शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळेना; ठाकरे गटाने धाडली राज्यसरकारला बेशरमाची फुले

By सूरज पाचपिंडे  | Updated: April 1, 2023 18:21 IST

शिंदे-फडणवीस सरकार केवळ घोषणाबाजी करीत असून, एकाही आश्वासनाची पूर्तता करीत नसल्याचा आरोप करीत शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाकचेरीसमोर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

धाराशिव : २०२२ मध्ये सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, शासनाने अनुदान न देता शेतकऱ्यांना एप्रिल फुल केल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाकचेरीसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यामार्फत राज्यसरकारला बेशरमाची फुले पाठविण्यात आली.

शिंदे-फडणवीस सरकार केवळ घोषणाबाजी करीत असून, एकाही आश्वासनाची पूर्तता करीत नसल्याचा आरोप करीत ठाकरे गट शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाकचेरीसमोर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार कैलास पाटील म्हणाले, खरीप हंगाम २०२२ मध्ये सततच्या पावसामुळे नुकसानीची नुकसान भरपाई देण्यासाठी २२२ कोटींचा प्रस्ताव ३० कोटी २०२२ मध्ये शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या संदर्भात ३० नोव्हेंबर रोजी अभ्यास गटाची नेमणूकही करण्यात आली. हिवाळी अधिवेशनात व अर्थसंकल्प अधिवेशनात ३१ मार्च २०२३ पूर्वी मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

मात्र, ही घोषणा एप्रिल फुल ठरल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांना एप्रिल फुल करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आनंदानाचा शिधा न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, पन्नास खोके एकदम ओक्के अशा घोषणांनी जिल्हाकचेरी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, सोमनाथ गुरव, राणा बनसोडे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीOsmanabadउस्मानाबाद