शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
4
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
5
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
6
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
7
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
8
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
9
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
10
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
11
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
12
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
13
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
14
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
15
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
16
कष्टाचं फळ! २६ व्या वर्षी रोज १८ तासांची ड्युटी करून तरुणीने घेतलं तब्बल ७ कोटींचं घर
17
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
18
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
19
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
20
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
Daily Top 2Weekly Top 5

लातूर, बीड, उस्मानाबादसाठी सुखद वार्ता; मांजरा धरण भरले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 11:46 IST

महसूलीदृष्ट्या बीडमध्ये गणला जाणार्‍या या प्रकल्पावर कळंब, केज, धारूर, अंबाजोगाई, लातूर शहर व एमआयडीसी, मुरूड या शहरासह पन्नासेक गावाच्या पाणीपुरवठा योजना निर्भर आहेत.

ठळक मुद्देएक ऑक्टोबरला १३७ दलघमीवर असलेला प्रकल्प पुढील विस दिवसात २०० दलघमी पार झाला होता. यंदा २६ सप्टेंबरला पन्नास टक्के साठा होता, तो पुढं महिनाभरात शंभर टक्के साठा झाला

- बालाजी अडसूळकळंब (जि. उस्मानाबाद) : मागच्या दोन महिन्यापासून दखलपात्र येवा सुरू असलेलं मांजरा धरण अखेर भरलं आहे. लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यासाठी ही सुखद वार्ता असून बांधणीपासूनच्या चाळीस वर्षात मांजरा प्रकल्पात शतप्रतिशथ पाणीसाठा होण्याचा हा चौदावा योग आहे.

पाटोदा तालुक्यात उगम पावत बीड,ऊस्मानाबाद जिल्ह्याची सिमा बनून प्रवाही होत असलेल्या मांजरा नदीवर धनेगाव (ता.केज) व दाभा (ता.कळंब) यांच्या मधोमध उभारण्यात आलेल्या मांजरा प्रकल्पाची १९८० मध्ये बांधणी पुर्ण  झाली. महसूलीदृष्ट्या बीडमध्ये गणला जाणार्‍या या प्रकल्पावर कळंब, केज, धारूर, अंबाजोगाई, लातूर शहर व एमआयडीसी, मुरूड या शहरासह पन्नासेक गावाच्या पाणीपुरवठा योजना निर्भर आहेत. शिवाय यातील धारूर वगळता इतर चार  तालुक्यातील शेतीलाही प्रकल्पाचा आधार मिळतो. यामुळेच मांजराच्या पाणीसाठ्यावर तिन्ही जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झालेलं असतं.यंदा मागच्या दोन महिन्यांपासून मांजरा प्रकल्पात येवा येत असला तरी तो जेमतेम होता.यामुळे मजल, दरमजल करत मांजराने अखेर शतकपूर्ती करण्यात यश मिळवले आहे.

एक ऑक्टोबरला १३७ दलघमीवर असलेला प्रकल्प पुढील विस दिवसात २०० दलघमी पार झाला होता. पुढं यात वाढ होत अखेर मंगळवारी रात्री प्रकल्प आपल्या २२४.०९३ दलघमी या पुर्ण क्षमतेन भरला आहे. पाण्याच्या आवकीनुसार विसर्ग करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . 

धरण पुर्ण क्षमतेने भरण्याचा चौदावा योग... प्रकल्पाची बांधणी १९८० साली तर दोन्ही कालव्याचे काम १९८६ साली पुर्ण झाले. यातील डावा कालवा ९० तर उजवा कालवा ७८ किलोमीटर लांबीचा आहे.जोतापातळी ६३५.७२ मिटर,पुर्ण संचय पातळी ६४२. ३७ मिटर आहे.एकूण साठवण क्षमता २२४.०९३ तर मृतसाठा ४७.१४० दलघमी आहे.धरण प्रथम १९८८ साली भरले. यानंतर १९८९, १९९०, २००५, २००६,२०१०,२०११, २०१६, २०१७ या सालात सलग दोन वर्ष भरले. याशिवाय १९९६,१९९८ व २००० व २००८ असे १३ वेळा पुर्ण भरले होते. यंदा २६ सप्टेंबरला पन्नास टक्के साठा होता, तो पुढं महिनाभरात शंभर टक्के साठा झाला असून आजउद्या पाण्याचा विसर्ग केल्यास हा ओव्हरफ्लोचा हा चौदावा योग ठरणार आहे. 

कळंब तालुक्यातील १७ गावाला फायदा...

कळंब शहरापासूनच बॅकवॉटर सुरू होतं.पुढं रांजणी पर्यंतच्या मांजरा बेल्टमधील बॅकवॉटरच्या कळंब,खडकी,लोहटा,कोथळा, हिंगणगाव,करंजकल्ला आदी तर लाभक्षेत्रातील दाभा, शिरपूरा, सौदंणा, लासरा गावासह ताडगाव, घारगाव, रांजणी आदी तालुक्यातील १७ गावातील शेतीला मांजरा प्रकल्प वरदान ठरतो.

टॅग्स :WaterपाणीOsmanabadउस्मानाबाद