शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

लातूर, बीड, उस्मानाबादसाठी सुखद वार्ता; मांजरा धरण भरले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 11:46 IST

महसूलीदृष्ट्या बीडमध्ये गणला जाणार्‍या या प्रकल्पावर कळंब, केज, धारूर, अंबाजोगाई, लातूर शहर व एमआयडीसी, मुरूड या शहरासह पन्नासेक गावाच्या पाणीपुरवठा योजना निर्भर आहेत.

ठळक मुद्देएक ऑक्टोबरला १३७ दलघमीवर असलेला प्रकल्प पुढील विस दिवसात २०० दलघमी पार झाला होता. यंदा २६ सप्टेंबरला पन्नास टक्के साठा होता, तो पुढं महिनाभरात शंभर टक्के साठा झाला

- बालाजी अडसूळकळंब (जि. उस्मानाबाद) : मागच्या दोन महिन्यापासून दखलपात्र येवा सुरू असलेलं मांजरा धरण अखेर भरलं आहे. लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यासाठी ही सुखद वार्ता असून बांधणीपासूनच्या चाळीस वर्षात मांजरा प्रकल्पात शतप्रतिशथ पाणीसाठा होण्याचा हा चौदावा योग आहे.

पाटोदा तालुक्यात उगम पावत बीड,ऊस्मानाबाद जिल्ह्याची सिमा बनून प्रवाही होत असलेल्या मांजरा नदीवर धनेगाव (ता.केज) व दाभा (ता.कळंब) यांच्या मधोमध उभारण्यात आलेल्या मांजरा प्रकल्पाची १९८० मध्ये बांधणी पुर्ण  झाली. महसूलीदृष्ट्या बीडमध्ये गणला जाणार्‍या या प्रकल्पावर कळंब, केज, धारूर, अंबाजोगाई, लातूर शहर व एमआयडीसी, मुरूड या शहरासह पन्नासेक गावाच्या पाणीपुरवठा योजना निर्भर आहेत. शिवाय यातील धारूर वगळता इतर चार  तालुक्यातील शेतीलाही प्रकल्पाचा आधार मिळतो. यामुळेच मांजराच्या पाणीसाठ्यावर तिन्ही जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झालेलं असतं.यंदा मागच्या दोन महिन्यांपासून मांजरा प्रकल्पात येवा येत असला तरी तो जेमतेम होता.यामुळे मजल, दरमजल करत मांजराने अखेर शतकपूर्ती करण्यात यश मिळवले आहे.

एक ऑक्टोबरला १३७ दलघमीवर असलेला प्रकल्प पुढील विस दिवसात २०० दलघमी पार झाला होता. पुढं यात वाढ होत अखेर मंगळवारी रात्री प्रकल्प आपल्या २२४.०९३ दलघमी या पुर्ण क्षमतेन भरला आहे. पाण्याच्या आवकीनुसार विसर्ग करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . 

धरण पुर्ण क्षमतेने भरण्याचा चौदावा योग... प्रकल्पाची बांधणी १९८० साली तर दोन्ही कालव्याचे काम १९८६ साली पुर्ण झाले. यातील डावा कालवा ९० तर उजवा कालवा ७८ किलोमीटर लांबीचा आहे.जोतापातळी ६३५.७२ मिटर,पुर्ण संचय पातळी ६४२. ३७ मिटर आहे.एकूण साठवण क्षमता २२४.०९३ तर मृतसाठा ४७.१४० दलघमी आहे.धरण प्रथम १९८८ साली भरले. यानंतर १९८९, १९९०, २००५, २००६,२०१०,२०११, २०१६, २०१७ या सालात सलग दोन वर्ष भरले. याशिवाय १९९६,१९९८ व २००० व २००८ असे १३ वेळा पुर्ण भरले होते. यंदा २६ सप्टेंबरला पन्नास टक्के साठा होता, तो पुढं महिनाभरात शंभर टक्के साठा झाला असून आजउद्या पाण्याचा विसर्ग केल्यास हा ओव्हरफ्लोचा हा चौदावा योग ठरणार आहे. 

कळंब तालुक्यातील १७ गावाला फायदा...

कळंब शहरापासूनच बॅकवॉटर सुरू होतं.पुढं रांजणी पर्यंतच्या मांजरा बेल्टमधील बॅकवॉटरच्या कळंब,खडकी,लोहटा,कोथळा, हिंगणगाव,करंजकल्ला आदी तर लाभक्षेत्रातील दाभा, शिरपूरा, सौदंणा, लासरा गावासह ताडगाव, घारगाव, रांजणी आदी तालुक्यातील १७ गावातील शेतीला मांजरा प्रकल्प वरदान ठरतो.

टॅग्स :WaterपाणीOsmanabadउस्मानाबाद