शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसापासून घाटपिंप्री अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST

पारगाव : वाशी तालुक्यातील घाटपिंप्री गावात गेल्या पंधरा दिवसापासून वीज नसल्याने ग्रामस्थांना अंधारात चाचपडावे लागत आहे. विजेअभावी गावाचा पाणीप्रश्न ...

पारगाव : वाशी तालुक्यातील घाटपिंप्री गावात गेल्या पंधरा दिवसापासून वीज नसल्याने ग्रामस्थांना अंधारात चाचपडावे लागत आहे. विजेअभावी गावाचा पाणीप्रश्न देखील भीषण बनला असून, हातपंपावरील पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५२ च्या पश्चिमेला घाटपिंप्री गाव आहे. या गावाला भूम तालुक्यातील ईट येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. या गावासाठी २५ केव्हीएचे तीन ड्रम आहेत. हे तिन्ही ड्रम ४ सप्टेंबर रोजी जळाले. यानंतर पुढच्या पाच दिवसात ड्रम बसवून वीज पुरवठा जोडण्यात आला. मात्र, २१ सप्टेंबर रोजी पुन्हा हे ड्रम जळल्याने गाव पुन्हा अंधारात चाचपडत आहे.

गावात २७० वीज ग्राहक आहेत. यातील नियमित बिल भरणाऱ्यांची संख्या दोनशे आहे. याउलट अनधिकृत पणे वीज वापरणाऱ्याची संख्या याहून दुप्पट आहे. त्यामुळे येथील ड्रम सतत्याने जळत आहेत. परिणामी नियमित वीज बिल भरणा करणाऱ्यांना याचा फटका बसत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. यासंदर्भात भूमचे वरिष्ठ अभियंता प्रशांत शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ईट येथील कनिष्ठ अभियंता पी. पी. बरडे यांचा फोन लागला नाही. याठिकाणी लाईनमन म्हणून काम करणारे नवनाथ आणेराव यांनी येत्या सोमवारी या ठिकाणी ड्रम बसवले जातील, असे सांगितले.

कोट..........

गावातील वीज प्रश्नाबाबत वारंवार अधिकाऱ्यांना बोललो. मात्र, ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. विजेचा होणारा बिघाड हा अनधिकृत वीज जोडणीमुळे होत असून, प्रशासनाने त्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. मात्र, वीज वितरण कंपनी आशा लोकांना पाठीशी घालून नियमित वीज बिल भरणा करणाऱ्यांंना वेठीस धरत आहे.

- सुजीत पाटील, ग्रामपंचायत सदस्य

गावाला वीज पुरवठा नसल्याने पाणी टंचाई जाणवत आहे. सध्या हात पंपावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. काही जणांनी शेतातून घराकडे पाणी आणत आहेत. अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष आहे. प्रशासनाने तात्काळ विजेचा प्रश्न सोडवावा, नाहीतर ग्रामस्थांना घेऊन ग्रामपंचायत आंदोलन करेल.

- किरण सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य

गावात चोरून वीज वापरणाऱ्यांमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीज चोरीमुळे सातत्याने काही न काही बिघाड झालेला असतो. गावात आठ दिवसापासून वीज नाही. महावितरणही लक्ष देत नाही. त्यामुळे नियमित वीज बिल भरणाऱ्यांची गोची झालेली आहे.

- जयचंद्र सातपुते, वीज ग्राहक