शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळेना; ठाकरे गटाने धाडली राज्यसरकारला बेशरमाची फुले

By सूरज पाचपिंडे  | Updated: April 1, 2023 18:21 IST

शिंदे-फडणवीस सरकार केवळ घोषणाबाजी करीत असून, एकाही आश्वासनाची पूर्तता करीत नसल्याचा आरोप करीत शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाकचेरीसमोर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

धाराशिव : २०२२ मध्ये सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, शासनाने अनुदान न देता शेतकऱ्यांना एप्रिल फुल केल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाकचेरीसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यामार्फत राज्यसरकारला बेशरमाची फुले पाठविण्यात आली.

शिंदे-फडणवीस सरकार केवळ घोषणाबाजी करीत असून, एकाही आश्वासनाची पूर्तता करीत नसल्याचा आरोप करीत ठाकरे गट शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाकचेरीसमोर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार कैलास पाटील म्हणाले, खरीप हंगाम २०२२ मध्ये सततच्या पावसामुळे नुकसानीची नुकसान भरपाई देण्यासाठी २२२ कोटींचा प्रस्ताव ३० कोटी २०२२ मध्ये शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या संदर्भात ३० नोव्हेंबर रोजी अभ्यास गटाची नेमणूकही करण्यात आली. हिवाळी अधिवेशनात व अर्थसंकल्प अधिवेशनात ३१ मार्च २०२३ पूर्वी मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

मात्र, ही घोषणा एप्रिल फुल ठरल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांना एप्रिल फुल करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आनंदानाचा शिधा न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, पन्नास खोके एकदम ओक्के अशा घोषणांनी जिल्हाकचेरी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, सोमनाथ गुरव, राणा बनसोडे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीOsmanabadउस्मानाबाद