शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पंधरा दिवसापासून घाटपिंप्री अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST

पारगाव : वाशी तालुक्यातील घाटपिंप्री गावात गेल्या पंधरा दिवसापासून वीज नसल्याने ग्रामस्थांना अंधारात चाचपडावे लागत आहे. विजेअभावी गावाचा पाणीप्रश्न ...

पारगाव : वाशी तालुक्यातील घाटपिंप्री गावात गेल्या पंधरा दिवसापासून वीज नसल्याने ग्रामस्थांना अंधारात चाचपडावे लागत आहे. विजेअभावी गावाचा पाणीप्रश्न देखील भीषण बनला असून, हातपंपावरील पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५२ च्या पश्चिमेला घाटपिंप्री गाव आहे. या गावाला भूम तालुक्यातील ईट येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. या गावासाठी २५ केव्हीएचे तीन ड्रम आहेत. हे तिन्ही ड्रम ४ सप्टेंबर रोजी जळाले. यानंतर पुढच्या पाच दिवसात ड्रम बसवून वीज पुरवठा जोडण्यात आला. मात्र, २१ सप्टेंबर रोजी पुन्हा हे ड्रम जळल्याने गाव पुन्हा अंधारात चाचपडत आहे.

गावात २७० वीज ग्राहक आहेत. यातील नियमित बिल भरणाऱ्यांची संख्या दोनशे आहे. याउलट अनधिकृत पणे वीज वापरणाऱ्याची संख्या याहून दुप्पट आहे. त्यामुळे येथील ड्रम सतत्याने जळत आहेत. परिणामी नियमित वीज बिल भरणा करणाऱ्यांना याचा फटका बसत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. यासंदर्भात भूमचे वरिष्ठ अभियंता प्रशांत शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ईट येथील कनिष्ठ अभियंता पी. पी. बरडे यांचा फोन लागला नाही. याठिकाणी लाईनमन म्हणून काम करणारे नवनाथ आणेराव यांनी येत्या सोमवारी या ठिकाणी ड्रम बसवले जातील, असे सांगितले.

कोट..........

गावातील वीज प्रश्नाबाबत वारंवार अधिकाऱ्यांना बोललो. मात्र, ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. विजेचा होणारा बिघाड हा अनधिकृत वीज जोडणीमुळे होत असून, प्रशासनाने त्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. मात्र, वीज वितरण कंपनी आशा लोकांना पाठीशी घालून नियमित वीज बिल भरणा करणाऱ्यांंना वेठीस धरत आहे.

- सुजीत पाटील, ग्रामपंचायत सदस्य

गावाला वीज पुरवठा नसल्याने पाणी टंचाई जाणवत आहे. सध्या हात पंपावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. काही जणांनी शेतातून घराकडे पाणी आणत आहेत. अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष आहे. प्रशासनाने तात्काळ विजेचा प्रश्न सोडवावा, नाहीतर ग्रामस्थांना घेऊन ग्रामपंचायत आंदोलन करेल.

- किरण सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य

गावात चोरून वीज वापरणाऱ्यांमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीज चोरीमुळे सातत्याने काही न काही बिघाड झालेला असतो. गावात आठ दिवसापासून वीज नाही. महावितरणही लक्ष देत नाही. त्यामुळे नियमित वीज बिल भरणाऱ्यांची गोची झालेली आहे.

- जयचंद्र सातपुते, वीज ग्राहक