शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

तीन केंद्रांवर काटा हलला, १९४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी

By सूरज पाचपिंडे  | Updated: March 17, 2023 17:46 IST

बाजारात हरभऱ्यास कमी भाव मिळत असल्याने शेतकरी खरेदी केंद्रावर हरभरा विकण्यासाठी नोंदणी करीत होते

धाराशिव : बाजारात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याचा हरभरा कमी दरात खरेदी करून आर्थिक लूट केली जात आहे. आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी शासनाने खरेदी केंद्रावर हरभरा खरेदीस मंजुरी द्यावी, अशी मागणी लावून धरीत होते. गुरुवारी जिल्ह्यातील उमरगा, दस्तापूर, गुंजोटी या तीन केंद्रांवर खरेदीस प्रारंभ झाला आहे. एका दिवसात १९४ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे.

बाजारात हरभऱ्यास कमी भाव मिळत असल्याने शेतकरी खरेदी केंद्रावर हरभरा विकण्यासाठी नोंदणी करीत होते; मात्र खरेदीस विलंब होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कमी दरात हरभरा विक्री करावा लागत होता. प्रतिक्विंटल मागे ६०० ते ७०० रुपयांचा घाटा होत असल्याने खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी सुरू करण्यास शासनाने मान्यता द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून लावून धरली जात होती. गुरुवारपासून ३ खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदीस मंजुरी मिळाली आहे. दोन दिवसात तीन केंद्रांवरून नोंदणी केलेल्या १५ शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आला होता. संदेश प्राप्त होताच या सर्व शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीस घेऊन आले. तीन केंद्रांवर गुरुवारी १९४ क्विंटल ५० किलो हरभरा खरेदी झाला आहे. येत्या काही दिवसात इतर केंद्रावर खरेदी सुरू होईल, असे जिल्हा विपणन कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी