शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळेना; ठाकरे गटाने धाडली राज्यसरकारला बेशरमाची फुले

By सूरज पाचपिंडे  | Updated: April 1, 2023 18:21 IST

शिंदे-फडणवीस सरकार केवळ घोषणाबाजी करीत असून, एकाही आश्वासनाची पूर्तता करीत नसल्याचा आरोप करीत शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाकचेरीसमोर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

धाराशिव : २०२२ मध्ये सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, शासनाने अनुदान न देता शेतकऱ्यांना एप्रिल फुल केल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाकचेरीसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यामार्फत राज्यसरकारला बेशरमाची फुले पाठविण्यात आली.

शिंदे-फडणवीस सरकार केवळ घोषणाबाजी करीत असून, एकाही आश्वासनाची पूर्तता करीत नसल्याचा आरोप करीत ठाकरे गट शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाकचेरीसमोर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार कैलास पाटील म्हणाले, खरीप हंगाम २०२२ मध्ये सततच्या पावसामुळे नुकसानीची नुकसान भरपाई देण्यासाठी २२२ कोटींचा प्रस्ताव ३० कोटी २०२२ मध्ये शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या संदर्भात ३० नोव्हेंबर रोजी अभ्यास गटाची नेमणूकही करण्यात आली. हिवाळी अधिवेशनात व अर्थसंकल्प अधिवेशनात ३१ मार्च २०२३ पूर्वी मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

मात्र, ही घोषणा एप्रिल फुल ठरल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांना एप्रिल फुल करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आनंदानाचा शिधा न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, पन्नास खोके एकदम ओक्के अशा घोषणांनी जिल्हाकचेरी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, सोमनाथ गुरव, राणा बनसोडे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीOsmanabadउस्मानाबाद