शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

पन्नास टक्के क्षेत्रावरील ई-पीक पाहणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST

शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण आणि नायगाव मंडलांमध्ये ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून, ५० टक्के क्षेत्राची ई-पीक पाहणी ...

शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण आणि नायगाव मंडलांमध्ये ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून, ५० टक्के क्षेत्राची ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे.

यापूर्वी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर तलाठी पीक पेरा नोंदवित होते. परंतु, शेतकऱ्यांना बँकेत किंवा इतर ठिकाणी पीक पेऱ्याच्या स्वतंत्र प्रमाणपत्राची मागणी केली जात होती. शिवाय, विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना स्वयंघोषित पीक प्रमाणपत्र जोडावे लागत होते. परंतु, यावर्षी शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या मोबाईलमधून पीक पेरा नोंदविता यावा, यासाठी ॲपची निर्मिती केली. यासाठी शिराढोण येथील मंडल अधिकारी शंकर पाचभाई आणि मंडलातील सर्व तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी कशी करायची याविषयी मार्गदर्शन केले. शिराढोण मंडलामध्ये एकूण ७ हजार ९७८ शेतकरी खातेदार असून, त्यापैकी ३ हजार ५४० शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-पीक पाहणी नोंदवलेली आहे. नायगाव मंडलामध्येही ८ हजार ५८२ शेतकऱ्यांपैकी ३ हजार ७२० शेतकऱ्यांनी आपल्या सातबारावर पीक पाहणी नोंदवलेला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी मंडल अधिकारी कार्यालय आणि सर्व तलाठी कार्यालयाकडून कडून प्रोत्साहन देण्यात येत आहे.

चौकट.....

३० सप्टेंबरपर्यंत मुदत

यापूर्वी सात-बारावर सामायिक सामूहिक पीक पेरा नोंद होत होती. परंतु, यावर्षी शेतकऱ्याच्या खाते नंबरनिहाय स्वतंत्र पीक पेरा नोंद होत असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातवर पीक लागवड करणे बंधनकारक आहे. तलाठी कार्यालयाकडून शेतकरी खातेदारांना पीक पेरा प्रमाणपत्र दिले जाणार नसल्याने ई-पीक पाहणी करणे अत्यावश्यक आहे. यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत असून, त्यानंतर कारखाना ऊस लागवड, पीक कर्ज किंवा विविध शासकीय अनुदान या नोंदीनुसारच दले जाणार आहे. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी काही अडचण उद्भवल्यास त्यांनी तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन मंडल अधिकारी शंकर पाचभाई, तलाठी नरेश सुतार यांनी केले आहे.

200921\5254img-20210919-wa0003.jpg

फोटो