शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’ वाढतेय, मग साखरेचा ‘एमएसपी’ का नाही? साखर उत्पादक संघटनांचा सवाल

By बाबुराव चव्हाण | Updated: July 20, 2024 18:36 IST

पुणे येथील वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) व नवी दिल्ली येथील इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनची (इस्मा) पुण्यातील साखर संकुलात नुकतीच संयुक्त बैठक झाली.

कळंब (जि. धाराशिव) : साखरेची विक्री किंमत अर्थात ‘एमएसपी’ २०१९ पासून ३१ रुपये प्रतिकिलो आहे. तुलनेत उसाची ‘ एफआरपी’ मात्र दरवर्षी वृद्धिंगत होत जाऊन यंदा ३४०० रुपये प्रतिटन झाली आहे. यामुळे कारखान्यांना नगदी तोटा सहन करावा लागत असल्याने साखरेच्या ‘एमएसपी’त वाढ करून ‘एफआरपी’ किमतीशी ‘एमएसपी’ संरेखित करण्यासाठी एक सूत्र निश्चित करावे, अशी मागणी ‘विस्मा’ व ‘इस्मा’ या साखर उद्योगातील संस्थांनी केली आहे.

पुणे येथील वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) व नवी दिल्ली येथील इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनची (इस्मा) पुण्यातील साखर संकुलात नुकतीच संयुक्त बैठक झाली. ‘इस्मा’चे अध्यक्ष प्रभाकर राव, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या उपस्थितीत साखर उद्योगासमोरील प्राधान्यक्रमांच्या बाबींवर चर्चा झाली. यावेळी साखरेची ‘एमएसपी’ व उसाची ‘एफआरपी’ यांचा वस्तुनिष्ठ विचार करत मागच्या पाच-सहा वर्षांत साखरेची ‘एमएसपी’ ३१ रुपये प्रतिकिलोवरच स्थिर आहे. उत्पादन खर्चावर आधारित साखरेची सरासरी किंमत रुपये ४१.६६ रुपये प्रतिकिलो आहे. यामुळे कारखान्यांना नगदी तोटा सहन करावा लागतोय, असे निवेदन भारत सरकारला सादर करण्यात आल्याचे ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे व ‘इस्मा’चे अध्यक्ष प्रभाकर राव यांनी सांगितले.

या मुद्यांवर केला फोकस...१. साखरेच्या विक्री किमतीमध्ये वाढ हवी. उसाच्या ‘एफआरपी’शी ‘एमएसपी’ ‘संरेखित’ करण्यासाठी एक सूत्र तयार करणे गरजेचे.२. उसाचा रस आणि ‘बी’ हेवी मोलॅसेसद्वॉरे इथेनॉलच्या उत्पादनांवर डिसेंबर २०२३ रोजीच्या निर्बंध घालणाऱ्या अधिसूचनांमुळे इथेनॉल पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे.३. यामुळे आसवनी कामकाज दिवसांवर परिणाम होऊन ते सरासरी २७० ते ३३० दिवसांच्या तुलनेत १८० दिवसांपर्यंत कमी झाले आहे. यामुळे आर्थिक समस्या तयार झाल्या.४. अतिरिक्त साठा कमी करण्यासाठी २०२४-२५ हंगामात २० लाख टन साखर निर्यात परवानगी आवश्यक. अनिवार्य राखीव साठा, निर्यात धोरण यात कारखाना हित पाहणे गरजेचे.५. साखर विकास निधी, राष्ट्रीय सहकारी विकास निगम, सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या सर्व अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाची परतफेड करण्यास मदत होण्यासाठी कर्जांना २ वर्षांची स्थगिती, १० वर्षांसाठीच्या हप्त्यासह व्हावी पुनर्रचना.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेOsmanabadउस्मानाबाद