेत विक्री व्हायची असल्यानेच सरकार शेतकऱ्यांची तूर खरेदी करीत नसल्याचा आरोप अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरGovernmentसरकारPoliticsराजकारण